तरुण भारत हे शहरांतून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे. कर्नाटकातील बेळगाव शहरात याचे मुख्यालय असून गोवा, कोल्हापूर येथूनही याच्या आवृत्त्या प्रकाशित होतात. गावकरी नाशिकचे आत्ताचे सुप्रसिद्ध दैनिक गावकरी हे प्रथम मालेगाव येथे सुरू झाले. 1 जानेवारी 1938 रोजी दत्तात्रय शंकर पोतनीस यांनी हे पत्र पाक्षिक स्वरूपात काढले. 1939 सालि या पत्राचे मालेगाव आतून नाशिकला स्थलांतर झाले. 1947च दसऱ्यापासून या पत्राचे दैनिकात रूपांतर करण्यात आले.

                                                                   प्रमुख्याने उत्तर महाराष्ट्रात राजकीय विचारांचा प्रसार करून जनजागृतीचे कार्य गावकरी ने केली. गावकरीच्या संपादक मंडळावर सुप्रसिद्ध पत्रपंडित प  व गाडगीळ यांनी लोकमान्य दैनिक बंद झाल्यावर काही काळ काम केले. साप्ताहिक गावकरी आता स्वतंत्रपणे मिळतो गावकरी ही एक आता संस्था बनली आहे. याच संस्थेचे अमृत हे डायजेस्ट स्वरूपाचे मासिक व कला आणि खिळे लावलेले रंग हे साप्ताहिक 1958 पासून निघतो. गांवकरीचे समकक्ष दैनिक अंजिठा दैनिक औरंगाबाद येथून प्रसिद्ध होते. दादासाहेब पोतनीस व चिरंजीव दत्तात्रय पोतनीस हे या संस्थेचे कार्यवाह आहेत.                                         

संदर्भ व नोंदी संपादन करा

हे सुद्धा पहा संपादन करा

बाह्य दुवे संपादन करा

  • "अधिकृत संकेतस्थळ".