भागवत झा आझाद हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील पुर्णिया-संथाळ परगणा लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९६२, इ.स. १९६७, इ.स. १९७१, इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातीलच भागलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते फेब्रुवारी १४, इ.स. १९८८ ते मार्च ११, इ.स. १९८९ या काळात बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते.