ग्रीन हाऊस इफेक्ट

पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अशाच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो.

विवरण संपादन

दुपारी सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडल्यावर ती तापते व नंतर रात्री ती उष्णता उत्सर्जित होऊन ती आकाशाकडे जात असते. या क्रियेस उष्णतेचे प्रारण असे म्हणतात. पृथ्वीस वातावरण असल्याने ही उष्णता नाहीशी होत नाही तर, वातावरणात असलेला कर्ब-द्वी-प्राणीद ((कार्बन-डाय-ऑक्साईड) वायूचे रेणू या कामात महत्त्वाची भूमिका बजावतात असे निदर्शनास आले आहे. हे रेणू अवरक्त प्रारणाने उत्तेजित होऊन ते त्यास ग्रहण करतात,व ते प्रारण पुन्हा भूपृष्ठाकडे पाठवितात.याने पृथ्वीवरील वातावरण रात्रीदेखील उबदार राहते.हा निसर्गतः घडणारा एक 'नैसर्गिक हरितगृह परिणाम' आहे.

कर्ब-द्वी-प्राणीद हा वायू पृथ्वीवरील सर्व जीवांसाठी मदतनीसाचे काम करतो.परंतू तो अल्प प्रमाणात किंवा संतुलित असल्यावरच त्याचे या गुणधर्माचा फायदा होतो. त्यास 'संतुलित हरितगृह परिणाम' असे म्हणतात.

वाईट परिणाम संपादन

या कर्ब-द्वी-प्राणीद वायूचे तसेच मीथेन, नायट्रस ऑक्साईडबाष्प या हरितगृह वायूचे वातावरणातील प्रमाण संतुलित असेपर्यंतच याची पृथ्वीवरील जीवांना मदत होते. या वायूचे वातावरणातील प्रमाण भरमसाठ वाढल्यास याचे खूपच तोटे आहेत.याचे जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतात. हे सर्व वायू सूर्यप्रकाशातील अवरक्त प्रारणे शोषून त्यास पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात परावर्तीत करतात.या वायूच्या दाट थारांमुळे ही अवरक्त प्रारणे परावर्तीत होऊन अंतराळात जात नाहीत. त्यामूळे वैश्विक तापमानवाढ (ग्लोबल वार्मिंग) होत असते.या परिणामास 'असंतुलित हरितगृह परिणाम' म्हणतात. तापमानवाढीमुळे ध्रुवीय प्रदेशांतील बर्फ वितळते आहे. त्यामुळे महासागरांची पातळी वाढते, व किनारपट्ट्या पाण्याखाली जातात. त्याचप्रमाणे महासागरांचे तापमानही वाढते, व त्याचा परिणाम म्हणून जगभरातील पर्जन्यचक्र बिनसले आहे. याचे अनेक स्थानिक परिणाम दिसतात. काही ठिकाणी अतिवृष्टी होते, तर काही ठिकाणी दुष्काळ पडतात. काही ठिकाणी समुद्री वादळांची वारंवारिता व तीव्रता वाढते. थंड प्रदेशातील हिमवर्षावांची तीव्रता वाढते. या सर्व बदलांमुळे मनुष्यहानी व वित्तहानी होते आहे.

जागतिक तापमानातवाढ होत आहे यामुळेच आरोग्यावर परिणाम होत आहेत हरित गृह वायू मुळे आपल्या पृथ्वी भोवतालचे ओझोनचे आवरण पातळ होत चालले आहे. यातच भर म्हणून क्लोरो फ्लुरो कार्बन ( सी एफ सी ) मुळे या ओझोनच्या आवरणाला छिद्रे पडत आहेत. या छिद्रांमुळे सूर्यप्रकाशातील अतिनील प्रारणे अधिक प्रमाणात पृथ्वीवर पोहोचतात. गोऱ्या कातडीच्या लोकांमध्ये यामुळे त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे.

या परिणामास नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

हरित गृह वाढण्याचे उद्दिष्टे संपादन

यासाठी हरितगृह वायूंचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे व पृथ्वीतर्फे होणारे अवरक्त प्रारणांचे प्रमाण अत्यल्प ठेवणे असा आहे.

हे सुद्धा पहा संपादन