हरभजन सिंह
हरभजन सिंह (जुलै ३, इ.स. १९८० - हयात) भारताकडून कसोटी व एक-दिवसीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हरभजनसिंग उजखोरा फलंदाज व उजखोरा मंदगती गोलंदाज आहे.
हरभजनसिंग | ||||
![]() | ||||
![]() | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
पूर्ण नाव | हरभजनसिंग | |||
उपाख्य | द टर्ब्युनेटर, भज्जी | |||
जन्म | ३ जुलै, १९८० | |||
जालंधर, पंजाब,भारत | ||||
उंची | ५ फु ११ इं (१.८ मी) | |||
विशेषता | गोलंदाज | |||
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने | |||
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने off break | |||
आंतरराष्ट्रीय माहिती | ||||
क.सा. पदार्पण (२१५) | २५ मार्च १९९८: वि ऑस्ट्रेलिया | |||
शेवटचा क.सा. | २६ नोव्हेंबर २००७: वि पाकिस्तान | |||
आं.ए.सा. पदार्पण (११३) | १७ एप्रिल १९९८: वि न्यू झीलँड | |||
शेवटचा आं.ए.सा. | १० जून २००७: वि Asia XI | |||
एकदिवसीय शर्ट क्र. | ३ | |||
राष्ट्रीय स्पर्धा माहिती | ||||
वर्ष | संघ | |||
१९९७– | पंजाब | |||
२००५–२००७ | सरे | |||
२००८-२०१७ | मुंबई इंडियन्स (संघ क्र. ३) | |||
२०१८- | चेन्नई सुपर किंग्स | |||
कारकिर्दी माहिती | ||||
कसोटी | ए.सा. | प्र.श्रे. | लि.अ. | |
सामने | ५७ | १५१ | ११९ | १९४ |
धावा | ९८६ | ७२८ | २३४९ | १००१ |
फलंदाजीची सरासरी | १६.१६ | १२.७७ | १९.०९ | १६.६० |
शतके/अर्धशतके | -/२ | ०/० | ०/६ | ०/० |
सर्वोच्च धावसंख्या | ६६ | ४६ | ८४ | ४६ |
चेंडू | १५१६२ | ८१३१ | २८५४८ | १०२७७ |
बळी | २३८ | १७४ | ५०३ | २२८ |
गोलंदाजीची सरासरी | २९.८७ | ३२.२९ | २६.७२ | ३१.१२ |
एका डावात ५ बळी | १९ | २ | ३३ | २ |
एका सामन्यात १० बळी | ४ | n/a | ६ | n/a |
सर्वोत्तम गोलंदाजी | ८/८४ | ५/३१ | ८/८४ | ५/३१ |
झेल/यष्टीचीत | ३०/- | ४१/– | ६३ | ६० |
कारकीर्दसंपादन करा
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
अगदी लहान वयात भारतीय संघात दाखल झालेल्या हरभजनच्या कारकिर्दीची सुरुवात विचित्र झाली. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून वादंग झाले आणि तो संघाबाहेर फेकला गेला. इ.स. २००१ मध्ये भारताच्या दौऱ्यावर स्टीव्ह वॉचा संघ आला होता. संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे खांद्याच्या दुखापतीने जायबंदी झाल्याने, कप्तान सौरव गांगुली चिंतेत पडला होता. ऑसी फलंदाज ऑफस्पिन गोलंदाजाला बिचकून खेळतात, याचा पक्का अभ्यास सौरवने केला असल्याने, त्याने हरभजनसिंगला संघात घेण्याकरता निवड समितीला साकडे घातले. निवड समितीने केवळ कप्तानाच्या आग्रहाखातर हरभजनला संघात घेतले. भारतीय संघाच्या कामगिरीला निर्णायक कलाटणी देणाऱ्या त्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हरभजनने तब्बल ३२ बळी मिळवून कमाल केली. भारताने मालिका २-१ फरकाने जिंकली आणि हरभजनला मालिकेचा मानकरी ठरवण्यात आले.
इ.स. २००६ ते इ.स. २००८ चा काळ हरभजनकरता निराशेचा ठरला. १३ कसोटी सामन्यांत जेमतेम ३७ बळी या काळात हरभजनला मिळवता आले. या काळात त्याला खराब कामगिरीमुळे संघाबाहेर पडावे लागले. इ.स. २००७ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात हरभजन नव्हता; पहिल्या टी२० वर्ल्ड कपकरता निवड समितीने हरभजनला संघात परत आणले, तो क्षण मोलाचा ठरला. इ.स. २००८ मध्ये गॉल कसोटीत भारतीय संघाला विजयी करून देताना हरभजनने दोनही डावांत मिळून १० बळी मिळवले. चांगली कामगिरी करून हरभजनवर प्रकाशझोत पडला नाही, कारण सेहवागने त्या सामन्यात द्विशतकी खेळी केली होती.
गेल्या वर्षभरात हरभजनला आपल्या फलंदाजीच्या गुणवत्तेची अचानक जाण आली. चालू विंडीज मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील विजयात संघाला नितांत गरज असताना हरभजनच्या अर्धशतकी खेळीने कमाल साधली. मायदेशातील मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध हरभजनने लागोपाठच्या दोन कसोटी सामन्यांत शतके झळकावून संघातील सहकाऱ्यांना चकित केले. इ.स. २०११ वर्ल्ड कपच्या यशात हरभजनसिंगच्या नावासमोर भरपूर बळी नसल्याने, त्याच्यावर टीका केली गेली. प्रत्यक्षात समोरच्या संघातील खेळाडूंनी विचारपूर्वक हरभजनच्या गोलंदाजीचा धोका न पत्करता, नुसते खेळून काढण्याचा निर्णय घेतला होता. हरभजनच्या नावासमोर जास्त बळी नसले तरी त्याने आपल्या १० षटकांत खूप कमी धावा दिल्या आहेत, तसेच पॉवर प्लेच्या महत्त्वाच्या षटकात टिच्चून गोलंदाजी केली आहे. ४०० बळींचा टप्पा पार केल्यावर बोलताना माझ्यात अजून भरपूर क्रिकेट बाकी आहे, असे त्याने बोलून दाखवले आहे. तंदुरुस्ती टिकवून पुढचा वर्ल्ड कप खेळायचा हरभजनचा निग्रह आहे.
भारतातील सर्वांत चांगला ऑफस्पिन गोलंदाज कोण, या प्रश्नाला उत्तर देताना बिशनसिंग बेदी यांनी, वीरेंद्र सेहवाग भारतातील सर्वांत चांगला ऑफस्पिन गोलंदाज असल्याचे सांगितले.[ संदर्भ हवा ]
डो मनिका कसोटी सामन्यादरम्यान हरभजन सिंगने ४०० कसोटी बळींचा टप्पा पार केला. असे अचाट काम करणारा तो फक्त तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे ६१९ बळी आणि कपिल देव ४३२ बळी हे दोनच भारतीय गोलंदाज हरभजनच्या पुढे आहेत. इ.स. २००१ मध्ये अनिल कुंबळेच्या अनुपस्थितीत बलाढ्य ऑसी संघाला पराभूत करण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या हरभजनने गेल्या दहा वर्षांत भारतीय संघाकरता भरपूर कष्ट केले आहेत.
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|