"सुर्यफूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
पोखरकर अनु (चर्चा | योगदान) No edit summary |
पोखरकर अनु (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ६:
==हवामान==
सुर्यफुल हे [[पीक]] विविध [[हवामान|हवामानात]] चांगले येते.सुर्यफुलाचे [[पीक]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेतले जाते. रब्बी हंगाम हा खरीप व उन्हाळी हंगामापेक्षा, सुर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी चांगला असतो.कारण रब्बी हंगामातील वातावरणामुळे सुर्यफुलाच्या वाढीसाठी भरपूर कालावधी मिळतो.पीक काढणीस जास्त कालावधी लागतो.याउलट खरीप उन्हाळी हंगामात अधिक तापमानामुळे पीक लवकर काढणीस तयार होते. त्यामुळे उत्पादनात फरक पडतो. २० डी. ते २२ डी.सें.ग्रे. तापमान सुर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी पोषक असते.
==जमीन==
सुर्यफुलाच्या वाढीसाठी [[वाळू|वाळूमिश्रीत]] [[जमीन]] अधिक चांगली असते परंतु सुर्यफूल [[पीक]] सर्व प्रकारच्या निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले येते. सुर्यफुलाच्या मुळाच्या वाढीसाठी निचरा होणारी [[जमीन]] आवश्यक असते. निचरा होणाऱ्या जमिनीत [[अन्न|अन्नद्रव्यांचे]] शोषण चांगले होऊन पिकाची वाढ जोरात होते. जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ असल्यास सुर्यफुल चांगले होते.
==बीजप्रक्रिया==
[[पेरणी|पेरणीकरीता]] चांगले, टपोरे [[बी]] हवे असतात व बारीक,बी बाजूला काढले जातात.. १ किलो बियाणे २५ ते ३० मिली जर्मिनेटर आणि १ लि. पाण्याच्या द्रावणात ५ ते ६ तास भिजवून सावलीत वळवले जातात. त्यामुळे उगवण लवकर, एकसारखी आणि चांगली होते.
==पुर्वमशागत==
सुर्यफुलाच्या मुळ्या जमिनीत ६० सेंमी खोलवर जात असल्यामुळे १५ ते २० सेमी खोलवर [[नांगरट]] करावी लागते. कुळवाच्या २ - ३ पाळ्या देऊन ढेकळे फोडावी व [[शेत]] सपाट करून घ्यावी लागते.जमिनीचा पोत व सुपिकता सुधारण्यासाठी चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत प्रतीएकरी ४ - ५ गाड्या आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० किलो जमिनीत पसरावे. पसरल्यानंतर पाळ्या देऊन शेत सपाट करून घ्यावी.
==संदर्भ==
<ref>http://www.drbawasakartechnology.com/m-July2011-SunflowerLagwad.html#.Wuai5XucHIU</ref>
|