भारताच्या पंतप्रधानांची यादी
भारताचे पन्तप्रधान हे भारत प्रजासत्ताकाचे प्रमुख आहेत. भारताचे पन्तप्रधान हे पद भारताच्या शासनप्रमुखाचे आहे.घटनेनुसार ते भारत शासनाचे प्रमुख, भारताच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य सल्लागार, मन्त्री परिषदेचे प्रमुख आणि लोकसभेतील बहुसंख्य पक्षाचे नेते असतात. ते भारत सरकारच्या कार्यकारीमण्डळचे प्रमुख असतात . भारताच्या राजकीय व्यवस्थेत पन्तप्रधान कॅबिनेटचे ज्येष्ठ सदस्य असतात.

भारताच्या पन्तप्रधानांची यादीसंपादन करा
- * कार्यकारी
- ** कार्यकाळ प्रगतीपथावर
- *** भारतीय राष्ट्रीयकाँग्रेस( काँग्रेस आली )(आल्या, इन्दिराजींसाठी)
कालखंडानुसार पंतप्रधानांचा इतिहाससंपादन करा
१९४७-८०संपादन करा
सन १९४७ ते२०२० पर्यन्त एकूण १४ पदाधिकाऱ्यांनी पन्तप्रधानपदावर काम केले आहे. आणि जर गुलजारीलाल नन्दा यांनाही मोजणीत समाविष्ट केले गेले,[२] ज्यांनी दोनदा पन्तप्रधान म्हणून अल्प कालावधीसाठी काम केले, तर ही संख्या १५ वर पोहोचते. १९४७ च्या नन्तर, काही दशकांकरिता. भारतीय राजकीय नकाशावर, काँग्रेस पक्षाकडे जवळजवळ आव्हानमुक्त, अविरत सत्ता होती. या काळात, काँग्रेसच्या नेतृत्वात अनेक मज़बूत सरकारांचे शासन भारताला दिसले, ज्यांचे नेतृत्व अनेक सामर्थ्यवान व्यक्तींनी केले. भारताचे 'पहिले पन्तप्रधान, जवाहरलाल नेहरू १५ ऑगस्ट १९४७, भारताच्या स्वाधीनतासमारोहा मधे, पन्तप्रधान म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी सतत १८ वर्षे सेवा भारताला सेवा दिली. ते या पदावर 3 पूर्ण आणि विभाजित मुदतीसाठी बसले. मे मध्ये त्यांच्या निधनाने त्यांचा कार्यकाळ सम्पला. ते आत्तापर्यन्त प्रदीर्घ काळ सेवा देणारे पन्तप्रधान होते.[३] जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानन्तर त्यांच्या पक्षाचे लाल बहादूर शास्त्री हे कार्यभार साम्भाळत होते. त्यांच्या या १९ महिन्यांच्या कार्यकाळात भारताने १९६५ चे काश्मीर युद्ध आणि त्यात पाकिस्तानचा पराभव पाहिला. ताश्कन्द शान्तता करारावर स्वाक्षर्र्या झाल्यानन्तर, युद्धानन्तर ताश्कन्द येथे त्यांचा अव अकारण आणि अपघाती मृत्यू झाला.[४][५][६] शास्त्री नन्तर पन्तप्रधानपदी जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या इन्दिरा गान्धी यांची देशाच्या पहिल्या महिला पन्तप्रधानपदी निवड झाली. इन्दिराजींचे पहिले दोन कार्यकाळ ११ वर्षे चालले, ज्यात त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पूर्वीच्या राजपरिवरांना शाहि भत्ते आणि राज पदवी रद्द करणे यासारख्या कठोर उपाययोजना केल्या. याबरोबरच १९७१च्या पाकिस्तानशी युद्ध , बांगलादेशची स्थापना, जनमत करून सिक्कीमचा भारत प्रवेश करणे, पोखरणमधील भारताची पहिली अणुचाचणी इन्दिरा गान्धींच्या कारकिर्दीतही यासारख्या ऐतिहासिक घटना घडल्या. परन्तु या सर्व कामगिरी असूनही इन्दिरा गान्धीनी १९७५ ते १९७९ पर्यंत कुप्रसिद्ध आणीबाणी लागू केली. अन्तर्गत गडबड आणि अराजक्यावर नियन्त्रण ठेवण्यासाठी सरकारने लोकशाही नागरी अधिकारांंचे उच्चाटन केले. 'राजकीय विरोधाचे दमन केल्यामुळे
हा काळ कुविख्यत् राहिला [७][८][९][१०]
आणिबाणी कोणत्याही लोकशाही असलेल्या राष्ट्रास लाजवेल अशी घटना होती.
या आणीबाणीमुळे इन्दिराजींच्या विरोधात जनमत बनले. विरोधाच्या लहरीमुळे आणीबाणीच्या समाप्तीनन्तर १९७७ च्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसविरोधात जनता पक्षाच्या नेतृत्वामधे लढा दिला आणि काँग्रेसला पराभवी करण्यात ते यशस्वी झाले. जनता पक्ष युतीच्या वतीने मोरारजी देसाई हे देशातील पहिले - बिगरकाँग्रेसी पंतप्रधान झाले. पन्तप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकार मधे बऱ्यापैकी परस्परविरोधी मताचे राजकीय होते. विविध राजकीय निर्णयांवर समन्वय साधणे, ऐक्य करणे आणि एकसन्ध करणे फारच अवघड होते. अडीच वर्षांच्या राजवटीनन्तर त्यांचे शासन २६ जुलै १९७९ रोजी मोरारजींच्या राजीनाम्याने पडले.[११] त्यानन्तर, थोड्या काळासाठी मोरारजींच्या सरकारमधील उपपन्तप्रधान असलेले चौधरी चरण सिंह यांनी काँग्रेसच्या पाठिम्ब्याने बहुमत सिद्ध केले व आणि पन्तप्रधानांची शपथ घेतली.पण या सरकारमधेही परस्परविरोधी मतांमुळे अवघ्या ५ महिन्यांनी ( ५ जुलै 1979) शासन पडले, त्यांनादेखील घटकांसमवेत समन्वय साधणे अवघड झाले आणि शेवटी काँग्रेसने पाठिम्बा काढून घेतल्याने बहुमत गमावले गेले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.[१२] ३ वर्ष काँग्रेस सत्तेतुन बाहेर होती व् पुन्हा पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत आलीआणि इन्दिरा गान्धी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात निवडून आल्या [१३]. त्यांनी घेतलेला सर्वात कठोर आणि विवादास्पद निर्णय म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार, जो अमृतसरच्या हरिमन्दिर साहिबमध्ये लपलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांविरूद्ध घेतला गेला. दरम्यान सुवर्णमन्दीरात बरेच नागरिकही उपस्थित होते. त्यांचाही यात मृत्यु झाला. याचमुळे शिखांचे सर्वोच्य धार्मिक स्थळ सुवर्णमन्दीरातील ही कारवाई वादग्रस्त ठरली, हिंसाचाराची मालिका येथेच न सम्पता याचीच परिणिती पुढे पन्तप्रधान इन्दिरा गान्धींची त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांकडुन झालेली हत्या व त्यानन्तर उसळलेल्या शीख विरोधी दंग्यांत झाले. त्याचा कार्यकाळ ३१ डिसेंबर १९८९ रोजी त्याच्या हत्येनन्तर सम्पला[१४].
१९८०-२०००संपादन करा
इन्दिराजीनन्तर त्यांचा थोरला मुलगा राजीव गान्धी भारताचे पन्तप्रधान झाले, त्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी सन्ध्याकाळी शपथ घेतली. ते पुन्हा निवडून आले आणि यावेळी काँग्रेसला ऐतिहासिक बहुमत मिळाले. १९८४ च्या निवडणुकीत काँग्रेसला लोकसभेत ४०१ खासदारांचे प्रचण्ड बहुमत मिळाले होते, ही कोणत्याही पक्षाने मिळवलेल्या बहुमतां पैकी सर्वोच्च संख्या आहे.वयाच्या ४० व्या वर्षी पन्तप्रधानपदाची शपथ घेतली. राजीव गान्धी हे सर्वात तरुण पन्तप्रधान आहेत.[१५]
राजीव गान्धीच्या हत्तेनंतर विश्वनाथ प्रताप सिंह यांनी पंतप्रधानाच कारभार पहिला.
विश्वनाथ प्रताप सिंह यांनी २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेम्बर १९९० या काळात एक वर्षापेक्षा थोडा कमी काळ पदाची धुरा साम्भाळली. सिंह यांनी श्रीलंकेतील भारतीय सैन्याच्या अयशस्वी ऑपरेशनला सम्पविण्याचा निर्णय घेतला जे राजीव गान्धींनी तामिळ फुटीरतावादी चळवळीचा मुकाबला करण्यासाठी पाठविले होते. काश्मिरी अतिरेक्यांनी तेव्हा गृहमन्त्री मुफ्ती मोहम्मद सईद (जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमन्त्री) यांच्या मुलीचे अपहरण केले. त्याच्या सरकारने बदल्यात अतिरेक्यांना मुक्त करण्याची मागणी मान्य केली; त्यानन्तर झालेल्या टीकेचे वादळ सम्पवण्यासाठी त्यांनी लवकरच भारतीय जनता पक्षाच्या आग्रहावरून जगमोहन मल्होत्रा या माजी नोकरशहाची जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.
सिंह यांनी स्वतः सामाजिक न्यायाशी सम्बन्धित मुद्द्यांवर राष्ट्रीय पातळीवर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार मण्डल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला. या मण्डल आयोगाने सुचविले की सार्वजनिक क्षेत्रातील सर्व नोकऱ्यांचा निश्चित कोटा ऐतिहासिकदृष्ट्या वंचित असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या सदस्यांसाठी राखीव असावा. या निर्णयामुळे उत्तर भारतातील शहरी भागातील उच्चवर्णीय तरुणांमध्ये व्यापक निषेधाचे वातावरण निर्माण झाले. २००० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण कायम ठेवले होते. परंतु "कारसेवे"स चाललेल्या लालकृष्ण आडवाणीच्या रथ यात्रेस बन्दी व त्यांच्या अटकेनंतर भाजपा ने पाठिम्बा काढुन घेतला.[१६][१६][१७] १० नोव्हेम्बर १९९० ते २१ जून १९९१ दरम्यान देशाचे आठवे पन्तप्रधान म्हणून काम पाहिले. जनता दलाच्या तुटलेल्या अल्पसंख्यांक सरकारचे त्यांनी नेतृत्व केले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मिळालेल्या बाहेरील पाठिम्ब्याने. सार्वत्रिक निवडणुका लाम्बणीवर टाकण्यासाठी ही व्यवस्था होती. ते पहिले भारतीय पन्तप्रधान आहेत ज्यांनी कधीही कोणतेही शासकिय कार्यालय साम्भाळलेले नाही. त्यांचे सरकार मोठ्या प्रमाणात निव्वळ एक "कठपुतळी" म्हणून पाहिले जात होते आणि लोकसभेतील थोड्याच खासदारांसह सरकार स्थापन केले गेले होते. मूडीज, अमेरिकी आर्थिक सेवा कम्पनी, यांनी भारताची ढासळलेली परिस्थिती भाकित केली होती तेव्हा त्यांचे सरकार अर्थसंकल्प पास करू शकले नाही. या स्थिती मुळे जागतिक बँकेने भारतास आर्थिक मदत बन्द केली. कर्जाची परतफेड चुकूनये म्हणुन चन्द्रशेखर यांनी सोने गहाण करण्यास परवानगी दिली. ही परवानगी निवडणुकीच्या काळातच गुप्तपणे केली गेली म्हणुन विशेष टीका झाली. १९९१ चे भारतीय आर्थिक संकट आणि राजीव गान्धी यांच्या हत्येमुळे त्यांचे सरकार संकटात सापडले.[१८]
नरसिंह राव यांनी पंतप्रधान उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणुक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पन्तप्रधानपदाचे उमेदवार राजीव गान्धी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केन्द्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी जून २१, इ.स. १९९१ रोजी भारताचे पन्तप्रधान म्हणून शपथ घेतली.
नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती साम्भाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंह या निष्णात अर्थतज्ञाची अर्थमन्त्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती साम्भाळण्यासाठी आन्तरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले.
नरसिंह राव सरकारने सत्तेवर आल्यानन्तर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये घेतल्या. त्यानन्तर बियन्त सिंह यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारारूढ झाले. त्या सरकारने इ.स. १९९२ आणि इ.स. १९९३ सालांदरम्यान दहशतवादाविरूद्ध कठोर पावले उचलून राज्यात शान्तता निर्माण केली.
तसेच अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये परकीय गुन्तवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र मे, इ.स. १९९२मध्ये हर्षद मेहता आणि इतर काही शेअर दलालांनी केलेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आला. त्यानन्तर उद्योगात आणि शेअर बाजारात मन्दीचे वातावरण निर्माण झाले.१९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचण्ड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पन्तप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमन्त्री बनले. परन्तु अन्तर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पक्ष सरकार १९८० साली कोसळले व जनता पक्षाचे विघटन झाले.[१९]
२०००-उपस्थितसंपादन करा
मे १९९८मध्ये वाजपेयी शासनाने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणाऱ्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या.[ संदर्भ हवा ] पुढील २ आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शान्ततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लण्ड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बन्ध लादले, तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला त्यांची झळ लागली नाही. अखेर भाजप आणि वाजपेयींच्या प्रतिमेच्या दृष्टीने या अणुचाचण्या लाभदायीच ठरल्या.
१७ एप्रिल १९९९ जयललिता यांच्या पक्षाने (आल इण्डिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळगम)समर्थन काढुन घेतले. पुन्हा ते निवडुन आले. २००४ पर्यन्त त्यांनी कर्यकाळ साभाळला, व ते पहिले बिगरकाँग्रेसी] ]५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पंतप्रधान होते.
२००४ मधे परत काँग्रेस सत्तारुढ झाली. देशास मनमोहन सिंह पन्तप्रधान लाभले. यांनी १० वर्ष आपली सेवा देशास दिली. यांच्या कळात विकासाची गती मन्दावली नाही. २६ नोव्हेम्बर २००८ रोजी झालेल्या आतंकवादी हल्यानन्तर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा केेली गेली.
२०१४ मधे नरेन्द्र मोदी भारताचे १५ वे पंतप्रधान बनले. नरेन्द्र मोदी पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान होते ज्यांनी पूर्ण बहुमताने शासन बनवले. पुन्हा २०१९ नरेन्द्र मोदींनी शासन स्थापन केले आहे. हे पहिले पन्तप्रधान आहेत जे स्वतन्त्र भारतात जन्मले आहेत.
संदर्भसंपादन करा
- ^ https://www.pmindia.gov.in/hi/former_pm/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ गुलज़ारीलाल नंद की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट )
- ^ जवाहरलाल नेहरू की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट
- ^ प्रधानमन्त्री शास्त्री-प्रधानमन्त्री वीडियो सीरीज, यूट्यूब (वीडियो)
- ^ प्रधानमन्त्री शास्त्री के मृत्यु के बाद-प्रधानमन्त्री, यूट्यूब वीडियो सीरियस
- ^ की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट
- ^ इंदिरा गांधी की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट
- ^ आपात्काल, काशी हिन्दू विश्वविद्यालय और स्मृतियां – भाग-१
- ^ इमरजेंसी: लोकतंत्र का काला अध्याय (राजस्थान पत्रिका)
- ^ आपातकाल और लोकतंत्र (प्रवक्ता डॉट कॉम)
- ^ मोरारजी देसाई की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट
- ^ चरण सिंह की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट
- ^ "भारतीय आम चुनाव, १९८०". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-03-06.
- ^ "ऑपरेशन ब्लू स्टार". विकिपीडिया. 2018-03-10.
- ^ राजीव गांधी की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट
- ^ a b मंडल कमीशन और वी पी सिंह का अंत-प्रधानमन्त्री वीडियो सीरीज, यूट्यूब
- ^ वी पी सिंह की संक्षिप्त जीवनी, प्रधानमन्त्री कार्यालय की आधिकारिक वेबसाइट
- ^ साचा:वेब सन्दर्भ
- ^ देश की आर्थिक आजादी के मसीहा: नरसिंह राव Archived 2016-12-01 at the Wayback Machine., बिज़नस-स्टॅण्डर्ड