ज्ञानपीठ पुरस्कार

(ज्ञानपीठ पारितोषिक या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो.

पुरस्कारात मिळणारी वाग्देवीची प्रतिमा

सुरुवात संपादन

हा पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले. २२ मे, इ.स. १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती रमा जैन यांनी १६ सप्टेंबर, इ.स. १९६१ यादिवशी संस्थेच्या बैठकीत ज्ञानपीठ पुरस्काराबाबतचा ठराव मांडला. या पुरस्काराचे स्वरूप ठरविण्यासाठी २ एप्रिल, इ.स. १९६२ या दिवशी दिल्लीत देशभरातून ३०० विद्वानांना आमंत्रित करण्यात आले. या विद्वानांचे दोन सत्रांत संमेलन झाले. सत्रांचे अध्य्क्षपद डॉ. वी. राघवन आणि डॉ. भगवतीचरण वर्मा यांच्याकडे होते. सूत्रसंचालन डॉ. धर्मवीर भारती यांनी केले. या संमेलनाला काका कालेलकर, हरेकृष्ण मेहताब, निसीम इझिकेल, डॉ. सुनीति कुमार चॅटर्जी, डॉ. मुल्कराज आनंद, सुरेंद्र मोहंती, देवेश दास, सियारामशरण गुप्त, रामधारी सिंह दिनकर, उदयशंकर भट्ट, जगदीशचंद्र माथुर, डॉ. नगेन्द्र, डॉ. बी.आर. बेंद्रे, जैनेन्द्र कुमार, मन्मथनाथ गुप्त, लक्ष्मीचंद्र जैन यांसारखे विद्वान हजर होते. या संमेलनातून तयार झालेली पुरस्काराची संपूर्ण योजना डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सादर करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली व निवडसमितीचे प्रमुखपदही स्वीकारले पण इ.स. १९६३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर ही जबाबदारी काकासाहेब कालेलकर व डॉ. संपूर्णानंद यांच्याकडे आली. २९ डिसेंबर १९६५मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला. मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स.खांडेकर यांना प्रदान करण्यात आला.

निवडीचे निकष व प्रक्रिया संपादन

भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो. ज्या भाषेसाठी हा पुरस्कार दिला गेला असेल, त्याच्या पुढील तीन वर्षे त्या भाषेचा पुरस्कारासाठी विचार केला जात नाही. सुरुवातीला एक लाख, नंतर दीड लाख, नंतर पाच लाख त्यानंतर आता सात लाख रुपये एवढी रक्कम पुरस्कार विजेत्याला दिली जाते. काहीवेळा एका ऐवजी दोन साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड होते त्यावेळी ही रक्कम विभागून दिली जाते. इ.स. १९६७ मध्ये गुजरातीकानडी, इ.स. १९७३ मध्ये उडिया व कानडी तसेच इ.स. २००६ मध्ये कोकणी आणि संस्कृत अशा दोन भाषांना हे पारितोषिक विभागून देण्यात आले होते.

भारतातील विद्यापीठे, त्यांचे भाषाप्रमुख, अन्य शिक्षणसंस्थांचे प्रमुख, विख्यात साहित्यिक, समीक्षक, भाषाशास्त्रज्ञ अशा सर्वांना आपापल्या मातृभाषेतील साहित्यकृतीची शिफारस करण्याची विनंती करण्यात येते. ज्ञानपीठ पुरस्काराच्या पहिल्या निवडसमितीवर सातपेक्षा कमी व अकरापेक्षा जास्त मान्यवर असू नयेत असे धोरण ठरविण्यात आलेले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नावाची छाननी करण्यासाठी प्रत्येक भाषेची तीन सदस्यांची एक समिती असते. तिला एल.ए.सी. म्हणजेच लोकल अ‍ॅडव्हायझरी कमिटी म्हणतात. ही समिती आपल्या भाषेतील एका समर्थ साहित्यिकाच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ व्यवस्थापनाला करते. नंतर मध्यवर्ती निवड समितीत एकाच साहित्यिकाच्या ग्रंथाची निवड केली जाते.

पुरस्काराचे स्वरूप संपादन

ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाग्देवीची प्रतिमा' आणि 'अकरा लाख रुपयांचा धनादेश' यांचा समावेश असतो. ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने इ.स. १३०५ मध्ये केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश संग्रहालयात आहे.

विजेते संपादन

भाषेनुसार पुरस्कार प्राप्तकर्ते
भाषा पुरस्कार प्राप्तकर्ते
आसामी
इंग्रजी
उडिया
उर्दु
कन्नड
काश्मिरी
कोकणी
गुजराती
तमिळ
तेलुगू
पंजाबी
बंगाली
मराठी
मल्याळम
संस्कृत
हिंदी
१०
वर्ष नाव कृति भाषा
१९६५ जी शंकर कुरुप ओटक्कुष़ल (वंशी)
(कविता संग्रह)
मल्याळम
१९६६ ताराशंकर बंधोपाध्याय गणदेवता
(कादंबरी)
बंगाली
१९६७ के.वी. पुत्तपा श्री रामायण दर्शणम
(कविता)
कन्नड
उमाशंकर जोशी निशिता गुजराती
१९६९ फ़िराक गोरखपुरी गुल-ए-नगमा
(कविता संग्रह)
उर्दू
१९७० विश्वनाथ सत्यनारायण रामायण कल्पवरिक्षमु तेलुगू
१९७१ विष्णू डे स्मृति शत्तो भविष्यत बंगाली
१९७२ रामधारी सिंह दिनकर उर्वशी हिंदी
१९७३ दत्तात्रेय रामचंद्र बेन्द्रे नकुतंति कन्नड
गोपीनाथ मोहांती माटीमटाल उडिया
१९७४ विष्णू सखाराम खांडेकर ययाति
(कादंबरी)
मराठी
१९७५ पी.वी. अकिलानंदम चित्रपवई तमिळ
१९७६ आशापूर्णा देवी प्रथम प्रतिश्रुति बंगाली
१९७७ के. शिवराम कारंत मुक्कजिया कनसुगालु कन्नड
१९७८ अज्ञेय कितनी नावों में कितनी बार हिंदी
१९७९ बिरेन्द्र कुमार भट्टाचार्य मृत्यंजय आसामी
१९८० एस.के. पोत्ताकट ओरु देसात्तिन्ते कथा मल्याळम
१९८१ अमृता प्रीतम कागज ते कैनवास पंजाबी
१९८२ महादेवी वर्मा - हिंदी
१९८३ मस्ती वेंकटेश अयंगार - कन्नड
१९८४ तकाजी शिवशंकरा पिल्लै - मल्याळम
१९८५ पन्नालाल पटेल - गुजराती
१९८६ सच्चिदानंद राउतराय - उडिया
१९८७ वि.वा. शिरवाडकर - मराठी
१९८८ डॉ. सी नारायण रेड्डी - तेलुगु
१९८९ कुर्तुलएन हैदर - उर्दू
१९९० वी.के.गोकक - कन्नड
१९९१ सुभाष मुखोपाध्याय - बंगाली
१९९२ नरेश मेहता - हिंदी
१९९३ सीताकांत महापात्र - उडिया
१९९४ यू.आर. अनंतमूर्ति - कन्नड
१९९५ एम.टी. वासुदेव नायर - मल्याळम
१९९६ महाश्वेता देवी - बंगाली
१९९७ अली सरदार जाफरी - उर्दू
१९९८ गिरीश कर्नाड - कन्नड
१९९९ निर्मल वर्मा - हिंदी
गुरदयाल सिंह - पंजाबी
२००० इंदिरा गोस्वामी आसामी
२००१ राजेन्द्र केशवलाल शाह - गुजराती
२००२ दण्डपाणी जयकान्तन - तमिळ
२००३ गोविंद विनायक करंदीकर - मराठी
२००४ रहमान राही[१] - काश्मिरी
२००५ कुॅंवर नारायण - हिंदी
२००६ रवींद्र राजाराम केळेकर - कोंकणी
सत्यव्रत शास्त्री - संस्कृत
२००७ ओ.एन.वी. कुरुप - मल्याळम
२००८ अखलाक मुहम्मद खान शहरयार - उर्दू
२००९ अमर कांत - हिंदी
श्रीलाल शुक्ल - हिंदी
२०१० चन्द्रशेखर कम्बार - कन्नड
२०११ प्रतिभा राय - उडिया
२०१२ रावुरी भारद्वाज - तेलुगू
२०१३ केदारनाथ सिंह - हिंदी
२०१४ भालचंद्र वनाजी नेमाडे - मराठी
२०१५ रघुवीर चौधरी - गुजराती
२०१६ शंख घोष - बंगाली
२०१७ कृष्णा सोबती - हिंदी
२०१८ अमिताव घोष - इंग्रजी
२०१९ अक्कितम अच्युतम नंबुद्री - मल्याळम
२०२१ नीलमणी फूकन - आसामी
२०२२ दामोदर मावजो - कोंकणी
टीप

 •  - १९८२ नंतर, लेखकाच्या कोणत्याही एक विशिष्ट कृतिस पुरस्कार प्रदान न करता त्यांच्या लेखनाच्या संपूर्ण संकलनाचा विचार केला जातो.

पुढील वाचन संपादन

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ http://jnanpith.net/images/40thJnanpith_Declared.pdf Archived 2009-04-07 at the Wayback Machine. 40th Jnanpith Award to Eminent Kashmiri Poet Shri Rahman Rahi