राजे लखुजीराव जाधव (जन्म : अंदाजे इ.स. १५७०; - इ.स. १६२९)

लखुजी राजे जाधवराव यांचे समकालीन चित्र. चित्राखाली फारसी मध्ये "जादूनराय दख्खनी" असे लिहिले आहे.
लखुजी राजे जाधवराव यांचे समकालीन चित्र. चित्राखाली फारसी मध्ये "जादूनराय दख्खनी" असे लिहिले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधवाचे घराणे प्राचीन आहे. शिवाजी महाराज यांच्या आधीच्या काळात विशिष्ट परिस्थितीत निजामशाही आणि आदिलशाही यांच्या आश्रयाने जी काही मराठी कुळे उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव, वेरुळचे भोसले, वाशीमचे उदाराम देशमुख, पोतले आणि फलटणचे नाईक निंबाळकर,सरनाईक पवार ही कुळे विख्यात होती. जाधव घराणे हे लखूजी जाधवरावांच्या यांच्यामुळे निजामशाहीतच्या आमदानीत पुढे आले. लखुजीने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडची देशमुखी मिळवली होती. खिलजी (दिल्लीसुलता) राजांच्या राजवटीत यादव राज्य नष्ट झाले परंतु जाधव कुळात जन्मास आलेल्या कन्येच्या, जिजाबाई पोटी तीनशे वर्षांनी पुन्हा मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हा असामान्य पुरुष जन्मास आलला. शिवाजी राजाला जन्म देणारी जिजाबाई लखुजी जाधवरावांची कन्या होती.[ संदर्भ हवा ]

राजे लखुजीराव यांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही, परंतु त्यांचे मृत्युसमयी वय ८० होते,म्हणजे त्यांचा जन्म इ सन १५५० सालचा म्हणता येईल. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील मराठा वतनदार होते. ते जिजाबाई यांचे वडील व शहाजीराजे भोसले यांचे सासरे होते. निजामशाहीत त्यांना इ सन १५७० साली पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा होता. त्यानंतर निजामशहाला १२ वर्षांपासून देवगिरी किल्ला जिंकता येत नव्हता तो राजे लखुजीराव जाधव यांनी इ सन १५७२ साली स्वपराक्रमाने मिळवून दिला, त्यावेळी निजामशहाने त्यांना १०,००० हजारी मनसब,९ सरकार ,२८ महाल व ५६ चावड्या ही जहागिरी वंशपरंपरागत करून दिली. पुढे इसवी सन १६०५मध्ये राजे लखुजीराव जाधव यांना निजामशाहीत १५ हजारी मनसबदारी व वजीरपद बहाल करण्यात आले.पुढे इ सन १६२१ साली राजे लखुजीराव जाधव हे मुघलाकडे गेल्यानंतर त्यांना २४००० जात व १५००० स्वार ही मनसबदारी, मीर-ए-समद हे पद, दक्षिणेत त्यांना स्वतःला तसेच त्यांचे पुत्र, नातू व सोयऱ्यांना वतन देऊन सन्मान केला गेला. इ सन १६१५-१६२९ या काळात राजे लखुजीराव जाधव व त्यांचे जावई शहाजी महाराज यांनी एकत्रित मराठा सत्ता बळकट करण्यासाठी प्रयत्न केले..यातच २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजीराव जाधव, त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजी, आणि नातू युवराज राजे यशवंतराव व (राजे दत्ताजीराव पुत्ररत्न) यांचा निजामशहाने निशस्त्र असताना देवगिरीच्या दरबारात विश्वासघाताने खून केला. त्यांची समाधी सिंदखेडराजा येथे आहे.[ संदर्भ हवा ]


विदर्भात सिंदखेड येथे त्यांचे वतन होते. सिंदखेडकर जाधवांचे घराणे ही मूळ देवगिरीच्या यादव राजवटीतील सरदाराची एक शाखा आहे. देवगिरी येथील यादवांच्या रायाचा अंत झाल्यावर यादवांची दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाहासाठी ते सर्वत्र पसरले. मग त्यांचे सरदारही पुढे काही पिढ्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे स्थायिक झाले. सिंदखेडच्या जाधव घराण्यात लखूजी हा कर्तृत्वान आणि विख्यात पुरुष उदय पावला. यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर लखुजी जाधव यांनीच जाधव घराण्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. लखुजींचे नाव लक्ष्मणसिंह असेही होते तथापि ते लखुजी याच नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे.


पुत्र - १) राजे दत्ताजीराव २) राजे अचलोजीराव ३) राजे बहादुरजी ४) राजे राघोजी राव . कन्या- राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब.

वंशज शाखा = सिंदखेडराजा परिसरात देऊळगाव राजा,आडगाव राजा,किनगाव राजा,उमरद रुसुमचे (देशमुख) ,जवळखेडमेहुणा राजा या असून सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त वंशजशाखा- करवंड ता. चिखली जि . बुलढाणा),शिंदे-पळसे(जि.नाशिक),वाशीम जिल्हा मोठेगांव,रिसोड,वाकद, भुईंज(जि. सातारा), जाधव-सरनोबत कोल्हापूर, करणखेड (ता चिखली जिल्हा बुलढाणा),वडाळी (ता. कन्नड,जि.औरंगाबाद), माळेगांव बुद्रुक (ता.बारामती जि.पुणे),मांडवे (सातारा),माहेगाव देशमुख (ता. कोपरगांव, जि. अहमदनगर ),सारवडी(जिल्हा जालना),वाघोली(जिल्हा पुणे,वाडी(जिल्हा नांदेड), अक्कलकोट(तालुका अक्कलकोट,जिल्हा सोलापूर) ,भूम(तालुका भूम,जिल्हा उस्मानाबाद),पाटेवाडी सदरील राजे लखुजीराव जाधवराव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा होत...

संदर्भ - राजेजाधवरावांची बखर (द बाकी महाजन संपादित), मूळ मोडी बखर, जहांगीर नामा, शहाजहान नामा, राजे जाधवराव घराण्याच्या वंशपरंपरागत वंशावळी,[ संदर्भ हवा ]

वंशज- राजे अभयसिंह जाधवराव, राजे नरेश जाधवराव (उमरद रूसुमचे) देशमुख, राजे विजयसिंह जाधवराव (देऊळगाव राजा), राजे समीर जाधवराव (नांदेड सिटी) पुणे, ........

संदर्भसंपादन करा