कुरुंदवाड संस्थान (थोरली पाती)


पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरभट पटवर्धन ह्यांचे तृतीय पुत्र त्रिंबक हरी पटवर्धन तथा अप्पासाहेब हे कुरुंदवाड संस्थानाचे संस्थापक समजले जातात. मराठा सरदार राणोजी घोरपडे यांनी, अप्पासाहेबाकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड म्हणून् घोरपड्यांनी कुरुंदवाड हे आपले गाव अप्पाला बहाल केले.

कुरुंदवाड संस्थान
कुरुंदवाड संस्थान
[[मराठा साम्राज्य|]] इ.स. १७३३इ.स. १९४८
ध्वज
राजधानी कुरुंदवाड
सर्वात मोठे शहर कुरुंदवाड
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: त्रिंबक हरि पटवर्धन
अंतिम राजा: विनायाकराव हरीहरराव (नानासाहेब) पटवर्थन
अधिकृत भाषा मराठी भाषा
लोकसंख्या ४२,००० (इ.स.१९०१)
–घनता ८९ प्रती चौरस किमी

अप्पासाहेबांची कारकीर्द इ.स.१७३३ ते इ.स. १७७१ अशी होती. पुढे इ.स. १८११ मध्ये कुरुंदवाडचे कुरुंदवाड आणि शेडबाळ असे दोन् राज्यात विभाजन झाले. घराण्याला वारस नसल्याने शेडबाळ ब्रिटीश साम्राज्यात विलिन झाले. इ.स.१८५४ मध्ये कुरुंदवाड संस्थान पुन्हा विभागले जाऊन थोरली पाती रघुनाथरावाकडे तर धाकटी पाती विनायकरावाकडे गेली. स्वातंत्र्यानंतर दोन्ही संस्थाने भारतात विलिन झाली. [१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "संस्थान कुरुंदवाड". लोकसत्ता.

हेसुद्धा पहा संपादन

मिरज संस्थान (थोरली पाती)