अमरनाथ

काश्मीरमधील हिंदू मंदिर

अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा जम्मू-काश्मीर राज्यामध्ये असून श्रीनगर पासून साधारणपणे १३५ किमी वर समुद्रसपाटी पासून १३६०० फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. ते पहायला दरवर्षी उन्हाळ्यात हजारो- लाखो भाविक येथे भेट देतात. हे शिवलिंग साधारणपणे ८ ते १० फूट उंचीचे असते परंतु लिंगाचा आकार हवामानाप्रमाणे कमी जास्त होत असतो. असेही मानले जाते की शिवलिंगाचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतो. गुहे मध्ये अजून काही लहान हिमखंड आहेत त्यांना गणेश -पार्वतीचे रूप समजले जाते. मुख्य लिंगाच्या वर नैसर्गिक पाण्याची घळ आहे, त्या घळीमधून पाणी टपकत असते व त्यामुळे हे शिवलिंग तयार होते.

अमरनाथ येथील गुहा

या ठिकाणचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पवित्र गुहेत बर्फामुळे नैसर्गिक शिवलिंग तयार होणे हे आहे. नैसर्गिक बर्फापासून निर्माण झाल्यामुळे त्याला स्वयंभू हिमानी शिवलिंग असेही म्हणतात. संपूर्ण श्रावण महिन्यात आषाढ पौर्णिमेपासून रक्षाबंधन पवित्र हिमालिंग दर्शनासाठी लाखो लोक येथे येतात. त्या गुहेचा परिघ सुमारे दीडशे फूट आहे आणि त्यातून वरून बर्फाच्या पाण्याचे थेंब पडतात. येथे एक ठिकाण आहे, ज्यामध्ये बर्फाच्या थेंबापासून दहा फूट लांब शिवलिंग तयार होते. चंद्राच्या वाढ आणि घटनेमुळे या बर्फाचे आकारही कमी होत आहे. श्रावण पौर्णिमेवर ती पूर्ण आकारात येते आणि अमावस्या पर्यंत हळूहळू लहान होते. आश्चर्याची बाब म्हणजे हा शिवलिंग घन बर्फाने बनलेला आहे, तर गुहेत सहसा कच्चा बर्फ असतो जो हातात घेतला की लगेचच चुरा होईल. गणेश, भैरव आणि पार्वती मूळ अमरनाथ शिवलिंगपासून कित्येक फूट अंतरावर एकसारखेच आईसबर्ग आहेत.

दंतकथा संपादन

असे मानले जाते की भगवान शिवशंकरांनी पार्वतीला या जागी अमरत्वाचे रहस्य समजावले होते व ही कथा ऐकवताना दोन कबुतरांनी पण ऐकली ज्यामुळे ही कबुतरे देखील अमर झाली. आजही असे मानतात की या कबुतरांचे दर्शन या गुहे जवळ काही जणांना होते.

अमरनाथ यात्रा संपादन

जम्मू-काश्मीर राज्यातील हा भाग अतिरेकी कारवायांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. काश्मीरमधील दहशतवादी कारवाया ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर होत्या (९० च्या दशकात) त्यावेळेस ही यात्रा जवळपास स्थगित झाली होती. परंतु भारतीय सरकार व लष्कराच्या मदतीने ही यात्रा पुन्हा सुरू करण्यास यश आले आहे व दरवर्षी येथे भेट देणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. दरवर्षी अतिरेक्यांच्या हिंसाचारात काही भाविक मारले जातात परंतु तरीही मोठ्या प्रमाणावर भाविक येतात.

गुहेकडे जाण्यासाठी मुख्यत्वे दोन रस्ते आहेत. पहिला मार्ग सोनमर्ग - बालताल- अमरनाथ च्या बाजूने आहे. हा रस्ता फक्त १३ किमी चा असून बहुंताशी भाविक याच मार्गाने येणे पसंत करतात.

दुसरा मार्ग पहेलगाम - चंदनवाडी- पिस्सुटॉप- शेषनाग-पंचतरणी- अमरनाथ असा आहे. हा मार्ग ४५-५० किमीचा असून जास्त खडतर आहे. परंतु हिमालयाचे विलोभनीय दर्शन या मार्गात होते म्हणून अनेक जण हा मार्ग निवडतात.

यात्रेच्या मार्गामध्ये भाविकांची सोय चांगली आहे. श्वसनाचा त्रास होत नसलेला कोणीही या यात्रेत सहभागी होउ शकतो. ज्यांना या यात्रेत चालता येत नाही त्याच्यासाठी पालखी, घोडा, खेचर यावरून वाहून नेण्याची व्यवस्था आहे. बहुतांशी लोक घोडा व खेचर पसंत करतात. याचे दोन दिवसाचे भाडे १५०० ते २००० रुपये पर्यंत असू शकते. रस्त्याम्ध्ये भाविकांची अनेक ठिकाणी जेवणाची रहाण्याची व्यवस्था केली जाते. बहुतांशी ठिकाणी ही व्यवस्था स्वयंसेवी संस्थांतर्फे होते. यांना लंगर असे म्हणतात. जेवणाची व्यवस्था बहुतांशी मोफत असते राहण्याच्या व्यवस्थेला १००- १००० रुपयांपर्यंत मोजावे लागतात.

 
अमरनाथ मार्गाच्या एका भागाचे चित्र

पहलगामपासून मार्गातील अंतर असे (कंसात उंची फूट): चंदनवाडी १६ कि. मी. (९५००), पिस्सू टॉप ३ कि. मी. (११०००), शेषनाग ११ कि. मी. (११७३०), महागुना स्टॉप ४.६ कि. मी. (१४०००), पंचतरणी ९.४ कि. मी. (१२०००), संगम ३ कि. मी., पवित्र अमरनाथ गुहा ३ कि. मी. (१३००० फूट). सोनमर्ग (बालताल) पासून बराडी ५ कि. मी., संगम ४ कि. मी. पवित्र गुंफा ३ असे १४ किलोमीटर अंतर आहे.

यात्रेचा कालावधी संपादन

जुलै पहिला आठवडा ते ऑगस्ट शेवटचा आठवडा. साधारणपणे ४५ दिवस, हिंदू तीथींप्रमाणे

यात्रेच्छुकांसाठी सूचना संपादन

घातपाताची शक्यता सतत असल्याने मार्गामध्ये जागोजागी भारतीय लष्कराचे जवान तैनात असतात. तसेच वेळोवेळी ते झडती देखील घेतात. यात्रेकरूंनी जवानांना सहकार्य करावे तसेच घोडा, खेचर अथवा पालखी वाहणारे वाहक अधिकृत आहेत की याची देखील चौकशी करावी. अधिकृत वाहकांपाशी ओळखपत्र असते. अधिकृत लंगर व राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणीच रहावे अथवा भोजन नाष्टा करावा. लष्कराच्या सूचनांप्रमाणेच मार्गाक्रमण करावे. पाऊस, हिमवर्षेची शक्यता असल्याने जरुरी गरम कपडे व रेनकोट घेउन जावेत. साधारणपणे १०००० फुटावरती श्वसनाचा त्रास होउ शकतो, मळमळणे, डोके दुखणे, उलटी होणे या गोष्टी होऊ शकतात. आपल्या डॉक्टरांना याबाबत विचारावे व जरुरी औषधपाणी घेउन जावे. अश्या प्रकारचा त्रास कमी होण्यासाठी, यात्रा सुरू करण्यापुर्वी सोनमर्ग, बालताल, पहेलगाम किंवा चंदनवाडी येथे एखाद दुसरा दिवस अतिरिक्त व्यतीत करावा तसेच यात्रा देखील टप्या टप्याने पार पाडावी.पहेलगाम कडून जाताना जरी पालखी अथवा घोडा भाड्याने घेतला असेल तरी साधारणपणे अतिदुर्गम ठिकाणी १.५ ते २ किमी चालावे लागतेच. याची तयारी असावी. साध्या वातावरणात श्वसनाचा त्रास असणाऱ्यांना यात्रेबाबत विचार करावा.

पहलगम ते अमरनाथ संपादन

पहलगाम जम्मूपासून ५१५ कि.मी. अंतरावर आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य दृष्टीस पडते. जम्मू-काश्मीर पर्यटन केंद्रातून पहलगामला जाण्यासाठी सरकारी बस उपलब्ध आहे. पहलगाममध्ये स्वयंसेवी संस्थांमार्फत लंगरांची व्यवस्था केली जाते. येथून तीर्थयात्रा सुरू होते.

पहलगाम नंतर पहिला थांबा चंदनबाडी आहे जो पहलगामपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. यात्रेकरूंनी पहिली रात्र येथे घालविली. रात्री मुक्काम करण्यासाठी येथे शिबिरे आयोजित केली जातात. पिसू व्हॅलीची चढाई दुसऱ्या दिवशी सुरू होते. असे म्हटले जाते की पीसू खो Valley्यात देवता आणि राक्षस यांच्यात भयंकर युद्ध झाले ज्यामध्ये राक्षसांचा पराभव झाला. लिडर नदीच्या काठावर पहिल्या टप्प्यातील हा प्रवास कठीण नाही. चंदनबाडी पलीकडे या नदीवरील हा बर्फ पूल सुरक्षित आहे.

पुढचा स्टॉप दनबाडीपासून 14 किलोमीटर अंतरावर शेषनाग येथे आहे. हा मार्ग चढाईचा आणि धोकादायक आहे. येथेच पिसू घाटाचे दर्शन होते.  अमरनाथ यात्रेतील पिस्सू व्हॅली हे अतिशय धोकादायक स्थान आहे. पिसांची दरी समुद्रसपाटीपासून 11,120 फूट उंच आहे. प्रवासी शेषनागमध्ये पोहोचल्यानंतर ताजिकडमला पोहोचतात. परिसराच्या दरम्यान निळ्या पाण्याचे एक सुंदर तलाव आहे. या सरोवरात पाहून गोंधळ निर्माण होतो की या तलावामध्ये आकाश खाली आले नाही. हा तलाव दीड किलोमीटर लांबीपर्यंत पसरलेला आहे. पौराणिक कथेनुसार शेषनाग येथे शेषनाग तलावाचे वास्तव्य आहे आणि चोवीस तासात एकदा शेशनाग तलावाच्या बाहेर एकदा दर्शन घेतो, परंतु हे दर्शन केवळ भाग्यवानांसाठीच असते. यात्रेकरूंनी रात्री विश्रांती घेतली आणि येथून तिसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू केला.

अमरनाथ यात्रेसंबंधी पुस्तके संपादन

  • अनंत (अनुवादित; अनुवादक माधवी कुंटे, मूळ लेखक : वेद राही) :

श्री अमरनाथ यात्रेशी संबंधित जनआंदोलन ही अर्वाचीन इतिहासातील एक अभूतपूर्व अशी घटना आहे. अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली कादंबरी.

  • श्री अमरनाथ यात्रा (पुष्पलता कढे)
  • हिमालय दर्शन (डॉ. स्वाती कर्वे)

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

अधिकृत संकेतस्थळ Archived 2008-04-11 at the Wayback Machine.