कादंबरी कदम

मराठी चित्रपट अभिनेत्री

कादंबरी कदम-देसाई (१३ ऑक्टोबर १९८८)[१] ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी नाटकांत, हिंदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.[ संदर्भ हवा ]

कादंबरी कदम
जन्म १३ ऑक्टोबर, १९८८ (1988-10-13) (वय: ३५)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख टीव्ही कार्यक्रम तीन बहुरानियॉं, अवघाचि संसार
पती
समीर देसाई (ल. २००६२०१६)

कादंबरी कदम मुंबईच्या गोरेगाव विद्यामंदिरात शिकत होत्या. वयाच्या तिसऱ्या वर्षी कादंबरीमधील अभिनयाचे गुण दिसून आले. त्या वयात तिने एका बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचे काम केले होते.[ संदर्भ हवा ] जरा मोठ्या झाल्यावर त्यांनी विजय तेंडुलकरच्या एका मराठी नाटकात भूमिका केली होती. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती तीन बहुरानियॉं या झी टीव्हीवरील मालिकेतल्या तिच्या जानकीच्या भूमिकेमुळे. याशिवाय तिने कभी सौतन कभी सहेली आणि कहता है दिल ह्या मालिकांमधेही कामे केली आहेत. त्यापूर्वी तिने झी मराठीवरील अवघाचि संसार या मालिकेतही काम केले होते. मराठीमधील टॅक्स फ्री या कार्यक्रमाची ती सूत्रसंचालक होती.[ संदर्भ हवा ]

मराठी चित्रपट[ संदर्भ हवा ] संपादन

मराठी नाटकं संपादन

मराठी दूरचित्रवाणी मालिका आणि कार्यक्रम[ संदर्भ हवा ] संपादन

  • अकल्पित
  • अवघाचि संसार
  • इंद्रधनुष्य
  • तुजवीण सख्या रे
  • दीपस्तंभ
  • महाराष्ट्राचा नच बलिये (कार्यक्रम)

हिंदी दूरचित्रवाणी मालिका[ संदर्भ हवा ] संपादन

  • कभी सौतन कभी सहेली
  • कहता है दिल
  • तीन बहुरानियॉं
  • संस्कार धरोहर अपनों की

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ "Kadambari Kadam Wiki".
  2. ^ "'चारचौघी' नाटक नव्या संचात रंगभूमीवर येण्यास सज्ज". रंगभूमी.com. 2022-09-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन