डॉ. वृषाली किन्हाळकर या मराठवाड्यातील एक मराठी कवयित्री व लेखिका आहेत. त्यांच्या दोन कवितासंग्रहांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वृषाली किन्हाळकर यांचे मला उमगलेले अध्यात्म हे सदर महाराष्ट्र टाइम्समध्ये दर बुधवारी प्रकाशित होत असे. तसेच त्यांनी दै. पुण्यनगरी, दिव्य मराठीलोकसत्तामध्ये विपुल लेखन केले आहे.

त्यांचे पती डॉ. माधवराव किन्हाळकर हे भोकर मतदारसंघातून निवडले जाणारे आमदार तसेच माजी गृहराज्यमंत्री आहेत.

डॉ. किन्हाळकर या अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय मेडिकल कॉलेजमधून स्नातक झालेल्या स्‍त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्या नांदेड येथे वैद्यकव्यवसाय करतात.

साहित्य/पुस्तके संपादन

  • तारी (कवितासंग्रह)
  • वेदन (कवितासंग्रह)
  • संवेद्य (ललित लेखसंग्रह)
  • सहजरंग (ललित लेखसंग्रह)

पुरस्कार संपादन

  • २२ फेब्रुवारी २००९ रोजी करकाळा (तालुका उमरी, जिल्हा नांदेड) येथे झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या त्या खास निमंत्रित पाहुण्या होत्या.
  • वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय (पळसप) यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेले २ रे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप (तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.
  • किन्हाळकर यांच्या तारी आणि वेदन या दोन्ही कवितासंग्रहाला पुरस्कार मिळाले आहेत.
  • (कै.) सौ. कमलताई जामकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा दर्पण पुरस्कार.
  • उस्मानाबाद येथे ६-७ फेब्रुवारी २०१६ या काळात झालेल्या ७व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.