"अंत्येष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''अंत्येष्टी''' हा हिंदू धर्मातील [[सोळा संस्कार| सोळा संस्कारांपैकी]] सोळावा संस्कार आहे. माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व [[श्राद्ध]] हे संस्कार [[हिंदू]] जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून [[दशक्रिया|दाहकर्म]] व श्राद्ध या विधींकडे पाहिले पाहिजे असे वाटते.
भारतीय संस्कृतीचे मूलाधार
[[ब्रह्म पुराण]]ात असा उल्लेख सापडतो की जी व्यक्ती खोटे बोलत नाही, जी [[आस्तिक]] वृत्तीची आहे, जी देवपूजा परायण आहे, जी ब्राह्मणाचा सत्कार करते, जी कृतघ्नपणे वागत नाही, जी कोणाची [[ईर्ष्या]] करीत नाही अशा व्यक्तीला सुखावह मृत्यू येतो.(२१४.३४-३९)<ref>धर्मशास्त्राचा इतिहास-डॉ. [[पां.वा. काणे]]</ref>
भारतीय [[तत्त्वज्ञान]] असे मानते की मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या मनात जे विचार येतात त्यानुसार त्या व्यक्तीला पुढचा जन्म मिळतो. त्यामुळे [[देव|परमेश्वर]] सन्निध असण्यासाठी अशा वेळी
दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे. जे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले जाते.. आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो. प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून प्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला आहे असा. त्यामुळे '''दिवंगत व्यक्तीच्या अचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत असताना त्यामध्ये मनात पवित्र भाव आणि दिवंगताविषयी आदरभाव असावा.'''
|