मेघनाद साहा

भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि राजकारणी (१८९३-१९५६)

मेघनाद साहा एफआरएस ( ६ ऑक्टोबर १८९३ - १६ फेब्रुवारी १९५६) एक भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते.  त्यांनी  सहा आयनीकरण समीकरण विकसित केले जे ताऱ्यां मधील  रासायनिक आणि भौतिक  परिस्थितीचे वर्णन करता[१]त.

मेघनाद साहा
जन्म ऑक्टोबर ६, १८९३
शाओरातोली, ढाका, बांगलादेश (सध्याचा)
मृत्यू फेब्रुवारी १६, १९५६
निवासस्थान भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्रज्ञ
कार्यसंस्था अलाहाबाद विद्यापीठ,
कलकत्ता विद्यापीठ
प्रशिक्षण ढाका कॉलेज, प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता
ख्याती थर्मनल आयोनायझेशन

चरित्र संपादन

मेघनाद साहा यांचा जन्म १८९३ मध्ये ढाका जवळील शाओराटोली या गावी, ब्रिटीश भारताच्या पूर्वीच्या बंगाल प्रेसिडेंसीमध्ये (सध्याच्या बांगलादेशात) झाला. जगन्नाथ साहाचा मुलगा, मेघनाद हे  गरीब कुटुंबातील होते  आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी  धडपडत होता. त्यांच्या सुरुवातीच्या शालेय शिक्षणादरम्यान, त्यांनी  स्वदेशी चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना ढाका कॉलेजिएट स्कूल सोडण्यास भाग पाडले गेले. ढाका महाविद्यालयातून त्यांनी भारतीय शालेय प्रमाणपत्र मिळवले. कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि राजाबाजार सायन्स कॉलेज सी.यू. मध्ये ते  विद्यार्थी होते; १९२३  ते  १९३८ पर्यंत अलाहाबाद विद्यापीठाचे प्राध्यापक आणि त्यानंतर  पर्यंत मरण येईपर्यंत कलकत्ता विद्यापीठात विज्ञान संकायचे प्राध्यापक आणि डीन म्हणून त्यांनी काम केले.  १९२७ मध्ये रॉयल सोसायटीचे ते फेलो झाले. ते १९३४ मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसच्या २१ व्या सत्राचे अध्यक्ष होते.

साहा यांच्या वर्गमित्रांमध्ये सत्येंद्र नाथ बोस, ज्ञान घोष आणि जे. एन. मुखर्जी होते. त्याच्या नंतरच्या आयुष्यात ते अमिया चरण बॅनर्जी यांचे जवळचे होते. साहा नास्तिक होती.[२]

  1. ^ "Meghnad Saha". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-10-07.
  2. ^ "Meghnad Saha". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-10-07.