[[File:Upload (14383531437).jpg|thumb|दलाई लामा]]
'''चौदावे दलाई लामा''' (धार्मिक नाव: ''तेंझिन ग्यात्सो'' ; [[तिबेटी भाषा|तिबेटी]]: བསྟན་འཛིན་རྒྱ་མཚོ་ ; [[रोमन लिपी]]: ''Tenzin Gyatso'' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 丹增嘉措 ; [[फीनयीन]]: ''Dānzēng Jiācuò'' ;) ([[जुलैजन्म ६]], [[इ.स. १९३५]]: [[ताकत्सर]], [[छिंगहाय]], [[चिनाचे जनता-प्रजासत्ताक|चीन]], -६ हयातजुलै १९३५) हे १४वे व विद्यमान [[दलाई लामा]] आहेत. [[तिबेटी बौद्ध मत|तिबेटी बौद्ध मतातील]] [[गेलुग्पा]] पंथाच्या प्रमुख आचार्यांना ''दलाई लामा'' अशीअश्या संज्ञेने उल्लेखले जाते. १७ नोव्हेंबर, इ.स. १९५० रोजी चौदाव्या दलाई लामांनी पदाची सूत्रे हाती घेतली. चौदाव्याया दलाई लामांनी तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी हयातभर कार्य केले असून इ.स. १९८९ साली त्यांना शांततेसाठीचे [[नोबेल पारितोषिक]] देऊन गौरवण्यात आले.
== कार्य ==
त्यांचे आई-वडील [[शेतकरी]] होते. त्यांच्याकडे असलेल्या [[शेती]] व [[गाय|गाई]], [[म्हैस|म्हशींवर]] ते आपला उदरनिर्वाह चालवायचे. हे कुटुंब [[इ.स. १९३९]] मध्ये दलाई लामांच्या चौथ्या वाढदिवसानंतर आपलंआपले छोटसंछोटसे खेडेगाव सोडून [[ल्हासा]] येथे आले.
दलाई लामांच्या निवडीसाठी असलेल्या विविध कसोट्या यशस्वीरीत्या पार केल्यावर [[फेब्रुवारी २२]], [[इ.स. १९४०]] रोजी [[पो ताला प्रासाद|पो ताला प्रासादात]] एका विधिपूर्व समारंभात ''तेंझिन गियात्सो'' विद्यमान चौदावे दलाई लामा म्हणून आसनस्थ झाले. त्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. पुढे त्यांचा धर्मविषयक सखोल अभ्यास सुरुसुरू असताना [[इ.स. १९५०]] मध्ये [[चीन]]ने [[तिबेट]]वर आक्रमण केले. आणि हा प्रदेश चीनचा भाग असल्याचे घोषित केले. त्याचवेळी तिबेटच्या राजकीय सत्तेची सर्व सूत्रे दलाई लामांच्या हातात आली. या काळात तिबेटवर चिनी राजवटीचा अनियंत्रित अंमल सुरुसुरू झाला . धाक, दडपशाही, जुलूम, जबरदस्ती, छळवणूक, पिळवणूक इत्यादी अत्याचार तिबेट चरीलतिबेटच्या जनतेवर चीनीचिनी राज्यकर्तेराज्यकर्तांकडून व लष्कराकडून होत होते. भगवान [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धाच्या]] शांतताप्रिय देशात हिंसाचार, लाठीमार अश्रुधूर व गोळीबार या अत्याचारांनी परिसीमा गाठली. जनतेच्या सर्वप्रकारच्या स्वातंत्र्यावर र्निबधर्निर्बंध लादले गेले. तिबेटीय कला, संस्कृती व परंपरा यांचा ऱ्हास केला गेला. चीनच्या वाढत्या जाचामुळे व अत्याचारामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दलाई लामांना त्याच्या कुटुंबियांसहकुटुंबीयांसह [[इ.स. १९५९]] मध्ये [[तिबेट]] सोडावे लागले. ते भारतात शरण आले. काही लोक [[नेपाळ]], [[भूतान]] व इतरत्र शरण गेले. [[जवाहरलाल नेहरू]] आणि लामा यांची [[इ.स. १९५९]] मध्ये [[मसूरी]] येथे भेट झाली. आज जगभरातील विविध देशांमध्ये तिबेटीय माणसे निर्वासितांचं आयुष्य कंठत आहे. त्यातील बहुतांश मात्र भारतात आहेत. [[हिमाचल प्रदेश|हिमाचल प्रदेशातील]] [[धरमशाला]]त दलाई लामा वास्तव्यास आहेत. येथे त्यांनी लोकशाही मूल्यांच्या तत्वावरतत्त्वावर तिबेटीय निर्वासितांची संसद स्थापन केली आहे. आज ही संसद किंवा निर्वासितांचे सरकार दलाई लामांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे.
== लढा ==
दलाई लामा तिबेट मुक्तीसाठी विविध शांतताप्रिय मार्गानी झगडत आहेत, आंदोलने करीत आहेत व आपल्यावरील अन्यायाची गाथा जगासमोर हिरिरीनंहिरिरीने मांडीत आहेत. जागतिक स्तरावर तिबेटची बाजू मांडण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. याच कारणासाठी दलाई लामांच्या शांतताविषयक प्रयत्नांची दखल घेवूनघेऊन त्यांना [[इ.स. १९८९]] मध्ये [[नोबेल पारितोषिक]] देण्यात आले.
देश-विदेशातविदेशांत धर्म, तत्वज्ञानतत्त्वज्ञान, अिहसाअहिंसा, जागतिक शांतता, करूणाकरुणा, मानवी हक्क इत्यादी विषयांवर ते व्याख्याने देत आहेतअसतात. देश-विदेशातीलविदेशांतील अनेक विद्यापिठांनीविद्यापीठांनी त्यांना सन्माननिय डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविले आहे. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांना मानचिन्हे व गौरवपत्रे दिली आहेत. आतापर्यंत त्यांनी जगभरातील ६२ देशांना भेटी दिल्या असून ७२पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यापकी ‘फ्रिडम‘फ्रीडम इन एक्साईल’एक्झाईल’ व ‘माय लँडलॅन्ड एँण्डॲन्ड माय पीपल’ ही दोन त्यांची आत्मचरित्रपर पुस्तके आहेत.
[[चित्र:Bush, Byrd and Pelosi awarding the Dalai Lama.jpg|thumb|right|250px|[[जॉर्ज बुश]] यांच्या हस्ते सन्मान]]
==मराठी/हिंदी अनुवाद==
दलाई लामांच्या ‘माय लॅन्ड ॲन्ड माय पीपल’ या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद 'माझा देश माझी माणसं' या नावाने [[सुरुची पांडे]] यांनी केला आहे.
त्यांच्या ‘फ्रीडम इन एक्झाईल’चा 'मॆरा देश निकाला' या नावाचा हिंदी अनुवाद 'राजपाल प्रकाशना'ने प्रकाशित केला आहे.
== हेही पाहा ==
[[वर्ग:नोबेल शांतता पारितोषिकविजेते]]
[[वर्ग:मॅग्सेसे पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:बौद्ध भिक्खू]]
|