नीरजा (कवयित्री)

एक मराठी कवयित्री व कथालेखिका


नीरजा या एक मराठीतील कवयित्री व कथालेखिका आहेत. त्या समीक्षक म.सु. पाटील यांच्या कन्या आहेत.त्यांच्या आईचे नाव विभावरी पाटील आहे, 'ग्रंथाली' आणि 'सानेगुरुजी ट्रस्ट'च्या अनुवाद सुविधा केंदाच्या त्या पदाधिकारी आहेत.

नीरजा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
चित्र:Neeraja

नीरजा यांच्या कवितालेखनाला महाविद्यालयीन काळातच सुरुवात झाली असली, तरी त्यांच्या कवितेला पहिली महत्त्वाची दाद मिळाली ती, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर. विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राजा शिवाजी विद्यालयात ६०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते, तेव्हा नीरजा यांनी या संमेलनात पहिल्यांदा नवोदित कवींच्या व्यासपीठावर 'सावित्री' ही कविता वाचली होती. या कवितेला तेव्हा एवढी दाद मिळाली की पुढच्याच वर्षी त्यांचा समावेश निमंत्रितांच्या कविसंमेलनात झाला. त्यानंतर ’वेणा’ हा नीरजा यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.

नीरजा यांचे "सकाळ सप्तरंग‘मधील "मी कात टाकली‘ हे सदर लोकप्रिय झाले आहे. आधुनिक जीवनजाणिवा त्यांच्या एकूणच लेखनातून व्यक्त होताना दिसतात. .

नीरजा यांचे साहित्य संपादन

  • ओल हrविलेली माती (कथासंग्रह)
  • चिंतनशलाका (ललितलेखसंग्रह)
  • जे दर्पणी बिंबले (कथासंग्रह)
  • निरर्थकाचे पक्षी (कवितासंग्रह)
  • नीरन्वय (कवितासंग्रह)
  • पावसात सूर्य शोधणारी माणसं (कथासंग्रह)
  • बदलत्या चौकटी (ललित लेखसंग्रह)
  • वेणा (कवितासंग्रह)
  • स्त्रीगणेशा (कवितासंग्रह)

पुरस्कार आणि सन्मान संपादन

संदर्भ संपादन