कर्हाड
कराड हे सातारा जिल्ह्यातील शहर आहे. हे कराड तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे. कराड तालुका भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक तालुका आहे.
कराड | |
जिल्हा | सातारा जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | ५६,१४९. २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२१६४ |
टपाल संकेतांक | ४१५ ११० |
वाहन संकेतांक | MH-50 |
निर्वाचित प्रमुख | उमा हिंगमिरे . (नगराध्यक्ष) |
प्रशासकीय प्रमुख | के.एन.कुंभार. (नगरपालिका आयुक्त) |
संकेतस्थळ | [१] |
कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर स्थित आहे. या नद्या महाबलेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत.कराड मध्ये यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र आहेत.कराड विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी " कराड समग्र दर्शन" हा विद्याधर गोखले व देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. हे पुस्तक म्हणजे कराडचा इतिहास आहे. विद्याधर गोखले हे पु.पां. गोखले म्हणजेच बाबुराव गोखले यांचे चिरंजीव आहेत.
इतिहाससंपादन करा
कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले. कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले. ◆कराडचे वैभव
========संपादन करा
संत सखूबाईच्या विठ्ठल भक्तीने कृष्णा काठावर विठू नामाचा गजर झाला. एका ब्राह्मण कुटुंबाची सून.. सदानकदा विठ्ठलांच्या ओढीने जीव कासावीस होत असे.. असेच एकदा आषाढी एकादशीला कृष्णा नदीवर सखू पाणी भरायला आली तेवढ्यात विठ्ठल नामाचा गजर करीत वारकरी जाताना सखूने पाहिले.. दिवस भर राबराब राबून घरकाम करणाऱ्या सखूला कधी एकदा पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेईन असे झाले होते. घरात किंमत नव्हती... शिव्याशाप, मारझोड हे तिच्या पाचवीला पुजलेले... दिंडीत सहभागी झाली.. घरच्यांना कळले.. तिला ओढत फरफटत घरी आणण्यात आले.. दोरीने बांधून घातले.. मारझोड झाली.. उपाशी ठेवण्यात आले.. पण विठ्ठल नामाचा गजर सुरुच ठेवला.. शेवटी साक्षात भगवानाने स्त्री रुप धारण करून सखूची सुटका केली व स्वतः दोरीने बांधून घेतली.. सखू पंढरीत पोहचली.. भजन किर्तनात दंग होऊन तिने तेथेच देह ठेवला.. अंत्यसंस्कार करण्यात आले.. साक्षात भगवंतानी पुन्हा तिच्यात प्राण भरुन तिला जिवंत केले.. घरच्यांना पश्चाताप झाला.. भक्तीचे महात्म्य कळाले.. त्यांचे मतपरिवर्तन झाले.. आणि कराडच्या भूमीने संत मालिकेत संत सखूची भर घातली.. ही घटना कराडमध्ये घडल्याचा इतिहास आहे.. खरी भक्ती आणि त्याची ताकद काय असते हे कराडने जगाला दाखवून दिले..प्रख्यात लेखक प्रा. के. अत्रे यांनी संत सखू हा चित्रपट प्रदर्शित करुन कराडची विठ्ठल भक्ती जगासमोर आणली आहे. संत सखूबाई समाधी व मंदीर हे केवळ कराडचे नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहे. कराडच्या संत सखूचे तीर्थक्षेत्र पंढरपूर आणि सातारकरांचे तीर्थक्षेत्र कराडच आहे.. कराड हे मानवतेचे मंदीर आहे. भारताचे माजी उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तबगारीने कृष्णाकाठ गाजला.. कराडच्या प्रितीसंगमाने जगाला संवेदनशील भक्तीचा संदेश दिला.. कराड ही मानवतेची कार्यशाळा आहे.. कराड विठ्ठलभक्त जरुर आहे.. त्याचबरोबर कराड ही माणुसकीचा गहीवर आहे.. इथे श्रमाला प्रतिष्ठा आहे.. या कराडने सदा भारतीय संविधानाचा सन्मान केला आहे.. कराड सहिष्णू आहे.. सह्याद्रीच्या शिरपेचातील कराड हा मानाचा तुरा आहे.. इथल्या शिक्षण संस्था.. शाळा काॅलेजीस.. कारखाने.. शेती.. उद्योग धंदे.. इथली धर्मनिरपेक्ष विचारसरणी.. याच सुपिक मातीने छ. शिवबांच्या कृष्णा घोडीच्या टापांचा आवाज ऐकला.. सह्याद्रीच्या कडेकपारीत सामान्य घरात जन्मास आलेल्या राकट कणखर तरुणांनी स्वातंत्र्य चळवळ गाजवली.. लष्करात कराडच्या सुपुत्रांनी पराक्रम केला.. याच कराडने हिमालयाचे रक्षण केले.. सह्याद्रीची शान वाढविले.. यशवंतराव आणि वेणूताईच्या रुपात कराडने दिल्ली दरबाराचे वैभव वाढविले...पृथ्वीराजनी महाराष्ट्राच्या नकाशावर कराडला मानाचे स्थान मिळवून दिले.. सिक्कीमच्या राजभवनात विराजमान झालेले कराड.. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाटीवर कलेक्टर म्हणून मिरवलेले कराड... पांडुरंगाच्या चरणी लीन होणारे कराड.. स्वाभिमान जपणारे कराड.. चव्हाण आणि पाटलांचा कराड.. बारा बलुतेदार अठरा पगड जाती जमातीला एकत्र गुण्यागोविंदाने नांदवणारे कराड म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचे वैभव आहे.
कसे जाल?संपादन करा
पुण्याहुन कराडला जाण्यासाठी, सातारा मार्गे जावे लागते. कराड रेल्वे स्थानक पुणे-मिरज रेल्वेमार्गावर असून येथे रोज अनेक रेल्वेगाड्या थांबतात. कराड -सातारा अंतर-५२ कि.मी. कराड- कोल्हापूर अंतर- ७५ कि.मी.
भौगोलिक महत्त्वसंपादन करा
कराड मध्ये कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम आहे.तसेच कराड पासून ८ किमी वरती शेरे हे गाव या गावात कृष्णवंशीय यादव राहतात.
ऐतिहासिक महत्त्वसंपादन करा
नकट्या रावळ्याची विहीर आगाशिव डोंगर(महादेवाचे मंदीर) सदाशीवगड (महादेवाचे मंदीर)
शैक्षणिक संस्थासंपादन करा
पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत १९५४ साली कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय स्थापन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च् शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून हे महाविद्यालय सुरु करण्यात आले. २०१७ साली या महाविद्यालयाला NAAC Bangalore यांचेकडून A+ हा दर्जा देण्यात आला आहे. १०००० हून अधिक विद्यार्थी या महाविद्यालात सध्या शिक्षण घेत आहेत.
कला, वाणिज्य , विज्ञान यामधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची तसेच इतर अनेक कोर्सेस ची महाविद्यालयात सोय उपलब्ध आहे.
राजकीय वारसासंपादन करा
माजी मुख्याम्ंत्री प्रुथविराजचव्हाण साहेब कराड चे आहेत् महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कर्मभुमी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
राजकीय वारसासंपादन करा
- कराड ही यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
- २०१३ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे पृथ्वीराज चव्हाण हे कराडचे आहेत.
- महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हणून ओळखले जाणारे थोर विचारवंत यशवंतराव मोहिते हे कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावाचे आहेत. यशवंतराव मोहिते हे सुमारे २५-३० वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते.
- कराड दक्षिणचे आमदार माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी अनेक खात्यांची मंत्रीपदे भूषवली आहेत.
- पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण हे केंद्रीय मंत्री मंडळात होते.
- पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई प्रेमालाबाई यांनी महत्त्वाची राजकीय पदे भूषवली आहेत.
- कराड उत्तर चे आमदार बाळासाहेब पाटील हे आहेत. त्यांचे वडील पी.डी. पाटील यांनी सर्वाधिक काळ कराड चे नगराध्यक्षपद भूषवले आहे.
वैशिष्ट्यसंपादन करा
कराड राजकीय , सांस्कृतिक , आर्थिक, ऐतिहासिक , औद्योगिकदृष्ट्या संपन्न व प्रगत आहे. तसेच येथील लोकांना कृष्णाकाठचे लोक म्हणूनही संबोधले वा ओळखले जाते. कराड ला लाभलेल्या सुंदर वारस्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात कराड नावाजलेले व प्रगत आहे. कृष्णाकाठची माणस प्रेमळ व सुस्वभावी आहेत. तसेच येथील कर्तबगार थोर व्यक्तिमत्वांमुळे कराड कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे दिसून येते.कराडला यशवंत विचारांचा वारसा लाभला आहे.