"ममता बॅनर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kn:ಮಮತಾ ಬ್ಯಾನರ್ಜಿ
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
ममता बॅनर्जी स्वातंत्र्यसैनिकाची मुलगी असल्याने विजिगिषुवृत्तीचे बाळकडूही मिळालेलं... त्यामुळेच अस्तित्वाच्या लढाईतही न डगमगता प्रस्थापितांचे मार्ग उलथून टाकत नवी वाट चोखाळणं हा त्यांचा स्वभाव... त्यास कृतीची जोड देत 'माँ, माटी मानुष...' या घोषणेनं सामान्य बंगालींना आपलसं करत ५६ वर्षीय ममता बॅनर्जीनी ३४ वर्षांची 'लालसत्ता' उलथून डाव्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना चारीमुंड्या चीत केलंय. कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकीय पटलावर स्वत:ची ओळख निर्माण करत केंदीय पदापर्यंत मजल मारली. दिल्लीत जाऊनही बंगालशी असलेली नाळ त्यांनी कायम राखली. कॉटनची पांढरी साडी, खांद्याला शबनम आणि कोलकात्याच्या कालीघाट परिसरातील पूवीर्च्याच छोट्या घरातील वास्तव्य.अशा साधेपणातून ममतांनी बंगालच्या सामान्य माणसांशी स्वत:ला जोडून ठेवलं.
 
ममता लहान असतानाच त्यांचे वडील गेले. घराला हातभार लावण्यासाठी त्यांनी दूध विक्रेत्याचं काम केलं. पेंटिंग, वाचन हे छंद जोपासत आर्ट्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, शिवाय कायद्याची पदवी असं भक्कम शैक्षणिक पाठबळ घेऊन [[इ. स. १९७०]] मध्ये काँग्रेस विद्यार्थी विंगच्या 'छात्र परिषद'मधून त्यांनी राजकारणात पहिलं पाऊल टाकलं. [[इ. स. १९८४]] पर्यंत पश्चिम बंगालबाहेर त्यांना फारसं कुणी ओळखत नव्हतं. एमए बीएड आणि कायद्याची पदवी घेतलेल्या ममता मुळातच लढवय्या स्वभावाच्या. युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून त्या राजकारणात आल्या. [[इ. स. १९८४]] मध्ये अवघ्या २९ व्या वर्षी जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून सोमनाथ चटर्जी यांच्यासारख्या दिग्गजाला हरवून त्यांनी सर्वांनाच धक्का दिला. मात्र, [[इ. स. १९८९]] मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. [[राजीव गांधीं]]नी त्यांना पक्षाचे सरचिटणीस केले. [[इ. स. १९९१]] मध्ये त्या दक्षिण कोलकता मतदारसंघातून पुन्हा विजयी झाल्या आणि या मतदारसंघाला त्यांनी विजयगड बनवले. नंतर सलग पाच निवडणुकांत त्या येथून वाढत्या फरकाने विजयी होत गेल्या. [[इ. स. १९९१]] मध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं. मात्र सरकारशी झालेल्या मतभेदानंतर [[इ. स. १९९३]] मध्ये त्यांनी मंत्रिपद सोडले. चार वर्षांनी थेट काँग्रेसपासून फारकत घेत नव्या राजकीय पक्षाची निवडणूक आयोगाच्या दरबारी त्यांनी नोंदणी केली आणि [[इ. स. १९९८]] मध्ये 'तृणमूल काँग्रेस' अवतरले.
 
पक्षाच्या स्थापनेनंतर [[इ. स. १९९८]] ते [[इ. स. २००१]] या कालावधीत त्यांनी भाजपप्रणित एनडीए सरकारला पाठिंबा दिला. तर [[इ. स. २००१]] च्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांत त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. [[इ. स. १९९१]] ते [[इ. स. २००१]] या कालावधीत दोनदा, आणि [[इ. स. २००४]] मध्ये काही काळ त्यांनी रेल्वेमंत्रीपद भूषवलं. त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पार धुव्वा उडाला... तृणमूलच्या एकमेव खासदार होत्या त्या स्वत:च! [[इ. स. २००५]] मधील कोलकाता महापालिका निवडणुकीतही तृणमूलचं पानिपत झालं होते. अशा अपयशाचा सामना करतानाही पश्चिम बंगालमधील डाव्यांची सत्ता उलथून टाकण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्या पुन्हा उभ्या राहिल्या.
 
[[इ. स. २००६]] ते [[इ. स. २०११]] हा काळ बंगालसाठी कमालीचा अस्वस्थ, अशांत ठरला. याच काळात तृणमूलच्या भावी सत्तेची बीजे रोवली गेली. [[इ. स. २००६]] च्या नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात नारा देत [[सिंगूर]] येथे उभारण्यात येणाऱ्या 'टाटा मोटर्स नॅनो कार' प्रकल्पाला त्यांनी विरोध दर्शवला. त्यासाठी संपादित केलेल्या एक हजार एकर जमिनीपैकी ४०० एकर जमीन शेतकऱ्यांना परत द्यावी, या मागणीसाठी त्यांनी नेटानं आंदोलन केलं. २५ दिवस त्यासाठी उपोषण केले. अखेर [[इ. स. २००८]] मध्ये टाटांनी सिंगूरमधून रीव्हर्स गिअर टाकला! शेतकऱ्यांशी थेट निगडित असलेल्या या प्रश्नाने ममतांना सामान्यांच्याजवळ नेलं. तर पोलिसी बळाच्या वापरानं डाव्यांना लोकांपासून तोडलं. नंतर [[पंचायत]], [[महापालिका]], [[लोकसभा]], [[विधानसभा]] पोटनिवडणुकीत ममतांना वाढतं यश मिळत गेलं. [[इ. स. २००९]] मध्ये केंद्रात स्वतः रेल्वेमंत्री बनत त्यांनी तृणमूलला सात मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. गेल्या दोन वर्षांत धडाक्‍यात काम करीत बंगालमध्ये अनेक विकासकामे करीत डाव्यांना आम्ही चांगला पर्याय देऊ शकतो हे लोकांना कृतीतून पटवून दिले.
 
कविमनाच्या दीदींनी या निवडणुकीसाठी "मा, माटी, माणूश' आणि "बदला नही बदलाव चाहिये' अशा दोन घोषणा स्वतः तयार केल्या. या घोषणांची जनमताचा ठाव घेतला. प्रत्येक सभेत त्या जणू दुर्गेचेच रूप धारण करीत. डाव्या नेत्यांवर त्या त्वेषाने तुटून पडत. एक महिला डाव्यांना आव्हान देते याचे सामान्यांना मोठे अप्रूप वाटे. केवळ त्यांना पाहण्यासाठी लोक एक-दीड किलोमीटर दुतर्फा गर्दी करीत. ज्योती बसू यांच्यानंतर सामान्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधणाऱ्या, त्यांची नस ओळखणाऱ्या नेत्या म्हणून आज त्यांचे नाव घेतले जाते.
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी|बॅनर्जी, ममता]]