राजेंद्रकुमार यांचा जन्म २० जुलै १९२९ रोजी सियालकोट, पंजाब येथे झाला.  ६० ते ७० या दशकातील ते एक प्रसिद्ध अभिनेता होते. 

राजेंद्र कुमार
राजेंद्र कुमार
जन्म राजेंद्र कुमार
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

राजेन्द्र कुमार यांनी आपली चित्रपटातील कारकीर्द १९५० च्या *'जोगन'* या चित्रपटापासून केली.  या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्यासमवेत काम केले आहे.  १९५७ मधील *'मदर इंडिया'*  या चित्रपटात त्यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका केली आणि ती खूप गाजली. १९५९ मधील *'गूॅंज उठी शहनाई'* या चित्रपटाच्या यशाने त्यांना अभिनेता म्हणून ओळख मिळाली.

६० च्या दशकात एकापाठोपाठ एक असे ६-७ चित्रपट रौप्यमहोत्सवी (सिल्वर जुबली) झाल्याने त्यांना लोक *'जुबली कुमार'* म्हणून ओळखू लागले.

राजेन्द्र कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत *'धूल का फूल (१९५९),दिल एक मंदिर (१९६३),मेरे महबूब (१९६३),संगम (१९६४),आरज़ू (१९६५),प्यार का सागर,गहरा दाग़,सूरज(१९६६) आणि तलाश* असे एकाहून एक सरस चित्रपट दिले.

त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून फ़िल्मफ़ेयर पुरस्कारासाठी *'दिल एक मंदिर,आई मिलन की बेला आणि आरज़ू* या चित्रपटांसाठी नामांकित केले गेले तसेच सर्वश्रेष्ठ सहअभिनेता म्हणून *'संगम'* या चित्रपटांसाठी नामांकित केले गेले.

१९८१ मध्ये त्यांनी आपला पुत्र कुमार गौरव याला 'लव स्टोरी' मधून चित्रपटात आणले.  या चित्रपटाचे ते निर्माता-दिग्दर्शक तर होतेच पण त्याचबरोबर यामध्ये त्यांनी कुमार गौरवच्या वडिलांची भूमिका केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफ़िस वर हीट झाला. त्यानंतर त्यांनी कुमार गौरव याच्यासोबत संजय दत्त याला घेऊन 'नाम' चित्रपट बनवला व हाही चित्रपट बॉक्स ऑफ़िस वर चांगलाच गाजला. राजेंद्रकुमार यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट *'अर्थ'* होता.

असा हा कलाकार १२ जुलै १९९९ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.