मराठा
मराठा ही महाराष्ट्रातील क्षत्रिय वर्णीय जात आहे. मराठा जातीचे क्षत्रिय ९६ कुळ व पाटील-देशमुख-राव पदवी आहेत.[२][३] महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत. मराठा हा शब्द महारठीक शब्दापासुन तयार झाला आहे.रठीक हे महाराष्ट्रातील पराक्रमी लोक होते .रठीकांना राष्ट्रीक असेही म्हणत होते.त्यावरून महाराष्ट्रीक असा उल्लेख करण्यात आला.महाराष्ट्रीकांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे ओळखण्यात आले. महाराष्ट्रावर राज्य करणारे जे क्षत्रिय राजवंश झाले. जसे सातवाहन, वाकाटक, चालुक्य (साळुंखे), राष्ट्रकूट (बागुल), शिलाहार, कदम्ब (कदंब), निकुंभ, मौर्य (मोरे), सेंन्द्रक (शिंदे), देवगिरिचे यादव (जाधव), शिशोदे (भौसले) तर या सर्व राजवंशांचे वंशज आत्ताचे क्षत्रिय 96 कुळी मराठा आहेत. भारतावरील अनेक परकीय आक्रमणे परतवुन लावतांना मराठा लोकांनी प्राणांची आहुती सदैव दिली आहे.या नांवाने मराठा रेजमेंट भारतीय सैन्यामध्ये आहे. नाणेघाटातील मराठी भाषेतील शिलालेख इ.स.२५० मध्ये गौतमीपुत्र सातकर्णी ह्या सातवाहन राजाने मराठी भाषेत कोरून घेतला आहे .कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे मराठी भाषेत शिलालेख आहे तो इ.स.८५०चा आहे. 'चामुंडराय करवियले .गंगराय सुत्ताले करवियले'असा तो शिलालेख आहे .हा बाहुबलीच्या मुर्तीखाली आहे.
लक्षणीय लोकसंख्या असलेले प्रदेश | |
---|---|
महाराष्ट्र, गोवा तसेच मध्य प्रदेश कर्नाटक आणि अन्य. | |
भाषा | |
[१] | |
धर्म | |
हिंदू (क्षत्रिय) |
लोकसंख्यासंपादन करा
तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने १९३१मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा समाजाची लोकसंख्या अनुक्रमे 40.२९ टक्के आहे. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत 40% मराठा आहेत.
इतिहाससंपादन करा
मराठा साम्राज्य हे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले .या राज्याची पायाभरणी मालोजीराजे भोसले ,विठोजीराजे भोसले,शहाजीराजे भोसले यांनी केली .पुढे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले.आदीलशाही,मोगलशाहींशी लढून त्यांनी हे राज्य वाढविले .हेच कार्य पुढे छत्रपती शिवाजी महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी केले.मोगल बादशाह औरंगजेबाशी लढतांना त्यांनी प्राणांचे बलीदान दिले.त्यानंतर शिवरायांचे द्वीतीय पुत्र छत्रपती राजाराम ,महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाशी संघर्ष केला.औरंगजेबास महाराष्ट्रातच मृत्यू आला १७०७.तो दिल्लीस परत जावु शकला नाही .पहिला बाजीराव पेशवा,शिंदे होळकर, पवार ,गायकवाड या सरदारांनी उत्तर भारतावर मराठा सत्तेचा अंमल बसविला .दिल्लीची मोगल बादशाही नामधारी केली.त्यातुन मोगलबादशाहीची संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांकडे आली (इ.स.१७५२).त्यातुन उत्तर भारतातील रोहील्यांशी मराठ्यांचा संघर्ष झाला .दत्ताजी शिंदे बुराडीघाटच्या लढाईत नजीबखान रोहील्याशी लढतांना धारातीर्थी पडले सन १७५८. नजिबखानाने अफगाणीस्तातुन अहमदशहा अब्दालीस दिल्ली काबीज करण्यासाठी बोलविले .सदाशीवरावभाऊ यांच्या नेतृत्वात मराठे अब्दालीशी लढले .या पानीपतच्या १७६१ च्या लढाईत १लाख मराठा सैनिक प्राणपणाने लढून धारातिर्थी पडले .यात दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होती .विश्वासराव पेशवे यांना गोळी लागुन ते ठार झाले त्यामुळे सदाशिवराव भाऊ हत्तीवरून घोड्यावर बसले .सेनापती हत्तीवर दिसत नाही म्हणुन मराठा सैन्य घाबरले,सैन्यात गोंधळाची परीस्थीती तयार झाली .त्यात अब्दालीने राखीव फौज मैदानात उतरवली .सदाशिवराव भाऊ प्राणपणाने शेकडो अफगाणी सैनिक व सरदारांशी लढतांना धारातीर्थी पडले.पानिपतवर मराठ्यांचा पराभव झाला.या युद्धातील युद्धकैदी अब्दालीने बलुच सरदारास दिले .आज ते बलुचीस्थानमध्ये आहेत पण त्यांनी ईस्लाम धर्म स्वीकारलेला आहे.पण महाराष्ट्रीयन प्रथा त्यांच्यामध्ये आहेत.काही युद्ध समाप्तीवेळी पानीपतच्या उत्तरेला जाऊन जंगलात लपले व आपली ओळख रोडराजपुत अशी दिली ते आजचे हरीयाणातील रोडमराठा आहेत.अब्दालीने नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहुन मराठ्यांसारखे पराक्रमी योद्धे आजवर पाहीले नाही .असे कळविले होते.यानंतर अब्दाली अफगाणास्तीनात परतला पुन्हा भारतावर आक्रमण केले नाही .महादजी शिंदे यांनी पुन्हा दिल्लीवर मराठ्यांचा अंमल बसविला .पेशवा माधराव,सवाई माधवराव नाना फडणवीस यांनी पुन्हा मराठा साम्राज्य बलशाली केले. ईस्ट इंडिया कपंनी शी झालेल्या युद्धामुळे मराठा साम्राज्याचा अस्त झाला सन१८१८ मध्ये झालेल्या निर्णायक युद्धात दुसरा बाजीराव पेशवा, दौलतराव शिंदे,यशवंतराव होळकर ,नागपुरकर भोसले यांनी निकराचे प्रयत्न केले पण इंग्रजांच्या आधुनिक बंदुका ,तोफा यामुळे त्यांचा पराभव झाला.
अधिक माहिती साठीसंपादन करा
हे सुद्धा पहासंपादन करा
संदर्भसंपादन करा
- ^ The Tribes and Castes of Bombay, vol.2, by R. E. Enthoven.
- ^ "एक मराठा लाख मराठा people". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.
- ^ "India | Facts, Culture, History, Economy, & Geography". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.