राष्ट्रीय महामार्ग १६
राष्ट्रीय महामार्ग १६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,५३३ किमी धावणारा हा महामार्ग कोलकाता आणि चेन्नई ह्या महानगरांना जोडतो[१]. कटक, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा व गुंटुर ही रा. म. ५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ५ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.
राष्ट्रीय महामार्ग १६ | |
---|---|
लांबी | १,७११ किमी |
सुरुवात | कोलकाता, पश्चिम बंगाल |
मुख्य शहरे | कोलकाता, कटक, भुवनेश्वर, विजयनगरम, विशाखापट्टणम, विजयवाडा, गुंटुर, चेन्नई |
शेवट | चेन्नई, तमिळनाडू |
राज्ये | पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना संपादन
- ह्या महामार्गाचा संपूर्ण चेन्नई ते बहारागोरा येथील रा मा ६शी तिठ्यापर्यंतचा १,४४७.९७ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
हे सुद्धा पहा संपादन
संदर्भ संपादन
- ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
- ^ "राष्ट्रीय महामार्ग १६चे सुवर्ण चतुष्कोण मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-09-30 रोजी पाहिले.