बीरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?बीरवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .१२७५४ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,२१७ (२०११)
• ९,५४२/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा आदिवासी कातकरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०४
• +०२५२५
• एमएच४८

भौगोलिक स्थान संपादन

पालघर रेल्वे स्थानकापासून उमरोळी बोईसर मार्गाने गेल्यावर कोळवण गावानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव ९.७ किमी अंतरावर आहे.

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

लोकजीवन संपादन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २७५ कुटुंबे राहतात. एकूण १२१७ लोकसंख्येपैकी ६०७ पुरुष तर ६१० महिला आहेत. गावाची साक्षरता ८७.८७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९४.४१ आहे तर स्त्री साक्षरता ८१.४९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १२९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.६० टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.

नागरी सुविधा संपादन

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी दिवसभर उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा पालघरवरून दिवसभर उपलब्ध असतात.

जवळपासची गावे संपादन

वारंगडे, नागझरी, निहे, कल्लाळे, पडघे, सातपाटी, धनसार, देवखोप,नंडोरे, शेलवाडी, अंबाडी ही जवळपासची गावे आहेत.

संदर्भ संपादन

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc

३. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc