"शिशुपालवध (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पुस्तक
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = शिशुपाळवध
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| लेखक = [[भास्करभट्ट बोरीकर]]
| मूळ_नाव =
| अनुवादक =
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| देश = [[भारत]]
| साहित्य_प्रकार = [[कादंबरी]]
| प्रकाशक =
| प्रथमावृत्ती =
| चालू_आवृत्ती =
| मुखपृष्ठकार =
| बोधचित्रकार =
| पुस्तकमालिका =
| पुस्तकविषय =
| माध्यम =
| पृष्ठसंख्या =
| आकारमान_वजन =
| isbn =
| पुरस्कार =
}}
 
 
महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता भास्करभट्ट बोरीकर. रुक्मिणी-श्रीकृष्ण यांच्या चित्रणासोबतच शिशुपाळवधाचे चित्रण या ग्रंथात आले आहे.
 
==परिचय==
१०८७ ओव्या. महाभारताच्या सभापर्वात आणि भागवताच्या दशमस्कंधात शिशुपाळवधाची कथा आहे पण भास्करभट्ट केवळ आधारांवरच अवलंबून नाहीत. माघ, जयदेव, कालिदास हे भास्करभटांचे आदर्श होत :
''देखौनि महाकवींचा पंथु : मज होतसे मनोरथु :'' विरक्ती व भक्तीपेक्षा शृंगाराचेच संस्कार या ग्रंथात अधिक आढळतात. ''साहित्याचेनि परिमळे : शृंगाराचेनि मेळे : प्रबंध होति मातावळे : कविजनांचे ।'' असे भास्कराने म्हटलेले आहे. भास्कराने लिहिलेल्या या ओवीतच त्याचा साहित्यविषयक दृष्टिकोन प्रतिबिंबित झाला आहे; नव्हे त्याचे प्रात्यक्षिक ‘शिशुपाळवधा’त करून आपला प्रबंध शृंगाराने ‘मातावळा’ बनवला आहे. सभावर्णन, निसर्गवर्णन, युद्धवर्णन, जलक्रीडावर्णन, विरहवर्णन, द्वारकावर्णन या पद्यात आढळतात.
 
भास्कराने लिहिलेल्या या ओवीतच त्याचा साहित्यविषयक दृष्टिकोन प्रतिबिंबित झाला आहे; नव्हे त्याचे प्रात्यक्षिक ‘शिशुपाळवधा’त करून आपला प्रबंध शृंगाराने ‘मातावळा’ बनवला आहे.
सभावर्णन, निसर्गवर्णन, युद्धवर्णन, जलक्रीडावर्णन, विरहवर्णन, द्वारकावर्णन या पद्यात आढळतात.
==पंथीय समीक्षा==
'''''भटो ग्रंथु निका जाला : परि निवृताजोगा नव्हेचि''''' (ग्रंथ तर उत्तम जमून आला आहे पण निवृत्तीमार्गासाठी हा उपयुक्त नाही!) : इति बाइदेवबास. बाइदेवबासांचे हे उद्गार मराठी समीक्षेचे पहिले वाक्य ठरते. पाल्हाळ, औचित्यानौचित्याचा विवेक नसणे, अस्थानी शृंगार, कालविपर्यास हे दोष या काव्यात आहेत. शृंगारबहळता हा गंभीर दोष या पद्यात आहे.
 
[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]
 
[[वर्ग:महानुभावांचे सात ग्रंथ]]