कामगार साहित्य संमेलन

महाराष्ट्र शासनाने सन १९५३ मध्ये स्थापन केलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून कामगार साहित्य संमेलने भरवण्यात येतात. या मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत १७ संमेलनांचे आयोजन करण्यात आले असून पहिले कामगार साहित्य संमेलन ९ व १० जानेवारी १९९२ रोजी पुणे येथे भरवण्यात आले होते. पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री नारायण सुर्वे तर उद्घाटक श्री मधु मंगेश कर्णिक होते. शेवटचे १७ वे कामगार साहित्य संमेलन २४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरज जि. सांगली येथे संपन्न झाले असून जेष्ठ साहित्यिका व लोक संस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष तर डॉ राजा दीक्षित, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ हे उद्घाटक होते. तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे हे स्वागताध्यक्ष तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे हे या साहित्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह होते.

यापूर्वी झालेली कामगार साहित्य संमेलने संपादन

हे सुद्धा पहा संपादन