फुले-आंबेडकर साहित्य संमेलन

जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, फुले-आंबेडकर, फुले-आंबेडकर-शाहू या नावाची अनेक साहित्य संमेलने भरतात. त्यांपैकी फुले-आंबेडकर नावाची साहित्य संमेलने जळगांव-भुसावळ या शहरांत होतात. महाराष्ट्र दलित साहित्य अकादमी नावाची संस्था ही एकदिवसीय संमेलने भरवते.

यापूर्वी भरलेली फुले-आंबेडकर साहित्य संमेलने संपादन

  • १२वे : भुसावळ, २८ मे २००६.
  • १७वे : भुसावळ, २३ जानेवारी २०११. संमेलनाध्यक्ष डॉ. रमा पांचाळ
  • १८वे : भुसावळ, २८ जानेवारी २०१२. संमेलनाध्यक्ष अनिल इंगळे. हेच महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीचेही अध्यक्ष आहेत.
  • १९वे : भुसावळ, १९ जानेवारी २०१३.

कृषी संमेलने संपादन

पहिले राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील माणुसदरी येथे १६ व १७ मार्च २०१६ झाले. या संमेलनातील सर्व कार्यक्रम केवळ शेती व शेतकऱ्यांशी निगडित होते. लोकजागृती मंच, पंचायत समिती घाटंजी व शांतिदूत बुद्धविहार समिती माणुसदरी यांच्या संयुक्त पुढाकारने हे संमेलन झाले. त्यासाठी आदिवासी बहुल माणुसदरी गावात वसंतराव नाईक साहित्यनगरी वसविण्यात आली होती. संमेलनाध्यक्ष मुंबईचे मोतीराम कटरे होते.

पहा :