रघुनंदन स्वरूप पाठक (२५ नोव्हेंबर, इ.स. १९२४ - १७ नोव्हेंबर, इ.स. २००७) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते २१ डिसेंबर, इ.स. १९८६ ते १८ जून, इ.स. १९८९ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.