"अरविंद घोष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |
||
ओळ ४:
[[चित्र:Sri aurobindo.jpg|240px|thumb|upright|right|श्री ऑरोबिंदो]]
[[Image:Sri Aurobindo sign.jpg|rahmenlos|247 px|right]]
श्री अरविंद हे विसाव्या शतकातील एक महान
==जिवन==
यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी [[कलकत्ता]] येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता होते.
लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक [[जोसेफ मॅझिनी]] आणि [[गॅरिबाल्डी]] यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी श्री अरविन्दांना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्यात आले. लहान वयातच त्यांनी
===कार्य===
भारतात परतल्यानंतर ते [[बडोदा संस्थान]]च्या नोकरीत रुजू झाले. बडोद्यास [[सयाजीराव गायकवाड]] यांचे [[सचिव]] म्हणून त्यांनी काम केले. महाविद्यालयात [[फ्रेंच]] व इंग्रजीचे [[प्राध्यापक]] आणि कॉलेजचे [[उपप्राचार्य]] म्हणूनही काम केले. येथे ते बंगाली आणि [[संस्कृत]] या भाषा शिकले. तिथे असतानाच त्यांनी [[वेद|वेदांचा]] अभ्यास केला व [[योग]]साधनेस प्रारंभ केला. तेथे त्यांनी [[भारतीय तत्त्वज्ञान|भारतीय तत्त्वज्ञानाचे]] वाचन केले. [[विष्णू भास्कर लेले]] या महाराष्ट्रीयन योग्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाचे प्राथमिक धडे गिरविले. योगमार्गातील त्यांची प्रगती पाहून स्वतः लेलेदेखील स्तिमित झाले.
==स्वातंत्र्य लढ्यात सहभाग==
याच काळात ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. ते [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांचे]] सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रीय सहभागी झाले. त्यांनी [[मुंबई]]च्या '[[इंदुप्रकाश वृत्तपत्र]]' या [[वर्तमानपत्र|वर्तमानपत्रात]] [[लेख]] लिहून आपली राजकीय मते मांडली. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला आणि अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. [[बंगाल]]च्या १९०६मध्ये झालेल्या [[बंगालची फाळणी|फाळणी]]नंतर ते हिंदुस्थानातील पहिल्या [[नॅशनल कॉलेज]]चे [[प्राचार्य]] झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्ञ म्हणून ओळखले जातात. त्याच वर्षी त्यांनी [[वंदे मातरम् वंदे वृत्तपत्र|मातरम्]] हे वृत्तपत्र सुरू केले. बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना,[[ इंग्रज सरकार]]ने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९०७ मध्ये एका वर्षाची [[कैद]] झाली. त्यांना [[अलिपूर]] येथे कारावासात ठेवण्यात आले होते.
==जीवनाला कलाटणी==
तेथे त्यांनी योगसाधना केली. त्यांना तेथे सर्वत्र [[वासुदेव|वासुदेवाचे]] दर्शन झाले. हा त्यांचा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दरम्यान, त्यांच्या बचावाचे काम [[देशबंधू चित्तरंजन दास]] यांनी केले. त्यांची यथावकाश निर्दोष सुटका झाली. झालेल्या या साक्षात्कारानंतर, भारताच्या स्वातंत्र्याविषयी ते नि:शंक झाले. राजकारणातून निवृत्ती घेऊन, ते समग्र मानव जातीच्या परिवर्तनाच्या दिशेने स्वतःला कार्यप्रवृत्त करते झाले. ब्रिटीशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते गुप्तपणे प्रथम [[चंद्रनगर]]ला आणि नंतर १९१० मध्ये [[पाँडीचेरी]] येथे गेले. ते १९५० पर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. पोंडीचेरी ही त्यांची कर्मभूमी, योगभूमी ठरली. मानवाची प्रगती आणि अध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसृत झाले. मानवाची प्रगती आणि अध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसृत झाले.
==तत्त्वज्ञान==
[[कर्म]], [[ज्ञान]], आणि [[भक्ती]] यांच्या समन्वयावर आधारित 'पूर्णयोगा'ची मांडणी त्यांनी केली. 'माणूस हा
==ग्रंथसंपदा==
त्यांच्या महत्त्वाच्या काही ग्रंथांचे मराठीत भाषांतर [[सेनापती बापट]] यांनी केले आहे.
* योग समन्वय, * गीतेवरील निबंध, * दिव्य जीवन, * भारतीय संस्कृतीचा पाया, ही ग्रंथसंपदा बापट यांच्याशिवाय इतरांनी, इतर ग्रंथांची केलेली भाषांतरेही उपलब्ध आहेत. 'वेद रहस्य' हे त्यातीलच एक. 'सावित्री' हे महाकाव्यदेखील मराठीत उपलब्ध आहे. ==संदर्भ==
श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन, ले. डॉ.गजानन नारायण जोशी; पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९८२
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]]
|