पडघा
पडघा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.
?पडघा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | भिवंडी |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान संपादन
हे गाव मुंबई नाशिक महामार्गालगत वसलेले आहे.नाशिकला जाताना भिवंडीतील टोलनाका ओलांडल्यावर काही अंतरावर डाव्या बाजूला हे गाव आहे.हे गाव पूर्वी बैलगाड्यांच्या निर्मिती साठी प्रसिद्ध होते.[१]
हवामान संपादन
येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
लोकजीवन संपादन
भारतीय ग्रामसंस्कृतीची वैशिष्ट्य असणारी बारा बलुतेदार पद्धती ह्या गावात प्रचलित होती.गावात शिवमंदिर, विठ्ठलमंदिर, दत्तमंदिर आहेत.मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य राम जोशी यांचा जन्म ह्या गावात झाला होता. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके ह्यांचे काही काळ येथे वास्तव्य होते. [२]
प्रेक्षणीय स्थळे संपादन
नागरी सुविधा संपादन
==जवळपासची गावे== शेरेकरपाडा वाफाळे बोरिवली खालिंग दळेपाडा चिंबीपाडा भादाणे जूपाडा आतकोली