सूर्यनगरी एक्सप्रेस
सूर्यनगरी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस ते जोधपूर स्थानकांदरम्यान रोज धावते. पश्चिम रेल्वेमार्गे धावणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेसला मुंबई ते जोधपूर दरम्यानचे ९३५ किमी अंतर पार करायला १७ तास लागतात.
वेळापत्रकसंपादन करा
गाडी क्रमांक | मार्ग | प्रस्थान | आगमन | कधी |
---|---|---|---|---|
१२४८० | मुंबई वांद्रे टर्मिनस – जोधपूर | १३:३० | ०६:३० | रोज |
१२४७९ | जोधपूर – वांद्रे टर्मिनस | १८:४५ | ११:३५ | रोज |
रचनासंपादन करा
१२४७९/१२४८० क्रमांक असलेल्या या गाडीला सहसा एक वातानुकुलित २ टियर, एक वातानुकुलुत पहिला आणि २ टियर, चार वातानुकुलित ३ टियर, १२ शयनयान आणि पाच अनारक्षित डबे जोडलेले असतात.