"वामन पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{गल्लत|वामन पंडित (कणकवलीचे)}}
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १२:
{{विकिकरण}}
महाराष्ट्रीय ज्ञानकोशानुसार वामन पंडितांची गणना उच्च दर्जाच्या कवीत होते. लांब लांब यमके साधण्यात याचे कौशल्य दिसून येते. म्हणून यास यमक्या वामन असे म्हणतात. याचे कांहीं काव्य भाषांतररूप आहे व काही स्वतंत्र आहे. भर्तृहरीची श्रृंगार, नीति वैराग्य शतके, गंगालहरी, समश्लोकी गीता ही भाषांतरित होय. निगमसागर नावाचा वेदान्तपर ग्रंथ त्याने लिहिला आहे. 'यथार्थदीपिका' या नावाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या आग्रहावरून त्याने लिहिली. व तीत ’आंधळी भक्ती ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग आहे’ असे प्रतिपादिले आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे. ओवीरचना अनियमित असून ती कोठे लांब तर कोठे आखूड झाली आहे. याशिवाय, रामजन्म, कंसवध, हरिविलास, आर्याटीका, कात्यायनीव्रत, अनुभूतीलेश, जलक्रीडा, जटायुस्तुति अशी इतर पुराणप्रसंगांवर वामन पंडिताने काव्ये केली आहेत. 'सुश्लोक वामनाचा' असे मोरोपंतांनी म्हटले आहे, यावरून वामनपंडिताची योग्यता दिसून येते. निवृत्तिपर काव्यांप्रमाणेच वामननाने शृंगार, वात्सल्य, करुण, वगैरे नवरसपूर्ण काव्येही केली आहेत. वर्णनशैली, रचनाचातुर्य, साधेपणा, व प्रासाद याच्या काव्यांत जागजागी दिसून येतो. याने आपल्या बायकोस उपदेश करण्याकरिता लिहिलेले प्रियसुधा नावाचे प्रकरण फार उत्तम वठले आहे. <ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref>
 
 
विनामृत्तिका कुंभ जेव्हां दिसेना <br>
विना मृत्तिका कुंभ कांहीं असेना <br>
दिसेना असी ज्याविणें मृत्तिकाही <br>
नसे मृत्तिकाही तयावीण कांहीं ॥१॥ <br>
 
अलंकार सृष्टीमधें काय आहे <br>
सुवर्णाविणें हें विचारुनि पाहें .. [[:s:चित्सुधा|चित्सुधा]] <br>
 
==उत्तर (वर्तमान)कालीन टीका==