सांसद आदर्श ग्राम योजना

ग्रामीण विकास कार्यक्रम
(संसद आदर्श ग्राम योजना या पानावरून पुनर्निर्देशित)

संसद आदर्श ग्राम योजना (इं:Sansad Adarsh Gram Yojana)लघुरुप: SAGY) हा एक ग्रामीण विकास कार्यक्रम आहे ज्याचे लक्ष्य खेड्यांना विकसित करणे आहे. त्यात,सामाजिक विकास,सांस्कृतिक विकास व खेड्यातील समाजात जागरुकता आणणे याचा अंतर्भाव आहे.[१] हा कार्यक्रम दि.११ ऑक्टोबर २०१४ला जयप्रकाश नारायण यांच्या वाढदिवशी सुरू करण्यात आला.[२]

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही:

  • (अ)मागणीनुसार सुरू होणारी
  • (ब)समाजातर्फे उद्युक्त
  • (क)लोकांच्या सहभागावर आधारीत आहे.

ध्येये संपादन

या योजनेची कळीची ध्येये आहेत:

  1. सध्या अस्तित्वात असलेल्या योजना व स्थानिक संदर्भ प्राथम्य वापरून 'आदर्श ग्राम' म्हणून गावांचा विकास करणे, ज्यात गावागावाप्रमाणे बदल होऊ शकतो.
  2. स्थानिक विकासाचा नमूना तयार करणे ज्याचा वापर इतर खेड्यात होऊ शकतो.

संसद ग्राम योजनेत महिलांचा सहभाग आवश्यक आहे .

संदर्भ संपादन

  1. ^ "प्रधानमंत्री मोदींनी 'संसद आदर्श ग्राम योजनेची' घोषणा केली". Yahoo News. 11 October 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "संसद आदर्श ग्राम योजना:मोदींनी पुन्हा आपल्या विरोधकांना चित केले". First Post. 11 October 2014 रोजी पाहिले.