"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
P10099 (चर्चा)यांची आवृत्ती 1730824 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३५:
|}}
 
'''जिजाबाई''' (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, माँसाहेबमॉंसाहेब) ([[१२ जानेवारी]] [[इ.स. १५९८]] - [[१७ जून ]], [[इ.स. १६७४]]) ह्या [[मराठा साम्राज्य]]ाचे संस्थापक छत्रपती [[शिवाजी महाराज]]ांच्या आई होत्या. [[सिंदखेड]]चे [[लखुजी जाधव]] हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे [[देवगिरी]]च्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर [[इ.स. १६०५]] मध्ये जिजाबाईंचा [[शहाजीराजे भोसले|शहाजीराजांशी]] [[दौलताबाद]] येथे विवाह झाला.
 
== भोसले व जाधवांचे वैर ==
ओळ ५०:
शिवाजी १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती [[पुणे|पुण्याची]] जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. [[निजामशाही]], [[आदिलशाही]] आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी [[दादोजी कोंडदेव]] यांच्या सोबत नेटाने [[पुणे]] शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा [[राम]] किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा [[भीम]] किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईम्नी नुसत्याच्गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://zeemarathijagruti.com/stories-from-past/rajmata-jijau-information-in-marathi|शीर्षक=Rajmata Jijau, आदर्श राजमाता जिजाऊ|दिनांक=2017-01-11|संकेतस्थळ=Zee Marathi Jagruti|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-01-12}}</ref>
 
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत:स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत:स्वतः तंटे सोडवत.
 
==जीवन==
ओळ ५७:
राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ [[बजाजी निंबाळकर]] यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची [[हिंदू]] धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, [[बजाजी निंबाळकर|बजाजी निंबाळकरांच्या]] मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
 
राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत:स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
 
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी [[१७ जून]], [[इ.स. १६७४]] ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे [[रायगड|रायगडाच्या]] पायथ्याशी असलेल्या [[पाचाड]] गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.