सत्यानंद स्टोक्स (जन्म नाव: सॅम्युएल ईव्हान्स स्टोक्स, जुनियर, १६ ऑगस्ट, १८८२ - १४ मे, १९४६) हे अमेरिकेत जन्म घेतलेलेल भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदाच्या लागवडीची सुरुवात केली.

सत्यनंद स्टोक्स स्थानिक मुलांसोबत

सत्यानंद यांचा जन्म अमेरिकेत सॅम्युएल ईव्हान्स स्टोक्स, जूनियर या जन्म नावाने झाला. त्यांचे वडील, एक अत्यंत यशस्वी व्यापारी होते. ते स्टोक्स आणि पॅरिश मशीन या कंपनींचे संस्थापक होते व अमेरिकेतील लिफ्टचे एक अग्रणी निर्माता होते. पण सॅम्युएला व्यवसायात रस नव्हता. तरीसुद्धा, त्याच्या वडिलांनी व्यवसाय चालवण्यासाठी त्याला अनेक वेळा प्रोत्साहित केले परंतु सॅम्युएल त्याला व्यवसाय स्वारस्य मिळाले नाही. त्यांचे कुटुंब श्रीमंत असल्याने, त्यांच्या गरजा पुरविल्या गेल्या.

१९०४ साली सॅम्युएल सिमला येथील सुबथू येथे असलेल्या एका वसाहतीत कुष्ठरोग्यांमध्ये काम करण्यासाठी भारतात आला. त्यांचे आईवडील या निर्णयाविरुद्ध होते. सॅम्युएल कुष्ठरोग्यांसाठी काम करू लागल्यावर इतर स्थानिक लोकांनी त्याला आदराने वागवले. एकदा त्याच्या पालकांना हे लक्षात आले की ही समाजसेवा आपल्या मुलाची भावनात्मक गरज पूर्ण करते, तेव्हा त्यांनी त्यांना भरपूर पैसा दिला. या पैशाचा त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी भरपुर् उपयोग केला आणि लहान गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थांना मदत केली. सॅम्युएल गावकऱ्यांसोबत एक साधे जीवन जगू लागला.

१९१२ मध्ये, सॅम्युअलने स्थानिक राजपूत मुलीशी विवाह केला होता, संन्यासी आयुष्य सोडले व त्याच्या पत्नीच्या गावाजवळील शेतीचा एक भाग विकत घेतला आणि तेथे स्थायिक झाले. त्याची पत्नी ॲग्नेस ही राजपूत ख्रिश्चन होती. उभयतांनी पाच मुलांना जन्म दिला.

सॅम्युअलने शेती करण्यास सुरुवात केली व शेतीतील सुधारणांसाठी त्यांनी जगभरातील तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. त्यांनी लुईझियानाच्या स्टार्क बंधूंनी विकसित केलेल्या एक नवीन सफरचंदांची जात मिळवली. ही जात सिमला हिल्ससाठी योग्य होती. १९१६ साली त्यांनी आपल्या शेतामध्ये या सफरचंदांच्या जातीची लागवड करण्यास सुरुवात केली. मेहनत शब्दशः फळाला आली व सफरचंदांचे भरघोस पीक आले. गावकऱ्यांना त्यांनी ही अधिक उत्पन्न देणाऱ्या नवीन सफरचंदांची कलमे पुरवली. स्थानिक अर्थव्यवस्थेलाच त्याने आर्थिक बळकटी आली.

सॅम्युअलच्या मुलाच्या अतिसाराने मृत्यू झाला. त्यानंतर सॅम्युअल हिंदू धर्माकडे आकर्षित झाला, आणि १९३२ साली त्यानी "सत्यानंद" हे नाव घेतले. आणि त्याची पत्नी ॲग्नेस यांनी आपले नाव "प्रियदेवी" असे ठेवले.

सत्यानंद नेहमीच सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते. ते ब्रिटनमधून भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय झाले. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सदस्य होण्यारे सत्यानंद हे एकमात्र अमेरिकन होते. लाला लजपत राय यांच्यासह त्यांनी पंजाबचे प्रतिनिधित्व केले. १९२१ मध्ये काँग्रेसचा जाहीरनामा स्वाक्षरी करणारे ते एकमेव बिगर भारतीय होते. १९२१ मध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात त्यांनी भारतीयांना सरकारी सेवेतून निवृती घेउन स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय होण्याचे आवाहन केले. ब्रिटिशांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना कैदी बनवले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांचे कैदी बनलेले ते एकमेव अमेरिकन होते. सत्यानंदांच्या अटकेबद्दल महात्माजींनी लिहिले की, "That he (सत्यानंद) should feel with and like an Indian, share his sorrows and throw himself into the struggle, has proved too much for the government. To leave him free to criticise the government was intolerable, so his white skin has proved no protection for him…"

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी काहीच काळ आधी, १४ मे १९४६ रोजी सॅम्युएल ईव्हान्स स्टोक्स, जूनियर ऊर्फ सत्यानंद यांचे निधन झाले.