देवगिरीचे यादव
देवगिरीचे यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३३४), यांना सेवुण/सेऊण राजवंश असेही म्हटले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते.ते स्वतःला सोमवंशी म्हणवत. यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारतकालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि [[मध्यप्रदेशाच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते ते सुबाहूच्या कारकीर्दीत स्वतंत्र राजे झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लमदेव यादव याने देवगिरी येथे राजधानी स्थापन केली.यादवराजांनी अनेक मंदिरे बांधल. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे नाव होते.(पुढे मूळचा यादवकुलीन नसलेला पण यादव राजा घोषित करणारा [[रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. [ संदर्भ हवा ]. राजा सिंघण(दुसरा) आणि राजा महादेव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. (सिंघणदेव यादव राजाची तुलना महान राजांच्या तुलना होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती, पहिले मराठी राज्य म्हणून यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले. शिखर शिंगणापूरचे महादेव मंदिर सिंघणराजाने बांधले, सिंघण वरून शिंगणापूर झाले.-संदर्भ हवा) यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय. (यांच्या वडिलांच्या रामचंद्राच्या काळातच मराठीभाषेला राजाश्रय मिळाला-संदर्भ हवा).यांच्या कारकिर्दीतच अल्लाउद्दिन खिलजीने त्यांना फितूरीने पराभूत केले. रामदेवराय यांचे जावई व सेनापती हरपालदेव यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई त्यांच्याच कुळातील मानल्या जातात. त्यांचे माहेरचे आडनाव जाधव हे यादव वंशांवरून आल्याचे मानले जाते. परंतg हे यादव चंद्रवंशी यादव आहेत. महाराष्ट्रातील यादवराव, यादव ह्या आडनावाची घराणी स्वतःला देवगिरीच्या यादवांचे वंशज मानतात. परंतg त्यसंबंधीचे ठोस पुरावे दिसत नाहीत महाराष्ट्रातील कित्येक मंदिरे, बारव स्थापत्यादी अनेक वास्तू ह्या देवगिरीच्या यादवराजांशी संबंधीत असल्याचे मानले जाते. आजही अनेक ठिकाणी त्याचे अवशेष पहावयास मिळतात.
यादव साम्राज्य सेऊण(यादव)साम्राज्य | ||||
|
||||
|
||||
![]() |
||||
ब्रीदवाक्य: हर हर महादेव | ||||
राजधानी | देवगिरी | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | दृढप्रहारी | |||
पंतप्रधान | हेमाद्री | |||
अधिकृत भाषा | मराठी | |||
इतर भाषा | कन्नड,[[महाराष्ट्री प्राकृत]], संस्कृत |
पुस्तकसंपादन करा
- देवगिरीचे यादव: इतिहास संशोधक महामहोपाध्याय डॉ.ब्रह्मानंद देशपांडे यांनी महाराष्ट्रातील पराक्रमी अशा यादव राजवंशावर लिहिलेला हा एक ऐतिहासिक ग्रंथ आहे.
मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्या अजोड पराक्रमाने ४५० वर्षे महाराष्ट्राचे नाव झळकत ठेवणार्या कर्तबगार यादव राजांची सविस्तर ऐतिहासिक माहिती या ग्रंथात मिळते. भिल्लम, सेउणचंद्र, भिल्लम(पाचवा), जैतुगी(द्वितीय), सिंघणदेव(द्वितीय), कृष्णदेव,रामचंद्र अशा अनेक पराक्रमी यादवराजांची यशोगाथा या पुस्तकात वर्णिली आहे..