एम्बुरऐरंबी

महाराष्ट्रातील एक गाव

एम्बुरऐरंबी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?एम्बुरऐरंबी

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .८३५८९ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
२,०७२ (२०११)
• २,४७९/किमी
भाषा मराठी
सरपंच
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०३
• +०२५२५
• एमएच४८
बोलीभाषा:आदिवासी कातकरी

भौगोलिक स्थान संपादन

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने पुढे जाऊन दुर्वेस गावानंतर डाव्या बाजूला जाणाऱ्या फाट्याने हे गाव लागते. पालघरपासून हे गाव ३१ किमी अंतरावर आहे.

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन संपादन

हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४०५ कुटुंबे राहतात. एकूण २०७२ लोकसंख्येपैकी १०२४ पुरुष तर १०४८ महिला आहेत. गावाची साक्षरता ५५.६५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६६.८२ आहे तर स्त्री साक्षरता ४४.५५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३५४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.०८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.

नागरी सुविधा संपादन

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्शासुद्धा पालघरवरून दिवसभर उपलब्ध असतात.

जवळपासची गावे संपादन

पोचडे, दुखटण, खामलोळी, बहाडोली, हालोळी, कुडे, बोट, दहिसर तर्फे मनोर, साखरे, नावझे, गुंडावे ही जवळपासची गावे आहेत.हे गाव सावरे ग्रामपंचायतीमध्ये येते.

संदर्भ संपादन

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc