जनता पक्ष हा एक भारतीय राजकीय पक्ष होता. हा पक्ष, आणीबाणीच्या काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान इंदिरा गांधीभारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला होता. आणीबाणीनंतरच्या १९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकांत कांग्रेस पक्षाचा पराभव करून जनता पक्ष हा भारताच्या इतिहासात प्रथमच गैरकाँग्रेस सरकारच्या रूपात सत्तेवर आला.

जनता पक्षाचे पुढील काळात अनेक तुकडे झाले, त्यांतले काही हे :-