समझौता एक्सप्रेस
(समझोता एक्सप्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)
समझौता एक्सप्रेस (उर्दू: سمجھوتا اکسپريس) ही भारत व पाकिस्तान देशांदरम्यान आठवड्यातून दोन वेळा धावणारी एक प्रवासी रेल्वेगाडी आहे. ही गाडी भारतीय राजधानी दिल्लीला अमृतसरमार्गे पाकिस्तानधील लाहोर शहरासोबत जोडते. भारतीय रेल्वेची दिल्लीहून सुटणारी गाडी भारत-पाकिस्तान सीमेजवळ अटारी गावापर्यंतच धावते. येथे सर्व प्रवाशांना उतरून कस्टम व इमिग्रेशन[मराठी शब्द सुचवा] पूर्ण करावे लागते. त्यानंतर त्यांना पाकिस्तान रेल्वेद्वारे चालवल्या जात असलेल्या एका वेगळ्या गाडीत चढावे लागते. ती वेगळी गाडी लाहोरपर्यंत धावते.
international Train | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | passenger train service | ||
---|---|---|---|
स्थान | भारत, पाकिस्तान | ||
चालक कंपनी | |||
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक |
| ||
Terminus |
| ||
| |||
|
सिमला करारात ठरल्याप्रमाणे ह्या रेल्वे प्रवासाचा २२ जुलै १९७६ रोजी प्रारंभ करण्यात आला. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावपूर्ण संबंधांचा फटका ह्या सेवेला बसत असून आजवर अनेकदा ही सेवा स्थगित करण्यात आली आहे.