आगवण (डहाणू)

(आगवण(डहाणू) या पानावरून पुनर्निर्देशित)

आगवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.

  ?आगवण

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १.४०३२१ चौ. किमी
जवळचे शहर डहाणू
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
३,९९३ (२०११)
• २,८४६/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१६०२
• +०२५२८
• एमएच/४८ /०४

भौगोलिक स्थान संपादन

डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे सावटानंतर वाणगाव रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ११ किमी अंतरावर आहे.

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते. ही भाजी अत्यंत चवदार असते. ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते.ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते. आदिवासी बांधवाना पावसाळ्यात हा अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर ह्या भाजीची विक्री आदिवासी समाजातील पुरुष, स्त्रिया आणि मुलेमुली करीत असतात. पालघर, बोईसर, मनोर, सफाळे, केळवे रोड, वाणगाव, डहाणू, वाडा, कुडूस, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी येथील बाजारपेठांमध्ये सुद्धा ही भाजी विक्रीसाठी उपलब्ध असते.[१]

लोकजीवन संपादन

हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ७४१ कुटुंबे राहतात. एकूण ३९९३ लोकसंख्येपैकी २०१८ पुरुष तर १९७५ महिला आहेत. गावाची साक्षरता ५७.२९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६७.८५ आहे तर स्त्री साक्षरता ४६.६३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६१९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.५० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात.येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय,बकरीपालन,कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.

नागरी सुविधा संपादन

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे संपादन

आशागड, जामशेत, सरावळी, चारी तर्फे कोटेबी, मोठापाडा, पाळे, कोटबी, देहाणे, धामणगाव, कोमगाव ही जवळपासची गावे आहेत.आगवण ग्रामपंचायतीमध्ये आगवण आणि मोठापाडा ही गावे येतात.

संदर्भ संपादन

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार दिनांक १८ सप्टेंबर २०२३