"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर/१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३७:
१९३४ मध्ये डॉ. आंबेडकरांनी [[र.धों. कर्वे|र.धों. कर्वेंचे]] वकीलपत्र घेतले होते. हा खटला [[समाजस्वास्थ्य (नियतकालिक)|समाजस्वास्थ]] या कर्व्यांच्या मासिकाविरुद्धचा हा ऐतिहासिक खटला होता. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून कर्वे यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या या मासिकातून ते लैंगिक ज्ञानाबद्दल मजकूर लिहायचे व प्रसिद्ध करायचे. त्यासोबतच नैतिकच्या, अश्लीलतेच्या मुद्द्यांवरुन हा खटला कर्व्यांवर केलेला होता. कर्वे आणि डॉ. आंबेडकर १९३४ मध्ये हा खटला हरले व कर्व्यांना २०० रूपयांचा दंड झाला होता.<ref>https://www.bbc.com/marathi/india-42236452</ref>
 
[[शहापूर तालुका|शहापूर तालुक्यातील]] [[किन्हवली]] येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३०च्या [[इंडियन पिनल कोड]]च्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व [[दादर]]च्या [[हिंदू कॉलनी, दादर|हिंदू कॉलनी]]मध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगतले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारुन डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी [[ठाणे]] येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.{{संदर्भ हवा}}<ref>http://prahaar.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2/</ref> सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवले. [[वाशिंद]] येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.<ref>http://prahaar.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2/</ref>
 
----
आंबेडकरांनी जे खटले लढले ते गोरगरिबांसाठी व समाजातील वंचित वर्गाकडून सामाजिक भावनेने लढले.{{संदर्भ हवा}} आंबेडकरांनी [[माढा तालुका]] न्यायालयात व [[सोलापूर जिल्हा]] न्यायालयात खटले लढले. स्वातंत्रसेनानी [[शंकरराव मोरे]] व [[शंकरराव जेधे]] यांनी पुणे येथे केलेल्या भाषणात [[अण्णासाहेब भोपटकर]] यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे भोपटकरांनी याबाबत पुणे न्यायालयात मोरे व जेधे यांच्याविरूद्ध खटला दाखल केला. शंकरराव मोरे, शंकरराव जेधे व आंबेडकर यांच्यात तीव्र राजकीय वैमनस्य असतानाही त्यांनी आपले वकीलपत्र आंबेडकरांना दिले. या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी आंबेडकरांनी भोपटकरांची भेदक उलटतपासणी केली व उत्तरे देताना भोपटकरांची दमछाक झाली. त्यांची उलटतपासणी अपूर्ण राहिल्यामुळे त्यांनी पुढील तारीख घेतली. त्यानंतर त्यांनी पुढील तारखेस खटलाच काढून घेतला. आंबेडकर यांची कुशाग्र बुद्धी व इंग्लिशवरील असामान्य प्रभुत्व यामुळे न्यायाधीश सुद्धा त्यांचा युक्तिवाद ऐकताना दंग होऊन जायचे.{{संदर्भ हवा}} पुढे समाजसेवेमुळे त्यांनी वकिली व्यवसाय कमी केला.<ref>{{Cite web|url=http://marathi.webdunia.com/baba-saheb-ambedkar-marathi/babasaheb-ambedkar-113120600010_1.html|title=आंबेडकर- एक निष्णात वकील|website=marathi.webdunia.com}}</ref>