शालिनी वाटवे (१९३१) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे पती बापू वाटवे हे चित्रपटविषयक लेखन करणारे मराठी लेखक होते.

शालिनी वाटवेंचे वडील रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगरमधील बागायतदार होते. त्यांना सहा भावंडे होती. शालिनीने शालेय शिक्षणासाठी पुण्याला जाण्याचा आग्रह धरल्यानंतर वडिलांनी त्यांना पुण्यातील त्यांच्या भगिनी सुधाताई केळकर यांच्याकडे पाठवले. सुधाताईंचे पती क.वा. केळकर हे फर्ग्युसन कॉलेजचे तत्कालीन उपप्राचार्य होते. फर्ग्युसनच्या आवारातील ६ नंबरच्या दगडी बंगल्यात ते राहात. त्‍यांच्या घरी शालिनीबाईंची रहाण्याची सोय झाली.

पुस्तके संपादन

  • पाच पावलं पश्चिमेकडे
  • आठवणीचे आगर (आत्मचरित्र)