पनवेल
पनवेल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील महानगरपालिका असलेले एक शहर आहे. पनवेलला कोकणाचे प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर नवी मुंबईला लागून आहे. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन अतिद्रुतगती महामार्ग पनवेल येथून सुरू होतात. पनवेल मुंबईपासून ३६.८ कि. मी. अंतरावर आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे. आता मात्र, पनवेल तालुका हा नवी मुंबईचाच एक भाग झाला आहे.
पनवेल | |
जिल्हा | रायगड |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | ०२२ |
टपाल संकेतांक | ४१०-२०६ |
वाहन संकेतांक | एम. एच.४६ |
निर्वाचित प्रमुख | प्रशांत ठाकूर (आमदार) |
नवीन पनवेल हे सिडकोने वसविलेले सुंदर शहर जुन्या पनवेलच्या शेजारी आहे. पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे. भविष्यातील सिडको नियोजित पुष्पकनगर व नवी मुबंई विमानतळ तालुक्यातील दापोली, कुंडेवहाल, भंगारपाडा गावांना लागूनच आहे. सिडकोने वसवलेले उलवे , खारघर, कामोठे, सेंट्रल पार्क आकर्षणाचे केंद्र आहेत.
पनवेल हा आगरी तसेच कोळी कराडीसंस्कृती असलेला तालुका आहे. तसेच शहरामध्ये भारताच्या विविध राज्यांतील म्हणजेच गुजरात ,पंजाब, दिल्ली, बंगाल, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, राजस्थान, तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लोक मिळून मिसळून राहतात. पनवेल शहर हा विविधतेत एकता असलेले सुंदर शहर आहे.
भूगोलसंपादन करा
पनवेल गाढी नदीवर वसले आहे. ही नदी पुढे जाऊन पनवेलची खाडी बनते. पनवेल समुद्रसपाटीपासून १२.१७५ मीटर उंचीवर वसलेले आहे.प्रबलगड,करनाळा गड ही शिवकालिन दुर्ग शहरापासुन काही अंतरावर आहेत.
लोकजीवनसंपादन करा
२०११ च्या जनगणनेनुसार पनवेलची लोकसंख्या ३,७५,४६३ इतकी आहे. यामध्ये पुरुष ५३ % तर महिला ४७ % आहेत. शहरातील ७८ % लोक साक्षर (पुरुष ८१ %, महिला ७४ %) असून १३ % लोकसंख्या ६ वर्षाखालील वयोगटातील आहे. पनवेल शहरावर पनवेल महानगरपालिका तर नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम), कामोठे व कळंबोली यावर सिडको प्रशासन काम करते.
इतिहाससंपादन करा
आगरी कोली व कराडी संकृती आसलेला पनवेल जवळजवळ ३०० वर्ष जुने आहे. ह्या शहराला जुन्या काळात पानेली ह्या नावानेदेखील ओळखले जायचे. या काळात मुघल, इंग्रज, पोर्तुगीज व मराठ्यांनी विविध कालावधींसाठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली. ही महाराष्ट्रातील सर्वात पहिली नगरपालिका होती. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरू करण्यात आल्या. १९१० - १९१६ मध्ये युसुफ नुर मोहम्मद हे पहिले नगराध्यक्ष म्हणुन निवडून आले. समुद्रमार्गे व खुष्कीच्या व्यापारामुळे पनवेल प्रगती करत राहिले. पेशवाई काळात शहरात अनेक वाडे बांधण्यात आले व आजही काही वाडे खंबीरपणे उभे आहेत.
प्रसिद्ध व्यक्तीसंपादन करा
पनवेल मध्ये जन्माला आलेल्या मोठ्या व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत-
- वासुदेव बळवंत फडके
- प्रबोधनकार ठाकरे
- हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे ऊर्फ हिरवे गुरुजी,
- विनायकराव मोरेश्वर गोविलकर
- वसंत महादेव वेदक
- चापसी पुरुषोत्तम रेवासीया
- आत्माराम महादेव आटवणे
- केशव गणेश ऊर्फ दादाभाई गुप्तेमुरारजी पुरुषोत्तम करवा,
- रामकृष्ण विश्वनाथ आपटे
- त्रिंबक नारायण बेडेकर
- पुरुषोत्तम गोपाळकृष्ण बापट
- रामकृष्ण गणेश आपटे
- दत्तात्रेय श्रीधर कारूळकर
- शंकर चिंतामण ऊर्फ बापूसाहेब खरे
- मारुती मुकुंद पन्हाळे
- चंदुलाल परशुराम लाहोटी
- अजगर इब्राहिम शेख (तलोजा)
- देवराम नारायण काठे
- रामचंद्र बाळा हाडगे
- श्रीमती मधुबाई गांगल
- शिवराम कांदेगोविंद काशिनाथ पटवर्ध
- नहरी विष्णू भाटे
- शंकर नारायण पांडव
- नारायण धोंडू खरेदलिचंद
- लालचंद कोठारी
- किसन एकनाथ जगनाडे
- प्रभाकर केशव गुप्ते
- प्रेमराज मोतीलाल मुणोथ
- भिकाजी नथू चितळ
- मदन गजानन मानकामे
- मधुसूदन शंकरराव चिटणीस
- मेघजी मनजी शेठ
- रामचंद्र परशुराम लाहोटी
- लालचंद आसाराम जाजू
- वासुदेव पुरुषोत्तम आचार्य
- शांतीलाल मोतीलाल मुणोथ
- शांतीलाल चुनीलाल गुगळे
- सदाशिव रामचंद्र ठाकूर
- शेतकरी नेते दि. बा. पाटील यांचेही पनवेलच्या विकासात व इतिहासात मोठे योगदान आहे
रेल्वेसंपादन करा
पनवेल हे दिवा-पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल, अंधेरी-पनवेल(वडाळामार्गे) आणि रोहे-पनवेल या चार रेल्वेमार्गांवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे.
हे सुद्धा पहासंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- पनवेलडिरेक्टरी.नेट Archived 2008-06-04 at the Wayback Machine.