गोव्याचे मुख्यमंत्री
गोव्याचा मुख्यमंत्री हा भारताच्या गोवा राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
गोव्याचे मुख्यमंत्री
गोंयचो मुख्यमंत्री Chief Minister of State of Goa | |
---|---|
![]() गोव्याची राजमुद्रा | |
![]() भारतीय ध्वजचिन्ह | |
शैली | राज्यसरकार प्रमुख |
सदस्यता | गोवा विधानसभा |
वरिष्ठ अधिकारी | गोव्याचे राज्यपाल |
मुख्यालय | सचिवालय, पणजी |
नियुक्ती कर्ता | गोव्याचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
निर्मिती | २० डिसेंबर १९६३ |
पहिले पदधारक | प्रतापसिंह राणे |
उपाधिकारी | गोव्याचे उपमुख्यमंत्री |
१९६१ साली भारताने पोर्तुगीज गोव्यावर लष्करी आक्रमण करून गोवा आपल्या अधिपत्याखाली आणला. १९६१ ते १९८७ दरम्यान गोवा, दमण व दीव हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश होता. गोव्याला १९८७ साली संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाला व दमण आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश राहिला. १९६३ सालापासून आजवर ११ व्यक्ती गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांची यादी
संपादनक्र | नाव | चित्र | पदावरील काळ | कार्यकाळ | निवडणूक | पक्ष | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|
गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश (१९६३-१९८७) (१९६३ साली गोवा, दमण आणि दीव या एकत्रित प्रदेशाची विधानसभेसह केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापना करण्यात आली.) | ||||||||
१ | दयानंद बांदोडकर (१९११-१९७३) (मतदारसंघ: मार्केम) |
२० डिसेंबर १९६३ | २ डिसेंबर १९६६ | २ वर्षे, ३४७ दिवस | १९६३ | महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष | ||
- | पर रिकामे (राष्ट्रपती राजवट) |
२ डिसेंबर १९६६ | ५ एप्रिल १९६७ | ० वर्षे, १२४ दिवस | — | - | ||
(१) | दयानंद बांदोडकर (दुसरा कार्यकाळ) (१९११-१९७३) (मतदारसंघ: मार्केम) |
५ एप्रिल १९६७ | १२ ऑगस्ट १९७३ | ६ वर्षे, १२९ दिवस | १९६७ ————————— १९७२ |
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष | ||
२ | शशिकला गुरुदत्त काकोडकर (१९३५-२०१६) (मतदारसंघ: बिछोलीम) |
१२ ऑगस्ट १९७३ | २७ एप्रिल १९७९ | ५ वर्षे, २५८ दिवस | — ————————— १९७७ | |||
- | पर रिकामे (राष्ट्रपती राजवट) |
२७ एप्रिल १९७९ | १६ जानेवारी १९८० | ० वर्षे, २६४ दिवस | — | - | ||
३ | प्रतापसिंह रावजी राणे (जन्म १९३९) (मतदारसंघ: सत्तारी) |
१६ जानेवारी १९८० | ३० मे १९८७ | ७ वर्षे, १३४ दिवस | १९८० ————————— १९८४ |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यु.आर.एस.) | ||
भारतीय काँग्रेस (समाजवादी) | ||||||||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) | ||||||||
गोवा राज्य (१९८७ पासून) (३० मे १९८७ रोजी गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे विभाजन करत गोवा भारताचे २५वे राज्य म्हणून स्थापन, तर दमण आणि दीवची वेगळे केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापना.) | ||||||||
(३) | प्रतापसिंह रावजी राणे (दुसरा कार्यकाळ) (जन्म १९३९) (मतदारसंघ: सत्तारी) |
३० मे १९८७ | २७ मार्च १९९० | २ वर्षे, ३०१ दिवस | — ————————— १९८९ |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) | ||
४ | चर्चिल ब्राझ आलेमाव (जन्म १९४९) (मतदारसंघ: बेनावलीम) |
२७ मार्च १९९० | १४ एप्रिल १९९० | ० वर्षे, १८ दिवस | — | |||
५ | डॉ. लुईस प्रोटो बार्बोसा (१९२७-२०११) (मतदारसंघ: लोवटुलीम) |
१४ एप्रिल १९९० | १४ डिसेंबर १९९० | ० वर्षे, २४४ दिवस | — | |||
- | पर रिकामे (राष्ट्रपती राजवट) |
१४ डिसेंबर १९९० | २५ जानेवारी १९९१ | ० वर्षे, ४२ दिवस | — | - | ||
६ | रवी सिताराम नाईक (जन्म १९४६) (मतदारसंघ: मार्केम) |
२५ जानेवारी १९९१ | १८ मे १९९३ | २ वर्षे, ११३ दिवस | — | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) | ||
७ | डॉ. विल्फ्रेड टिटो डिसूझा (१९२७-२०१५) (मतदारसंघ: साळीगाव) |
१८ मे १९९३ | २ एप्रिल १९९४ | ० वर्षे, ३१९ दिवस | — | |||
(६) | रवी सिताराम नाईक (दुसरा कार्यकाळ) (जन्म १९४६) (मतदारसंघ: मार्केम) |
२ एप्रिल १९९४ | ८ एप्रिल १९९४ | ० वर्षे, ६ दिवस | — | |||
(७) | डॉ. विल्फ्रेड टिटो डिसूझा (दुसरा कार्यकाळ) (१९२७-२०१५) (मतदारसंघ: साळीगाव) |
८ एप्रिल १९९४ | १६ डिसेंबर १९९४ | ० वर्षे, २५२ दिवस | — | |||
(३) | प्रतापसिंह रावजी राणे (तिसरा कार्यकाळ) (जन्म १९३९) (मतदारसंघ: पोरेम) |
१६ डिसेंबर १९९४ | २९ जुलै १९९८ | ३ वर्षे, २२५ दिवस | १९९४ | |||
(७) | डॉ. विल्फ्रेड टिटो डिसूझा (तिसरा कार्यकाळ) (१९२७-२०१५) (मतदारसंघ: साळीगाव) |
२९ जुलै १९९८ | २६ नोव्हेंबर १९९८ | ० वर्षे, १२० दिवस | — | गोवा राजीव काँग्रेस | ||
८ | ॲड. लुइझिनो फलेरो (जन्म १९५१) (मतदारसंघ: नवेलीम) |
२६ नोव्हेंबर १९९८ | १० फेब्रुवारी १९९९ | ० वर्षे, ७६ दिवस | — | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
- | पर रिकामे (राष्ट्रपती राजवट) |
१० फेब्रुवारी १९९९ | ९ जून १९९९ | ० वर्षे, ११९ दिवस | — | - | ||
(८) | ॲड. लुइझिनो फलेरो (तिसरा कार्यकाळ) (जन्म १९५१) (मतदारसंघ: नवेलीम) |
९ जून १९९९ | २४ नोव्हेंबर १९९९ | ० वर्षे, १६८ दिवस | १९९९ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
९ | फ्रान्सिस्को कोस्मे सार्डिन्हा (जन्म १९४६) (मतदारसंघ: कुर्टोरीम) |
२४ नोव्हेंबर १९९९ | २४ ऑक्टोबर २००० | ० वर्षे, ३३४ दिवस | — | गोवा जनता काँग्रेस | ||
१० | मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर (१९५५-२०१९) (मतदारसंघ: पणजी) |
२४ ऑक्टोबर २००० | ३ फेब्रुवारी २००५ | ४ वर्षे, १०२ दिवस | — ————————— २००२ |
भारतीय जनता पक्ष | ||
(३) | प्रतापसिंह रावजी राणे (चौथा कार्यकाळ) (जन्म १९३९) (मतदारसंघ: पोरेम) |
३ फेब्रुवारी २००५ | ४ मार्च २००५ | ० वर्षे, २९ दिवस | — | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
- | पर रिकामे (राष्ट्रपती राजवट) |
४ मार्च २००५ | ७ जून २००५ | ० वर्षे, ९५ दिवस | — | - | ||
(३) | प्रतापसिंह रावजी राणे (पाचवा कार्यकाळ) (जन्म १९३९) (मतदारसंघ: पोरेम) |
७ जून २००५ | ८ जून २००७ | २ वर्षे, १ दिवस | — | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
११ | दिगंबर प्रतापसिंह कामत (जन्म १९५४) (मतदारसंघ: मडगाव) |
८ जून २००७ | ९ मार्च २०१२ | ४ वर्षे, २७५ दिवस | २००७ | |||
(१०) | मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर (दुसरा कार्यकाळ) (१९५५-२०१९) (मतदारसंघ: पणजी) |
९ मार्च २०१२ | ८ नोव्हेंबर २०१४ | २ वर्षे, २४५ दिवस | २०१२ | भारतीय जनता पक्ष | ||
१२ | लक्ष्मीकांत यशवंत पार्सेकर (जन्म १९५६) (मतदारसंघ: मांड्रेम) |
८ नोव्हेंबर २०१४ | १४ मार्च २०१७ | २ वर्षे, १२६ दिवस | — | |||
(१०) | मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर (तिसरा कार्यकाळ) (१९५५-२०१९) (मतदारसंघ: पणजी) |
१४ मार्च २०१७ | १७ मार्च २०१९ | २ वर्षे, ३ दिवस | २०१७ | |||
१३ | डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत (जन्म १९७३) (मतदारसंघ: सांखळी) |
१९ मार्च २०१९ | पदस्थ | ५ वर्षे, ३२७ दिवस | — ————————— २०२२ |
गोव्यामधील राष्ट्रपती राजवट तपशील
संपादनगोव्यामध्ये आत्तापर्यंत एकूण पाच वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे.
- पहिला कार्यकाळ : २ डिसेंबर १९६६ ते ५ एप्रिल १९६७ : गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा की महाराष्ट्र राज्यात विलीन करावे यासाठी जनमत संग्रह घेण्याकरता विधानसभा भंग करून विसर्जित करण्यात आली. गोवेकरांनी महाराष्ट्रात विलीन न होण्यासाठी तर संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी मतदान केले. नंतर १९६७ साली नव्याने निवडणुका होऊन सरकार स्थापन करण्याकरता राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.
- दुसरा कार्यकाळ : २७ एप्रिल १९७९ ते १६ जानेवारी १९८० : विद्यमान मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आमदारांकडून बंड झाल्याने शशिकला यांचे सरकार पडले आणि राज्यात दुसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. कोणत्याही पक्षास बहुमत सिद्ध न करता आल्याने विधानसभा विसर्जित करण्यात आली व १९८० साली नव्याने निवडणुका होऊन सरकार स्थापन करण्याकरता राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली. काँग्रेस पक्षाचे प्रतापसिंह राणे हे नंतर मुख्यमंत्री झाले.
- तिसरा कार्यकाळ : १४ डिसेंबर १९९० ते २५ जानेवारी १९९१ : बॉम्बे उच्च न्यायालयाच्या निर्णयाने विद्यमान मुख्यमंत्री लुईस प्रोटो बार्बोसा यांची विधिमंडळ सदस्यता रद्द करण्यात आल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. अखेर ४२ दिवसांनंतर रवी सीताराम नाईक यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्याने राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.
- चौथा कार्यकाळ : १० फेब्रुवारी १९९९ ते ९ जून १९९९ : सत्ताधारी काँग्रेस पक्षातील बंडखोरीमुळे विद्यमान मुख्यमंत्री लुइझिनो फलेरो यांचे सरकार अल्पमतात आल्याने कोसळले. राज्यात चौथ्यांदा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. नंतर विधानसभा विसर्जित केली गेली व नव्याने निवडणुका होऊन सरकार स्थापन करण्याकरता राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.
- पाचवा कार्यकाळ : ४ मार्च २००५ ते ७ जून २००५ : नव्याने मुख्यमंत्री झालेल्या प्रतापसिंह राणे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावात फेरफार करून बहुमत सिद्ध केल्याच्या प्रकरणावरून राणेंचे सरकार बरखास्त केले गेले व राज्यात पाचव्यांदा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. ९५ दिवसांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रतापसिंह राणेंचे सरकार पुनःस्थापित झाल्याने राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.