=== कला व संस्कृती ===
'''विष्णु दिगंबर पलुस्कर'''
विष्णु दिगंबर पलुस्कर ह्या युगपुरुषाचा अवतार संगीत क्रांतीच्या योगदानासाठी खूप मौल्यवान ठरला."गंधर्व महाविद्यालयाची" १९०१ साली "लाहोर" येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्याचे फळ होय. (लोकमत ८/४/२००६) विष्णु दिगंबर पलुस्कर हे निःसीम राम भक्त होते."गंधर्व महाविद्यालयाची" स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी,थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली.१९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी "श्री रामनाम आधारश्रम" म्हणून स्थापन केलेली वस्तू आजही अस्तीतवात आहे (लोकमत-रसिका ७/९/२०००).विष्णु दिगंबर पलुस्कर ह्यांना जरी बलपणी अंधत्व येऊनही त्यांनी संगीतला "संगीत प्रेस" च्या नावाने डोळे दिले.(लोकमत-रसिका ७/९/२०००) पंडित विष्णु दिगंबर पलुस्कारांच्या निधन ऑगस्ट १९३१ सली झाले,त्यानंतर त्यांचा संगीतीक आणि सर्वारधारने वरसा संभाळला तो त्यांचे पुत्र व भारताचे अनमोल रत्न पंडित दत्तात्रय विष्णु पलुस्कर.
'''मतोश्री गंगाबाई पलुस्कर'''
गंगाबाईंचे कार्य समजोद्धरक सवित्रिबाई फुलेंच्या तोडीचे होते.सवित्रिबाईंनी स्त्री समजत शैक्षणिक साक्षरता आणली,तर गंगाबाईंनी संगीत साक्षरता रुजवली.स्त्रीला अत्यंता हीन दर्जाच्या वागणुकीच्या त्या जमान्यात असे दीव्य करणे साधी गोष्ट नव्हती.नाशिकच्या बोहरपट्टीतून जातांना डवीकडे पाहिल्या मजल्यावर आपल्याला एक बोर्ड दिसतो."गंधर्व महाविद्यालय" त्यावर पुढे लिहिलेले आहे की "येथे कुलीन स्त्रियांना व मुलींना गायन-वादनाचे शिक्षण दिले जाईल".याची स्थापना १९३१ सलच्या ललित पंचमीस झाली.१९३१ ते १९८२ पर्यंत सतत ५० वर्ष बाईंनी संगीत शिक्षणाची गंगा नाशिकमध्ये प्रवाहित ठेवली.संगीत सावित्री म्हणून त्यांचा उल्लेख आवर्जुन आशाकरिता करवसा वाटतो की संगीत क्षेत्रात महिला वर्गने आज जी प्रागती साधली आहे त्याचे पाहिले श्रेय मतोश्रींनाच जाते.–समरणिका व (स्त्री जीवा विषयक स्थियंतर/प्रकाशक-भारतीया इतिहास संकलन समिती,नाशिक)
'''गोविंदराव पलुस्कर'''
पं.डी.व्ही. पाळुस्कारांनंतर नाशिक मध्ये संगितची परंपरा चालवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आजचे नाशकातील ऋषीतुल्य व चतुरस्त्र गायक पंडित गोविंदराव पलुस्कर होय.शब्द कळायच्या त्या वयात पंडितजींना तलाची समाज होती.अगदी लहानपणपासूनच त्यांच्या कानवर संगितचे शुद्ध संस्कार होऊ लागले.ज्या पलुस्कारांच्या संगीत कस्तुरीचा सुगंधा लुटण्यासाठी अवघे संगीत जग असुसलेले असे,त्या पलुस्कर कस्तुरीचा मदहोष करणारा सुगंध पंडितजींना क्षणोक्षणी मनमुरद उपभोगता येऊ लागला तो त्यांच्या काका पं.डी.व्ही पलुस्कर यांच्या मुळे.बालाजी संथानाच्या स्पर्धेत गोविंदरावांना प्रथम बक्षिस मिळाले (लोकमत २८/७/९९)
पलुस्कर परंपरेतील अत्यंता महत्वाचा टप्पा म्हणून पा.गोविंदरावांनकडे बघितले जाते.विशेषत: महराष्ट्राबाहेरही पलुस्कर परंपरेची ओळख करून देण्याचे अत्यंता महत्वाचे असे कार्य त्यांनी केले आहे.सुमारे ३५ वर्षे त्यांनी केवळ महराष्ट्राबाहेर संगीत अध्यापणाचे कार्यच केले नही,तर आदर्श शिक्षक म्हणून बहुमानही मिळविला.अशी कारकीर्द गाजवण ही साधी गोष्ट नही.(लोकमत २१/२/२००२)
आकाशवाणी औरंगाबाद,जाळगाव,कटक,जयपूर,लखनौ,पिलानी ह्या केंद्रावरून ते शास्त्रीय गायन करीत.संगीत विशारद नंतर त्यांनी १९५७ साली अलंकर केले.दरम्यान,कटकला असतानाच त्यांच्या "मैफलीचे संगीत" या प्रबंधला अ.भा.गंधर्व महाविद्यालयाने मान्याता देऊन त्यांना 'डॉक्टरेट' (संगीतचार्य) बहल केले.त्यानंतर १९८९ पासून नाशिकला तावून-सुलाखून निघालेले ही रत्न पुन्हा लाभले आणि पुन्हा एका पलुस्कारांच्या स्वरमधुर्याची कस्तुरी रसिकांना बेहोष करणारा आनंद देऊ लागली.मुळातच शोधक वृत्ती अंगी असल्याने संगीताच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मधुकरवृत्तीने बरेच काही मिळवले. उत्तर प्रदेश लिकसंगीताचे संस्कारही त्यांनी ठुमरी,होरी,कजरी या गीत प्रकारांसाठी नजाकतीने हेरले.(लोकमत २८/७/९९)
संगीत साक्षरतेचे आद्य महर्षी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर अशा घरंदाज परंपरेचे पाईक म्हणून गोविंदरावांनी फार मोठे कार्य केले.पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर,पंडित चिंतमाणराव पलुस्कर (पंडित गोविंदरावांचे वडील), स्व.गंगाबाई पलुस्कर(मातोश्री),पंडित डी.व्ही. पलुस्कर व आता पंडित गोविंदराव पलुस्कर अशी ही परंपरेची सुवर्ण मालिका आहे.(लोकमत २१/२/२००२)
=== इतिहास ===
'''नाशिकचा प्राचीन इतिहास (राजकीय)'''
नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यासंस्कृती प्रचारातील आरम्भस्तंभ मानले जाते.गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. त्यावेळेस ते रहिवासी होते .
सातवाहन काळात नाशिकला फार महत्व होते. ई.स.१५० मध्ये भारतात आलेल्या टोलेमी या इजिप्तिअन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा गौरव केला.
ईसविसन च्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णी च्या काळापर्यंत चालू होता. ई.स.१०५-१०६ च्या दरम्यान नाहापन
या शत्रपने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले.
ई.स १२४-१२५ च्या दरम्यान नाहापानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला. नाह्पानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते.
ई.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला.
'''यादव काळ'''
तैलप तिसरा ह्या शेवटच्या चालुक्य राजास कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये ताबा घेतला.
ई.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले. व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर हि राजधानी होती.
सिन्नर- सिंदीनगर,सेउनुर,श्रीनगर, या नावानी ओळख होती.१२ व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होती.
|