अवध एक्सप्रेस
अवध एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वेसेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी आठवड्यातून ४ वेळा मुंबई ते गोरखपूर दरम्यान तर उर्वरित तीन वेळा मुंबई ते मुझफ्फरपूर दरम्यान धावते. १९०३७/१९०३८ अवध एक्सप्रेस मुंबईच्या वांद्रे टर्मिनस ते गोरखपूरच्या गोरखपूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावते तर १९०३९/१९०४० अवध एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस ते बिहारमधील मुझफ्फरपूरच्या मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावते.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bc/19037_Avadh_Express.jpg/250px-19037_Avadh_Express.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/25/19039_Avadh_Express.jpg/250px-19039_Avadh_Express.jpg)
ऐतिहासिक अवध प्रांतावरून ह्या गाडीचे नाव पडले आहे. ही गाडी सुरत, रतलाम, कोटा, आग्रा, कानपूर, लखनौ ह्या मार्गावरून धावते.
तपशील
संपादनगाडी क्रमांक | मार्ग | अंतर | प्रस्थान | आगमन | कधी |
---|---|---|---|---|---|
१९०३७ | मुंबई वांद्रे – गोरखपूर | १८४५ किमी | २२:४० | १३:४५ | रवि, मंगळ, बुध, शुक्र |
१९०३८ | गोरखपूर – मुंबई वांद्रे | १३:२० | ०४:३५ | सोम, बुध, शुक्र, शनि |
गाडी क्रमांक | मार्ग | अंतर | प्रस्थान | आगमन | कधी |
---|---|---|---|---|---|
१९०३८ | मुंबई वांद्रे – मुझफ्फरपूर | २१५५ किमी | २२:४० | २१:५० | सोम, गुरू, शनि |
१९०४० | मुझफ्फरपूर – मुंबई वंद्रे | ०६:०० | ०४:३५ | सोम, बुध, शुक्र, शनि |