शेखर पाटील (जन्म : इ.स. १९४६; - २१ मे २०१९) हे एक मराठी कादंबरीकार व नाटककार होते. ते मुंबईत वरळीला रहात. मुंबई महापालिकेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यापासून ते पूर्णवेळ लिखाण करत असत.

शेखर पाटील यांचे 'मी रेवती देशपांडे' हे नाटक विशेष गाजले. त्यांच्या या नाटकात मोहन जोशी, रमेश भाटकर, विजय गोखले, निशिगंधा वाड आणि रुपाली भोसले यांनी कामे केली होती.

शेखर पाटील यांनी लहिलेली नाटके संपादन

  • हा सागरी किनारा
  • मी रेवती देशपांडे
  • सौदामिनी

शेखर पाटील यांच्या कादंबऱ्या संपादन

  • रानवारा
  • गोफ
  • झोत (कथासंग्रह)
  • शीळ
  • हैराण काॅलनी, वगैरे.