बृहद्रथ मौर्य

९वा मौर्य सम्राट

बृहद्रथ मौर्य हा मौर्य वंशातील शेवटचा सम्राट होता. बौद्ध धम्माच्या अति अनास्थेमुळे तो निष्क्रिय व उदासीन बनला होता. मौर्य साम्राज्य याच्या काळात फारच मोडकळीस आलेले होते. एका सैनिकी समारोहात भारतीय संस्कृती व क्षत्रिय अस्मितेचा अपमान केल्यामुळे क्रोधित होऊन, मौर्य साम्राज्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बृहद्रथाचा वध केला. समर्थक सरदार व सैनिकांनी त्याला सम्राट घोषित केले व शुंग साम्राज्याच्या उदय झाला.