सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर/१

माहितीचौकट संपादन

टोपणनाव: बाबासाहेब, बोधिसत्त्व, भीमा, भिवा, भीम
चळवळ: दलित बौद्ध चळवळ आणि इतर सामाजिक चळवळी व सत्याग्रहे
शिक्षण:  • मुंबई विद्यापीठ
 • कोलंबिया विद्यापीठ
 • लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
 • ग्रेज इन्, लंडन
 • बॉन विद्यापीठ, जर्मनी
पदव्या: बी.ए., एम.ए., पी.एचडी., एम.एससी., डी.एससी., बार-ॲट-लॉ, एल.एल.डी., डी.लिट.
संघटना:  • बहिष्कृत हितकारिणी सभा
 • समता सैनिक दल
 • स्वतंत्र मजूर पक्ष
 • डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी
 • शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन
 • पीपल्स एज्युकेशन सोसायटी
 • द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट
 • भारतीय बौद्ध महासभा
 • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
अवगत भाषा: मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच, कन्नडपारशी.
कार्यक्षेत्र: समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा, राजकारण, मानववंशशास्त्र, घटनाशास्त्र, पत्रकारिता, इतिहास, शिक्षण, तत्त्वज्ञान, धर्म, लेखन, मानवी हक्क, समाजिक सुधारणा, जलशास्त्र इत्यादी.
पत्रकारिता/ लेखन:  • मूकनायक (१९२०)
 • बहिष्कृत भारत (१९२७)
 • समता (१९२८)
जनता (१९३०)
 • प्रबुद्ध भारत (१९५६)
पुरस्कार:  • भारतरत्न (१९९०)
 • पहिले कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम (२००४)
 • द ग्रेटेस्ट इंडियन (२०१२)
प्रमुख स्मारके: चैत्यभूमी, दीक्षाभूमी, संकल्प भूमी
धर्म: बौद्ध धर्म (नवयान)
प्रभाव: गौतम बुद्ध  • संत कबीर  • महात्मा फुले  • जॉन ड्युई  • ज्यां-जाक रूसो  • व्हाल्टेअर  • थॉमस पेन  • बैंथम  • जॉन स्टुअर्ट मील  • हेरॉल्ड लॉस्की  • अब्राहम लिंकन  • वाशिंगटन  • नेपोलियन बोनापार्ट  • एडविन सेलीग्मन
प्रभावित: आचार्य अत्रे  • ख्रिस्तोफ जाफ्रेलॉट  • गाडगे महाराज  • युजेन इर्श्चिक  • के.आर. नारायणन  • मार्गारेट बार्नेट  • रामनाथ कोविंद  •

एलिनॉर झेलियट  • गेल ऑम्वेट  • नरेंद्र मोदी  • रावसाहेब कसबे  • अमर्त्य सेन  • डी. आर. जाटव  • मायावती  • शरद पवार  • कांशीराम  • आमिर खान  • ल्युडवीन व्हॉन माईजेस  • पंजाबराव देशमुख  • सदा करहाडे  • गंगाधर पानतावणे  • म.ना. वानखेडे  • यशवंत मनोहर  • शांताबाई दाणी  • राजा ढाले  • नामदेव ढसाळ  • ताराचंद्र खांडेकर  • अरूंधती रॉय इतर


वकिली संपादन

१९३४ मध्ये डॉ. आंबेडकरांनी र.धों. कर्वेंचे वकीलपत्र घेतले होते. हा खटला समाजस्वास्थ या कर्व्यांच्या मासिकाविरुद्धचा हा ऐतिहासिक खटला होता. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून कर्वे यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या या मासिकातून ते लैंगिक ज्ञानाबद्दल मजकूर लिहायचे व प्रसिद्ध करायचे. त्यासोबतच नैतिकच्या, अश्लीलतेच्या मुद्द्यांवरुन हा खटला कर्व्यांवर केलेला होता. कर्वे आणि डॉ. आंबेडकर १९३४ मध्ये हा खटला हरले व कर्व्यांना २०० रूपयांचा दंड झाला होता.[१] प्रामुख्याने लैगिक विषयांना वाहिलेले कर्वेंचे 'समाजस्वास्थ्य' हे मासिक रुढीवाद्यांच्या टीकेला दुर्लक्ष करत वैयक्तिक प्रश्नांना सार्वजनिकरीत्या उत्तर देत असे. त्यासोबतच नैतिकच्या, अश्लीलतेच्या मुद्द्यांवर नवी आधुनिक भूमिका घेत प्रकाशित होत असे. विज्ञानाची आणि वैद्यकीय शास्त्राची बैठक त्यांच्या या कार्यामागे होती. मात्र तेव्हाच्या रूढीवादी समाजातल्या कर्मठ व्यक्ती कर्व्यांच्या शत्रू झाल्या. विखारी सामाजिक टीकेसोबतच न्यायालयीन लढाही कर्व्यांच्या वाट्याला आला. त्यावेळचे सामाजिक वा राजकीय नेतृत्व इतके प्रगल्भ नव्हते की त्याला कर्वे जे विषय हाताळताहेत ते समाजाच्या एकंदरित स्वास्थ्यासाठी, आधुनिक समाजासाठी अत्यावश्यक होते हे समजावे. अपवाद फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा, जे आधुनिक विचारांची कास धरत, न्यायालयात वकिल म्हणून र.धों. कर्व्यांच्या मागे उभे राहिले. कर्व्यांची विषयनिवड आणि पुराणमतवाद्यांना टीका यांच्यामुळे त्यांच्यावर कर्मठ सनातन्यांनी इ.स. १९३१ मध्ये पहिला खटला दाखल केला. फिर्यादी तक्रारदार पुण्यातले होते आणि 'व्यभिचाराचे प्रश्न' या लेखामुळे कर्वेंना अटकही करून १०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कर्वे उच्च न्यायालयात जेव्हा या शिक्षेविरोधात अपीलात गेले तेव्हा हा खटला इंद्रवदन मेहता या न्यायाधीशांसमोर चालला आणि त्यांचे अपील फेटाळले गेले. १९३४ च्या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा त्यांना अटक झाली. यावेळेस कारण होते 'समाजस्वास्थ्य'च्या गुजराती अंकात वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी दिलेले प्रश्न क्रमांक ३, ४ आणि १२ ची उत्तरे. हे प्रश्न वैयक्तिक समस्यांबाबत होते. हस्तमैथुन, समलिंगी संभोग यांसारख्या विषयांना आणि उत्तरांना अश्लील ठरवत पुन्हा एकदा कर्व्यांना न्यायालयीन लढाई लढावी लागली. पण यावेळेस वकील म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा न्यायाधीश इंद्रवदन मेहता यांच्यासमोरच हा खटला चालला. त्याची नैतिकता, अश्लीलता आणि लैंगिकतेच्या सामाजिक आणि कायद्याच्या लढाईत एक दस्तऐवज म्हणून नोंद होते. "कर्व्यांचा हा खटला जो बाबासाहेबांनी लढवला त्यात एक वाचक लैंगिक समस्येबद्दल प्रश्न विचारतात आणि कर्वे त्यांना उत्तर देतात. यासाठी सरकार रूढीवाद्यांना बरे वाटावे म्हणून कर्वेंविरुद्ध कारवाई करते, हे बाबासाहेबांना भयानकच वाटले असणार. 'समाजस्वास्थ्य'चा मुख्य विषय हा लैंगिक शिक्षण, स्त्री पुरुष संबंध होता. त्याविषयी सर्वसामान्य वाचकांनी जर प्रश्न विचारले असतील, तर उत्तर का द्यायचे नाही, असा बाबासाहेबांचा प्रश्न होता. 'समाजस्वास्थ्य'ने अशा प्रश्नांना उत्तरे न देणे म्हणजे कामच थांबवणे असे होते ना?" असे अजित दळवी म्हणतात, ज्यांनी या खटल्यावर आधारित लिहिलेल्या 'समाजस्वास्थ्य' नावाच्या नाटकाचे अनेक प्रयोग केले आहेत. १९३४ सालच्या २८ फेब्रुवारी ते २४ एप्रिल या दरम्यान 'समाजस्वास्थ्य'च्या या खटल्याची सुनावणी चालली. डॉ. आंबेडकरांसोबत त्यांचे सहकारी असईकर यांनीही या खटल्याचे काम पाहिले. आंबेडकरांनी कोर्टात पहिला युक्तिवाद असा केला की "लैंगिक विषयांवर कोणीही लिहिले तर त्याला अश्लील ठरवता कामा नये." न्यायाधीशांनी असे आर्ग्युमेंट केले की विकृत प्रश्न छापायचेच कशाला आणि तसे प्रश्न असतील तर त्यांना उत्तरच कशाला द्यायचं? त्यावर बाबासाहेबांनी उत्तर असे दिले आहे की, जर ती विकृती असेल तर ती ज्ञानानेच जाईल. नाही तर कशी जाईल? त्यामुळे प्रश्नाला कर्व्यांनी उत्तर देणे हे क्रमप्राप्तच आहे. समलिंगी संबंधांच्या बाबतीत आंबेडकरांनी हॅवलॉक एलिससारख्या तज्ज्ञांच्या ग्रंथांचे, संशोधनाचे दाखले दिले. त्यांच्यात जर तशी जन्मतःच भावना असेल, तर त्यात काही गैर आहे असे मानण्याची काही गरज नाही. त्यांना वाटते त्या प्रकारे आनंद मिळवण्याचा अधिकार आहे. दोन महत्त्वाच्या अधिकारांबद्दल इथे बाबासाहेब भूमिका घेतात. एक लैंगिक शिक्षणाचा अधिकार. त्या विषयाच्या आड येणाऱ्या कोणत्याही बुरसटलेल्या विचारांना आड येऊ देण्यास बाबासाहेब तयार नाहीत. र.धों. कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३४ मध्ये हा खटला हरले. कर्व्यांना २०० रूपयांचा दंड झाला. "माझ्या नजरेतून, भारतीय समाजात हा जो लैंगिकतेचा प्रश्न होता, तो वैदिक परंपरेशी निगडित होता. संतपरंपरा मानणारे उदारमतवादाच्या रस्त्यावर निघाले होते, पण वैदिक परंपरा मानणारे सवर्ण हे योनिशुचितेसारख्या मुद्द्यावर त्या काळी अडून होते. त्यामुळे बाबासाहेबांची भूमिका ही अशा पारंपरिक लैंगिकतेच्या भूमिकेशी विरोधी होती," असे मत प्रकाश आंबेडकर मांडतात. "बाबासाहेबांच्या एकंदर संघर्षाच्या भूमिकेशी त्यांचा हा खटला सुसंगत आहे. त्यांचा लढा हा व्यक्तिस्वातंत्र्यासाठी आहे. १९२७ मध्ये त्यांनी 'मनुस्मृती' जाळली आहे. का? कारण ती व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरच घाला आणते ना? जिथे जिथे व्यक्ती आणि तिच्या स्वातंत्र्याचे लढे उभे आहेत, तिथे तिथे बाबासाहेबांनी त्याला पाठिंबा दिला आहे. हाही लढा त्यातलाच आहे," बाबासाहेबांचे नातू आणि स्वतः वकील असलेले प्रकाश आंबेडकर सांगतात.[२]


  झाले. शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३०च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगतले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारुन डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.[३] सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.[४]


आंबेडकरांनी जे खटले लढले ते गोरगरिबांसाठी व समाजातील वंचित वर्गाकडून सामाजिक भावनेने लढले.[ संदर्भ हवा ] आंबेडकरांनी माढा तालुका न्यायालयात व सोलापूर जिल्हा न्यायालयात खटले लढले. स्वातंत्रसेनानी शंकरराव मोरेशंकरराव जेधे यांनी पुणे येथे केलेल्या भाषणात अण्णासाहेब भोपटकर यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे भोपटकरांनी याबाबत पुणे न्यायालयात मोरे व जेधे यांच्याविरूद्ध खटला दाखल केला. शंकरराव मोरे, शंकरराव जेधे व आंबेडकर यांच्यात तीव्र राजकीय वैमनस्य असतानाही त्यांनी आपले वकीलपत्र आंबेडकरांना दिले. या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी आंबेडकरांनी भोपटकरांची भेदक उलटतपासणी केली व उत्तरे देताना भोपटकरांची दमछाक झाली. त्यांची उलटतपासणी अपूर्ण राहिल्यामुळे त्यांनी पुढील तारीख घेतली. त्यानंतर त्यांनी पुढील तारखेस खटलाच काढून घेतला. आंबेडकर यांची कुशाग्र बुद्धी व इंग्लिशवरील असामान्य प्रभुत्व यामुळे न्यायाधीश सुद्धा त्यांचा युक्तिवाद ऐकताना दंग होऊन जायचे.[ संदर्भ हवा ] पुढे समाजसेवेमुळे त्यांनी वकिली व्यवसाय कमी केला.[५]

कृषी व शेतकऱ्यांसाठी कार्य* संपादन

कृषी व शेती संबंधीचे विचार संपादन

शेती व्यवसायाचा संबंध त्यांनी समाजव्यवस्थेशी जोडला होता. ग्रामीण भागातील जातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेमध्ये शोधलं होतं. त्यामुळेच जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावं लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकर्‍यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. हे बदल सामाजिक परिवर्तनासाठी पोषक ठरतील. आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे त्यांना वाटत होते.[ संदर्भ हवा ]

शेतीसाठी जमीनपाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकर्‍याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटीश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोर्‍यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोर्‍यांची विभागणी केली. यावरून डॉ. बाबासाहेब यांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.[ संदर्भ हवा ]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकर्‍यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकर्‍यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकर्‍यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.[ संदर्भ हवा ]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोर्‍यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचाच प्रभाव दिसून येतो. डॉ. बाबासाहेब यांचे शेतीबाबतचे विचारधन राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.[ संदर्भ हवा ]

शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभाग व खोती पद्धतीवर बंदी संपादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप इ.स. १९२८-१९३४ या कालावधीत चरी(रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप ७ वर्ष सुरु होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी संघर्ष केला.[ संदर्भ हवा ]

१४ एप्रिल १९२९ रोजी रत्नागिरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु केले. या संबंधी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले. १० जानेवारी १९३८ रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.[ संदर्भ हवा ]

सप्टेंबर १९१८ मध्ये शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली.[ संदर्भ हवा ] श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी;तसेच शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला.[ संदर्भ हवा ]

स्त्रियांसाठी कार्य* संपादन

 
बाबासाहेब आंबेडकर ८ जुलै १९४२ रोजी नागपूर येथे फेडरेशनच्या परिषदेत अनुसूचित जाती महासंघाच्या (शेकाफे) महिला प्रतिनिधींसोबत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता.[ संदर्भ हवा ] बाबासाहेबांच्या मते, गौतम बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत.[ संदर्भ हवा ] ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉक्टर रूपा कुळकर्णी-बोधी यांच्या मते, "भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या भक्कम अशा समतावादी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे, बाहेरून आयात केलेल्या एखाद्या जेंडर बेस्ड विचारावर नाही! आणि कायद्याएवढेच बाबासाहेबांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली ही शुद्ध भारतीय बैठक!"[ संदर्भ हवा ]

बाबासाहेबांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते.[ संदर्भ हवा ] समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे त्यांना विद्यार्थिदशेतच लक्षात आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली इथे मुलींनाही प्रवेश दिला.[ संदर्भ हवा ]

 
अखिल भारतीय अस्पृश्य महिला परिषद, नागपूर, १९४२

खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या अनेक निर्णय आंबेडकरांनी घेतले होते. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत. भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.[ संदर्भ हवा ]

बाबासाहेबांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता.[ संदर्भ हवा ] बाबासाहेबांच्या मते सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधांची पायाभरणी करणे आवश्यक होते. तथापि, या बिलास प्रतिगामी हिंदू शक्तींसमोर हार पत्करावी लागली.[ संदर्भ हवा ]

संविधानात आर्थिक प्रश्नांवर समान अधिकाराची तत्त्वे समाविष्ट करून अपेक्षित परिणाम होणार नाही, तर त्यासाठी हिंदू संहितेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय यांमागची मूळ कारणे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, याविषयी बाबासाहेब ठाम होते. घटनेला समांतर अशी परिपूर्ण हिंदू संहिता असावी, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच बाबासाहेबांनी  दिला. त्यांनी कुटुंबाचे योग्य नियोजन स्त्रियांशीच निगडित असल्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते.

बाबासाहेबांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. १९२७चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३०चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व १९४२च्या नागपुरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लग्न ही मुलीच्या प्रगतीमधली अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये, “लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी. ती नवर्‍याची गुलाम व्हायला नको.” असे ते म्हणत. बायको कशी असावी, याबाबत पुरुषाचे मत घेतले जाते, तद्वतच स्त्रीचेही नवऱ्याविषयीचे मत, आवडी-निवडी विचारत घेतल्या पाहिजेत.

स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वत:ही पुढे यायला हवे, हा विचार आंबेडकरांनी मांडला. बाबासाहेबांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत. पण अनेक उच्चभ्रू आणि बहुजन समाजातल्या स्त्रिया बाबासाहेबांच्या या कार्याविषयी अनभिज्ञ आहेत किंवा याबाबत जाणून घ्यायला तयार नाहीत. काही अभ्यासक व चळवळीतल्या उच्चवर्णीय आणि दलित स्त्रियांनीच बाबासाहेबांच्या योगदानाची दखल घेतली असल्याचे दिसून येते. बाबासाहेबांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या, त्याचा लाभ दलित-बहुजन स्त्रियांपेक्षा उच्चवर्णीय स्त्रियांनाच अधिक प्रमाणात झाला.

धर्मांतराची घोषणा* संपादन

 
येवले येथे धर्मांतराची घोषणा करताना बाबासाहेब आंबेडकर, १३ ऑक्टोबर १९३५.

आंबेडकर हे देशातील दलितांना सामाजिक न्याय व समता मिळवून देण्यासाठी संघर्ष करत होते. स्पृश्य तसेच सवर्णांच्या मनात कधी तरी अस्पृश्यांबद्दल सद्भावना जागृत होईल आणि अस्पृश्यांना ते समतेची वागणूक देतील या आशेवर ते सतत प्रयत्‍नशील होते. त्यासाठी त्यांनी इ.स. १९२७ मध्ये महाडचा सत्याग्रह केला, त्यानंतर नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणूनही सत्याग्रहाचा चालवला, आणि तो अयशस्वी झाला. तेव्हा बहुतांश स्पृश्य हिंदूंना अस्पृश्य हे त्यांच्या बरोबरीचे वाटेना. स्पृश्यांनी अस्पृश्यांचा मंदिर प्रवेश कायम नाकारला. हिंदू धर्म व स्पृश्य हिंदू लोक अपरिवर्तनीय आहेत याची खात्री आंबेडकरांना झाली, त्यामुळे त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. 'ज्या धर्मात आम्हाला कुत्र्या मांजराचीही किंमत दिली जात नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही' असा निर्धार आंबेडकरांनी अस्पृश्यांना बोलून दाखवला. त्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण धर्मत्यागाच्या बाजूने आलेला कल लक्षणीय होता. आपल्या समाजातील मोठा जनसमुदाय या हिंदू धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्यावर आंबेडकरांनी दुसरा कोणता धर्म स्वीकारायचा यावरही विचार सुरु केला. त्यांना भेदभाव नसलेला, जातविरहीत व विज्ञानिष्ठ असा धर्म हवा होता. १३ ऑक्टोबर१९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे अस्पृश्यांची एक परिषद भरली, त्यात भारताच्या कानाकोपऱ्यातून दहा हजारांवर अस्पृश्य आले होते. येवला परिषदेत अमृत धोंडिबा रणखांबे यांनी आंबेडकरांचे स्वागत केले. या सभेत आंबेडकरांचे हिंदू धर्माचा समाचार घेणारे भाषण झाले. ते म्हणाले, “मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वांनी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षांचा संघर्ष व्यर्थ गेला. हिंदूंच्या पाषाणहृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे, हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकीचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानुष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुसऱ्या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुसऱ्या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय?"

आंबेडकरांनी घोषणा केली की,

मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेचे हिंदू समाजव्यवस्थेला दिलेला मोठा धक्का होता. परिवर्तनवादी विचारवंतांनी या घोषणेचे स्वागत केले.[६] भाषणाच्या शेवटी आंबेडकर अस्पृश्यांना सांगतात की, "आता हा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह बंद करा. पाच वर्ष आपण खूप खटाटोप केली. हिंदूंच्या हृदयात आपल्यासाठी अजिबात स्थान नाही तेव्हा आता हा धर्म सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत. एक नवे पर्व सुरू होत आहे. आम्हांला देवाच्या दर्शनासाठी वा भक्तिभावासाठी म्हणून हा प्रवेश पाहिजे होता असे नव्हे तर समानतेचा अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता. जेव्हा यांचा देव आणि हे आम्हांला प्रवेश देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले, तेव्हा आता आम्हीही निर्णायक वळणावर आलोत. मानवी मूल्ये नाकारणाऱ्यांना नाकारण्याच्या निर्णयावर आलोत. जातिभेद मानणारा असा हा यांचा देवही नको व त्याचा धर्मही नको. आपल्या वाटा आपणच शोधू या. अन आता नव्या धर्मात जाण्याच्या तयारीला लागू या."

धर्मविषयक दृष्टिकोन व धर्मचिकित्सा* संपादन

https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1913388?diffmode=source

धर्मांतराच्या घोषणेनंतर आंबेडकर हिंदू धर्माचा त्याग करून दुसऱ्या कुठल्यातरी धर्मात प्रवेश करणार याची बातमी सर्व धर्मीयांपर्यंत गेली. जगातील विविध धर्मगुरु व धर्मप्रसारकांनी आंबेडकरांना व त्यांच्या अनुयायांना आपल्या धर्मात आणावे यासाठी अनेक प्रयत्‍न केले. धर्मगुरूंकडून आंबेडकरांचे निवासस्थान राजगृहावर देश विदेशांतून अनेक पत्रे व तारा आल्या.

शीख धर्माची चाचपणी संपादन

१३ व १४ एप्रिल १९३६ रोजी अमृतसर येथे शीख मिशनरी परिषद भरली होती. देशभरातून आलेले अस्पृश्य वर्गाचे लोक या परिषदेस हजर झाले. आंबेडकरही आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसकट इथे हजर होते. सेवानिवृत्त न्यायाधीश सरदार बहाद्दुर हुकूमसिंग हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत केरळचे अस्पृश्य समाजाचे नेते डॉ. कुदीर व इतर काहींनी शीख धर्माचा जाहीर आणि विधिवत स्वीकार केला. या परिषदेत आंबेडकरांचे एक भाषण झाले, त्यात ते म्हणाले की, "हिंदूंनी जातीयवादाच्या अमानवी कृत्यांनी माझ्या बांधवांच्या कित्येक पिढ्यांवर गुलामाचे, दारिद्र्याचे व पराकोटीचे वेदनामय जीवन लादले, अत्यंत घृणास्पद नि खालच्या दर्जाची वागणूक दिली. या धर्मात समतेचा असलेला अभाव मानवी जीवनास हानिकारक आहे. त्या मानाने शीख धर्मातील समतेची तत्त्वे समाजाला एकसंघ ठेवण्यात व उत्कर्ष करण्यास अत्यंत अनुकूल व प्रगतिप्रवर्तक आहेत. त्यामुळे मला शीख धर्म मनातून आवडू लागला आहे." हिंदू धर्माचा त्याग करणे निश्चित झाले आहे. धर्मांतर करण्याचा निर्णय अढळ आहे, फक्त तो केव्हा करायचे हे अजून ठरायचे आहे. शीख धर्माकडील त्यांचा विशेष झुकाव होता. पण जो कुठला धर्म स्वीकारायचा त्याचा खोलवर अभ्यास करून, मानवी मूल्यास असलेली पोषकता तपासून सर्व शंकाकुशंकांचे निराकरण झाल्यानंतरच धर्मांतर करायचे असे मत आंबेडकरांचे होते. आपले चिरंजीव यशवंत आंबेडकर व पुतण्या मुकंद यांना बाबासाहेबानी अमृतसर येथील गुरुद्वारात वास्तव्यास पाठविले. या वास्तव्याच्या काळात गुरुद्वारातील शीख बांधवांनी या दोन तरुणांचे मोठे आदरातिथ्य केले. दोन महिन्यानंतर ही मुले परत आली. मुलगा व पुतण्या यांनी दिलेल्या वृत्तांताचा हा सकारात्मक परिपाक होता. १८ सप्टेंबर १९३६ रोजी बाबासाहेबांनी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी काही तरूण कार्यकर्त्यांना अमृतसरला गेले.[७] ही तुकडी अमृतसरला पोहचून तिने शीख धर्माचा अभ्यास सुरू केला. दरम्यान काळात झालेल्या पत्रव्यवहारात शीख धर्माचे गुणगाण गाणारी अनेक पत्रे बाबासाहेबांना मिळाली. उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रांत बाबासाहेबांनी या सर्व तरुणांचे अभिनंदन केले व धर्माचा अभ्यास करण्यास शुभेच्छा दिल्या. याच दरम्यान या तेरा सदस्यांवर शीख धर्माचा मोठा इतका प्रभाव पडला की त्या सर्वांनी बाबासाहेबांची परवानगी न घेता शीख धर्माची दीक्षा घेऊन टाकली. आंबेडकरांनी त्यांना धर्माच्या अभ्यासासाठी पाठवले होते. धर्म स्वीकारण्याचा निर्णय अजून व्हायचा होता. ते सर्व सदस्य आंबेडकरी दलित चळवळीतून बाहेर फेकले गेले. पुढे शीख मिशनचे नेते व आंबेडकर यांच्यातील मतभेद वाढले. त्यांचा शीख धर्म स्वीकारण्याचा विचार मागे पडला.

ख्रिश्चन धर्म संपादन

ख्रिश्चनांचे धर्मगुरू बिशप ब्रेन्टन थॉबर्न ब्रॅडले व मुंबईच्या मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्चचे बिशप या दोघांनी आंबेडकरांना ख्रिश्चन धर्म स्वीकारून आपल्या अस्पृश्य बांधवांचा उद्धार करून घ्यावा अशी विनंती केली. यावेळी त्यांनी त्यांच्या धर्मात आधीपासूनच कसा अस्पृश्य समाज धर्मांतरित होऊन मोठ्या सन्मानाने जगत आहे याचे दाखले दिले. ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे असलेल्या अमाप पैशांचा कसा दलितांच्या उद्धारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येईल याचीही कल्पना दिली. [ संदर्भ हवा ]

इस्लाम संपादन

विधिमंडळाचे एक मुसलमान सदस्य गौबा यांनी आंबेडकरांना तार करत इस्लाम मध्ये येण्याचे आवाहन केले. त्यावेळी निजामाच्या राज्यातून काही मुस्लिम धर्मगुरू आंबेडकरांना भेटण्यासाठी आले. बाबासाहेबांनी इस्लाम स्वीकारल्यास हैद्राबादच्या निजामांकडून पैशांच्या सुविधांची बरसात केली जाईल हे सांगण्यात आले. त्याच बरोबर अस्पृश्यांनी इस्लाम स्वीकारल्यास त्यांच्या केसालाही हात लावण्यास हिंदूंचा कसा थरकाप उडेल हे सुद्धा आंबेडकरांना ठासून सांगण्यात आले. अस्पृश्यांना हिंदूंच्या छळातून मुक्त करण्याचा खरेतर हा सोपा मार्ग होता. पण आंबेडकरांना अस्पृश्यांची फक्त हिंदूपासून मुक्ती करावयाची नव्हती तर त्यांना समतेची वागणूक मिळवून देण्याबरोबरच सर्व आघाड्यावर स्त्री व पुरुष यांचा वैयक्तिक पातळीवरही मोठा बदल घडवून आणावयाचा होता. शैक्षणिक क्रांती घडवून आणावयाची होती. बौद्धिक पातळीवर मजल मारायची होती. आंबेडकरांना निजामाच्या प्रलोभनांना नकार दिला व इस्लामचा मार्ग नाकारला.[ संदर्भ हवा ]

बौद्ध धर्म संपादन

बौद्ध धम्माच्या बनारस येथील महाबोधी संस्थेच्या कार्यवाहकांनी आंबेडकरांना तार केली. "भारतात जन्मलेल्या, जातिभेद न मानणाऱ्या, सर्वांना समान समजणाऱ्या आमच्या बौद्ध धम्मात आपण व आपले अनुयायी आल्यास तुम्हा सर्वांचा उत्कर्ष होईल. मानवी मूल्ये जोपासणारा आमचा बौद्ध धम्म उभ्या जगात पसरला आहे. भूतलावरील प्रत्येक कानाकोपऱ्यात आमच्या बौद्ध धम्माचे अनुयायी आहेत. आशिया खंडातील बहुसंख्य लोक बौद्ध धर्मीय आहेत. ईश्वराला महत्त्व न देणारा व समस्त मानव जातीला स्वातंत्र्य, समता व बंधूत्व शिकविणारा आमचा बौद्ध धम्म तुमचा तेजोमय भविष्य घडवून आणेल. तळागाळातल्या लोकांच्या प्रती करुणा बाळगणारा बौद्ध धम्म तुम्हा सर्वांचा इतिहास रचेल" अशा प्रकारचा एकंदरीत संदेश आंबेडकरांना मिळाला.

मनुस्मृती दहन संपादन

शूद्रांवर कशा प्रकारचे अन्याय ब्राह्मणी हिंदू वाङमयाने वा शास्त्राने केलेले आहेत, ते थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत.

  • समाजात शुद्राचे स्थान सर्वांच्या पायदळी असावे.[८]
  • शुद्र अपवित्र असल्यामुळे कोणतेच धार्मिक पवित्र कार्य त्याच्या उपस्थितीत करू नये.[९]
  • इतर वर्गाप्रमाणे त्याला मान देऊ नये.[१०]
  • ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या जीवासारखी शूद्राच्या जीवास एका कवडीची पण किंमत नाही. कसल्याच प्रकारची नुकसान भरपाई न देता शुद्राचा जीव घेण्यास कसलीच आडकाठी असू नये.[११]
  • शुद्राने शिक्षण घेऊ नये. त्यांना शिक्षण देणे हे पाप आहे.[१२]
  • शुद्राला कसल्याच प्रकारची संपत्ती कमविण्याचा हक्क नाही. जर ब्राह्मणास आवश्यक असेल तर त्याने शुद्रांची कमविलेली संपत्ती घ्यावी.[१३]
  • सरकार दरबारी शुद्रास नोकरीस ठेवू नये.[१४]
  • वरिष्ठ वर्गाची सेवाचाकरी हेच शुद्राचे मुख्य कर्तव्य आहे. हाच त्याचा धर्म आहे आणि त्यातच त्याची मुक्ती आहे.[१५]
  • उच्चवर्णियांनी शुद्राशी आंतरजातीय विवाह करू नयेत. शुद्राची स्त्री रखेल म्हणून ते ठेवू शकतात. उच्चवर्णीय स्त्रीस शुद्राने नुसता स्पर्श जरी केला तरी, त्यास जबर शिक्षा करावी.[१६]
  • शुद्राचा जन्म गुलामगिरीत होतो आणि त्याने गुलामगिरीतच मरावे.[१७]

संदर्भ संपादन

  1. ^ https://www.bbc.com/marathi/india-42236452
  2. ^ https://www.bbc.com/marathi/india-42236452
  3. ^ http://prahaar.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2/
  4. ^ http://prahaar.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2/
  5. ^ "आंबेडकर- एक निष्णात वकील". marathi.webdunia.com.
  6. ^ "eSakal". archive.is. 2013-08-21. 2018-03-14 रोजी पाहिले.
  7. ^ Singh, H. "Letters: Dr. Ambedkar and Sikh Leadership of 1930s | Sikh24.com". www.sikh24.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-15 रोजी पाहिले.
  8. ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. १३ व १४.
  9. ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. १३ व १४.
  10. ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. १३ व १४.
  11. ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. १३ व १४.
  12. ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. १३ व १४.
  13. ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. १३ व १४.
  14. ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. १३ व १४.
  15. ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. १३ व १४.
  16. ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. १३ व १४.
  17. ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. १३ व १४.