पं सुरेश तथा भाई गायतोंडे. भारतातील एक ज्येष्ठ तबलावादक.

जगन्नाथबुवा पुरोहीत, विनायकबुवा घांग्रेकर, उस्ताद अहमदजान तिरखवा हे यांचे गुरू.

भारतात अनेक ठिकाणी एकल तबला वादनाचे कार्यक्रम केले आहेत. मुंबई, पुणे, खैरागड इत्यादी विद्यापिठातून तबलाविषयक कार्यशाळा घेतल्या आहेत, चर्चासत्रातून मार्गदर्शन केले आहे. वाशी येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात अनेक वर्ष तबला शिकवत आहेत.

यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.लिख रहा हूँ मौं अंजान जिसका

            कल आगाज आएगा....
     मेरे लहू का हर एक कतरा इंक़लाब लाएगा..
            मै रहूँ याना रहूँ 
      पर यह वादा हैं तुमसे मेरा 
           कि मेरे बाद वतन पे मरने वालो
       का सैलाब आएगा ......"
   क्रांतिकारक हा शब्द जरी उच्चारला तरी भगतसिंग यांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. सशस्त्र लढा उभारून देशाला स्वातंत्र मिळून देणे एवढ्या पुरतेच त्यांचे कार्य मर्यादित नव्हते ,तर  त्याही पुढे जाऊन देशाची आर्थिक  आणि सामाजिक व्यवस्था कशी असावी या बद्दल त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका  भाषण आणि लिखाण या मधून स्पष्ट केली होती. 

स्वतंत्र भारताची संरचना त्यांच्या विचारातून स्पष्ट पणे दिसत होती. एक कल्याणकारी व्यवस्थाच विविधतेने नटलेल्या भारताला स्वयंपूर्ण करू शकते यावर त्यांचा विश्वास होता. सर्वांना समान हक्क,न्याय, अधिकार, आणि संधी मिळावी याचा त्यांनी कायम पुरस्कार केला. सशस्त्र लढ्या मागे त्यांची एक वैचारिक बैठक होती, तो लढा हा हल्ला, लूटमार,जाळपोळ अशा प्रकारचे अविवेकी आणि माथेफिरू कृत्य नव्हते, तर तो लढा हा स्वतःच्या हक्क साठी व अस्तित्व सिद्ध करण्यासाठी होता, त्यात नियोजन होते आणि सर्वसमावेशक लोक कल्याणासाठी राजेशाही, हुकूमशाही, कडून लोकशाही कडे जाणाऱ्या शासन व्यवस्थे बद्दल त्यांना आदर होता.

       स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ्याचा त्यांनी मार्ग जरी निवडला असेल तरी कारागृहात असताना कैद्यांना मिळत असलेल्या अमानवी वागणुकी विरुद्ध त्यांनी उपोषण, असहकार यासारख्या " अहिंसेच्या"  हत्यारांचा अवलंब केला.
       सशस्त्र लढ्या मार्फत विद्रोह करण्यासाठी जेवढा संयम लागतो त्यापेक्षा अहिंसेच्या मार्गाने विद्रोह करण्यासाठी संयम लागतो, आणि मिळेल त्या मार्गाचा अवलंब करून इंग्रज सरकारला पराभूत करण्याचा प्रयन्त करा , असा क्रांतिकारक विचार त्यांनी भारतीय तरुणांना दिला होता.
        साम्यवादी विचारांचा हा क्रांतिकारक वय केवळ 23 ते 24 वर्ष पण या कमी वयापेक्षा किती तरी पुढची समज त्यांना अकालीच आली  होती, या वयात दाढी मिशी काढून लग्नासाठी मुली पाहण्यासाठी जायचे तर भगतसिंग यांनी दाढी मिशी काढून फासावर गेले, का तर  

" देश के लिये शहीद होणे जा राहें हैं, अच्छा तो दिखना चाहिये ".

          जोपर्यंत ही भारतभूमी श्वास घेईल तो पर्यंत भगतसिंग यांचे  कार्य, त्याग , देशप्रेम आणि समर्पण  'अमर' असेल  आणि ते भावी पिढीसाठी एका दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शक असेल , त्यांचे व्यक्तीमत्व समोर आले की नेहमी एक कविता आठवते,
      " अब भी जिसका खून न खौला 
    खून नहीं ओ पाणी हैं। 
          जो देश के काम न आये वो 
       बेकार जवानी हैं।"

🍁

बाह्यदुवा संपादन