बार्शी
आगळगाव अलीपूर आळजापूर अंबाबाईवाडी आंबेगाव अरणगाव
?बार्शी महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: भगवंत नगरी | |
— तालुका — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ३५६ मी |
लोकसंख्या | ३,००,००० (2017) |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | उस्मानाबाद |
तहसील | बार्शी |
पंचायत समिती | बार्शी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४१३४०१११२१० • +०२१८४ • महाराष्ट्र १३(MH13) |
तालुक्यातील गावेसंपादन करा
पार्श्वभूमीसंपादन करा
बार्शी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका उस्मानाबाद जिल्हालगत सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असून यास मराठवाड्याचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. येथील उड़ान फाउंडेशन चे कार्य उल्लेखनीय आहे
बार्शी सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे.बार्शी हे शहर कला,क्रीडा,शिक्षण,वैद्यकीय,औद्योगिक,सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत समृद्ध असे शहर आहे.बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे.
धार्मिक महत्त्वसंपादन करा
भगवंत मंदिरसंपादन करा
जुन्या काळी "भगवंताची नगरी" म्हनुन बार्शी ची ओळख आढळते. बार्शी हे भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवंत मंदिर हे विष्णु देवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे भारतातील एकमेव विष्णु मंदिर आहे. इ.स. १२४५ साली हेमाडपंथी शैलीने हे मंदिर बांधण्यात आले.तसेच संपूर्ण आशिया खंडातील हेमाड हया पाषाणामधील कोरलेले एकमेव मंदिर आहे. मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार पूर्वमुखी आहे.गाभाऱ्यात गरुड़खांब आहे. चैत्र, मार्गशीष, आषाढी व कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीस गरुडस्वार भगवंताची मिरवणुक शहरातुन काढली जाते. प्रत्येक पुर्णिमेस छबीना बाहेर नेह्ण्यात येतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर एका भगवंत भक्ताची समाधी आहे. एकूण 12 Mahadewachi मंदिरे असल्यामुळे बार्शी हे नाव पडल्याची आख्यायिका आहे.त्या मुळे बार्शी हे लोकप्रिय मानले जाते.
इतर आकर्षणेसंपादन करा
बार्शी शहरापासून २३ कि.मी वर श्री संतनाथ नगरी आहे. ज्याला वैराग असे म्हटले जाते. वैराग हे वैराग्याची भुमी म्हणुन ओळखले जाते. येथे श्री संतनाथ महाराज यांची समाधी आहे. वैरागचा दर बुधवारी बाजार भरतो. वैराग मधील शेळीचा बाजार प्रसिद्ध आहे. वैराग हे ठिकाण आता एक शिक्षणाच्या दष्टीने वाडत आहे. येथे सौ. सुवर्णलता गांधी महाविदयालय, विदयामंदीर कॉलेज असे काही मोठी कॉलेजेस व महाविदयालये आहेत. वैराग मध्ये भोगावती सहकारी साखर कारखाना आहे.बार्शी पासून ८ किलोमीटरवर दडशिंगे गाव आहे. येथे बाळपीर देवाची यात्रा भरते हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे
वैराग पासुन १३ कि.मी वर माढा रोड वर तडवळे हे ठिकाण आहे. येथे श्री भगवती मातेचे मंदीर आहे. हे मंदीर भव्य असुन या देवी ची अशी कथा सांगितली जाते कि या देवी ची मुर्ती ही गावातील भोगावती नदीत सापडली असुन ती मुर्ती त्यावेळी तळहता एवढया आकाराची होती, व सध्या हि मुर्ती 5 ते साडे पाच फुड एवढया आकाराची आहे. ही मुर्ती अगदी तुळजापुरच्या देवी प्रमाणे असुन, या देवीची तुळजापुरच्या देवी प्रमाणे पौर्णीमेला यात्रा भरते. पौर्णीमेला पुर्ण गावातुन देवीचा छबिणा काढला जोतो. गावातील भगवती माता हि जागृत देवी असुन गावातील लोकांची गावकर्यांची खुप श्रध्दा आहे. भगवती माते ची मिरवणुक ही भव्या असते. गावच्या यात्रेस परगाव चे लोग येतात. तडवळे हे गाव भोगावती नदीकाठी असुन,यावली व ढोराळे गावानजीक आहे.
श्री.स्वामीनारायण मंदिरसंपादन करा
बार्शी मध्ये बी.ए.पी.एस.स्वामीनारायण संप्रदायाचे अत्यंत सुंदर असे श्री.स्वामीनारायण मंदिर बालाजी कॉलोनी, सोलापूर रोड येथे आहे.हे मंदिर व त्यातील मूर्ती अत्यंत आकर्षक आहेत. बालकांना व युवकांना या ठिकाणी संस्कार दिले जातात.
बार्शीमध्ये जैन मंदिर हे कुर्डुवाडी रोड येथे आहे.
भगवंत मंदिर आहे.
'श्री निलकंठेश्वर' मंदिर,पांगरी ता.बार्शीसंपादन करा
बार्शी शहरापासुन 22 कि.मी.अंतरावर पुणे-लातूर राज्यमार्गावर पांगरी या निमशहरी गावाजवळ जागृत असे निलकंठेश्वर मंदिर आहे. प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या निलकंठेश्वर मंदिरात श्रावण महिण्यात व पोर्णिमा,अमावस्या, महाशिवरात्री या दिवशी मोठी यात्रा भरते.
शैक्षणिक[१]संपादन करा
बार्शी हे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे.
अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी बार्शीत 'भगवंत इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी' ही संस्था आहे.तर पदविका अभ्यासक्रमासाठी 'इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक' ही संस्था आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी 'इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग' हे महाविद्यालय बी.एस्सी.नर्सिंग हा अभ्यासक्रम चालवते.
औषधनिर्माण शास्त्राचा अभ्यासक्रम 'सोजर कॉलेज ऑफ फार्मसी' येथे शिकवला जातो.
उच्च माध्यमिक शिक्षणासाठी खालील महाविद्यालये आहे
१.श्री शिवाजी महाविद्यालय (कला व विज्ञान)
२.श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय(कला व विज्ञान)
३.बी.पी.सुलाखे कॉलेज ऑफ कॉमर्स (वाणिज्य)
४.महाराष्ट्र विद्यालय (कला व विज्ञान)
बार्शीची नाट्य परंपरा हि सुद्धा अत्यंत जुनी आहे.अनेक टी.व्ही सिरिअल आणि चित्रपटामध्यही बार्शीच्या कलाकारांनी काम केले आहे. बार्शीचे खारमुरे खूप प्रसिद्ध आहेत. बार्शी मधील जयशंकर मिल हि भारतातील दुसरी सुत गिरणी आहे जी आज पर्यंत चालू आहे. बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल हे नावाजलेले हॉस्पिटल असून मुंबई नंतर बार्शी मध्ये अशी दोनच कॅन्सरची हॉस्पिटल एकेकाळी देशामध्ये होती. डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटल हे देखील सर्व सुविधेने संपन्न हॉस्पिटल आहे.त्याच तोडीचे या हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टर्स सेवा देतात. त्याच तोडीचे यादव हॉस्पिटल आहे. तसेच डाॅ. बी. वाय. यादव हे बार्शीतील नामांकित डॉक्टर आहेत आणि श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून देखील ते 30 वर्षे कार्यरत आहेत. ही शाहीर अमर शेख यांची जन्म भूमी आहे .बार्शी मध्ये 12 ज्योर्तिलिंग आहेत म्हणून बार्शीला बार्शी असे नाव पडले अशी आख्यायेका सांगितली जाते .बार्शी हे शिक्षणाचे माहेरघर म्हणतात.
मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शीसंपादन करा
मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी नावाची संस्था बार्शीमध्ये कार्यरत असून या प्रतिष्ठान मार्फत विविध योजना राबविल्या जातात. आजाराचे मुख्य कारण दुषित पाणी आहे त्यामुळे शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे हि गरज ओळखून प्रतिष्ठानने अनेक गावात आर.ओ.प्लांट बसविलेले आहेत. 3 ते ५ वर्ष वयाच्या मुलांना मोफत तपासणी आरोग्य कार्ड दिली जातात ज्यामध्ये संपूर्ण एक वर्ष ह्या मुलांना बार्शीतील बालरोग तज्ञ डॉक्टर्स मोफत तपासणी करतात.केशर आंब्याची रोपे लावून त्याचे संवर्धन केले आहे.खेड्यामध्ये बसथांबे नसतात हि गरज ओळखून निवारा शेड उभी केलेली आहेत.
मातृभूमी प्रतिष्ठानचा महात्वाकांशी प्रकल्प "अन्नपूर्णा योजना " ज्याद्वारे निराधार,अपंग,वयोवृद्ध लोकांना दोन वेळेचे जेवणाचा डबा घरपोच दिला जातो. सध्या खामगाव,सुर्डी व बार्शी येथे एकूण १८० लाभार्थी याचा लाभ घेत आहेत.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
- ^ शैक्षणिक