राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात.[१] हा पुरस्कार मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटास सादर केला जातो आणि चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला दिला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.[२]
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | class of award, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार | ||
स्थान | भारत | ||
प्रायोजक | |||
| |||
![]() |
भारताच्या संविधानाच्या आठव्या अनुसूची मधील २२ अधिकृत भाषांपैकी १८ भाषांतील चित्रपटांना हा प्रदान करण्यात येतो. ह्या भाषा आहेत, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. ह्या १७ भाषा व्यतिरिक्त, अजून काही भाषांतील चित्रपटांना असे पुरस्कार देण्यात येतात, जसे कि भोजपुरी, गारो, हरियाणवी, जसरी, इंग्रजी, खासी, कोडवा, कोकबोरोक, लडाखी, मिशिंग, मिझो, मोनपा, पांगचेनपा, रभा, शेरडोकपेन, तुलू आणि वानचो.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले.
२१ डिसेंबर १९५५ रोजी सादर झालेल्या २ऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधून सात प्रादेशिक भाषांमध्ये (बंगाली, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, तामिळ आणि तेलगू) चित्रपटांसाठी पुरस्कारांना प्रारंभ झाला. "सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक", "द्वितीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" आणि "तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" या तीन पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. नंतरचे दोन प्रमाणपत्र पुरस्कार १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९६७) पासून बंद केले गेले.
प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित, १९५४ साली महाराष्ट्राच्या समाजसुधारक जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जीवनावर आधारित महात्मा फुले या चित्रपटाला मराठीतील प्रथम सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक प्रदान करण्यात आले. जब्बार पटेल दिग्दर्शित पाच चित्रपटांनी हा पुरस्कार जिंकला आहे: सामना (१९७५), जैत रे जैत (१९७७), सिंहासन (१९७९), उंबरठा (१९८२) आणि एक होता विदूषक (१९९२). राजा ठाकूर दिग्दर्शित चार चित्रपटांनी हा पुरस्कार जिंकला आहे: मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), रंगल्या रात्री अश्या (१९६२), एकटी (१९६८) आणि मुंबईचा जावई (१९७०). दिग्दर्शक अनंत माने, माधव शिंदे आणि संजय सूरकर यांना प्रत्येकी तीन चित्रपटांसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
नलिनी प्रोडक्शन्स निर्मित भोंगा या चित्रपटासाठी दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांना अलीकडील २०१८ मध्ये ६६वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला आहे.[३]
संदर्भसंपादन करा
- ^ "About National Film Awards". Directorate of Film Festivals. Archived from the original on 25 ऑक्टोबर 2011. 8 नोव्हेंबर 2013 रोजी पाहिले.
- ^ "National Awards 2015, as it happened: Winners, wishes and morel". India Today. 3 मे 2015. Archived from the original on 23 मे 2015. 21 मे 2015 रोजी पाहिले.
- ^ "जाणून घ्या 'भोंगा'च्या कलाकार, दिग्दर्शक आणि कथेबद्दल". लोकसत्ता.